शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

Kokan Flood : इकडे शरद पवारांची सूचना, तिकडे राज्यपालांचे केंद्राकडून मदतीचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2021 19:46 IST

Kokan Flood : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी राज्यपालांच्या दौऱ्याबाबत विधान करताना, केंद्राकडून जास्त निधी आणावा, असे म्हटले होते. राज्यपालांनीही या दौऱ्यात केंद्राकडून मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

रत्नागिरी - कोकणात झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांचा अतोनात नुकसान झाले आहे. मनुष्यहानी, वित्तहानी आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून नेतेमंडळींचे दौरे सुरू झाले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी (governor bhagat singh koshyari) आज रत्नागिरीतील (ratangiri) पूरग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी, केंद्राकडून आवश्यक ती मदत दिली जाईल, असे आश्वासन राज्यपालांनी चिपळूणवासीयांना दिले. 

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी राज्यपालांच्या दौऱ्याबाबत विधान करताना, केंद्राकडून जास्त निधी आणावा, असे म्हटले होते. राज्यपालांनीही या दौऱ्यात केंद्राकडून मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. "दौरे होत आहेत त्यानं धीर मिळतो. पण दौऱ्यामुळं शासकीय यंत्रणेचं काम वाढतं. त्यामुळे दौरे होऊ नये असं मला वाटतं. दौऱ्याला गेल्यामुळे यंत्रणेला त्रास होतो. ठिक आहे राज्यपाल जात आहेत त्यांचे केंद्राचे संबंध चांगले आहेत. त्यामुळे ते जास्त मदत आणू शकतात. केंद्रातून मदत मिळवून देण्यासाठी राज्यपालांचा उपयोग व्हावा", असं शरद पवार यांनी म्हटलं होतं. 

शरद पवारांच्या विधानाची अप्रत्यक्षपणे दखलच राज्यपाल यांनी घेतल्याच चिपळूणमध्ये दिसून आलं. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज सकाळी तळीये गावाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे आमदार आशिष शेलार होते. त्यानंतर त्यांनी चिपळूण शहराची पाहणी केली. चिपळूणमधील बाजारपेठेतही त्यांनी फेरफटका मारला. तत्पूर्वी आढावा बैठकही घेतली. 

अतिवृष्टीमुळे चिपळूण शहरावर ही दुर्दैवी वेळ आली आहे. मात्र, प्रशासनाने तातडीने परिस्थितीचा आढावा घेऊन पूरग्रस्त प्रत्येक नागरिकाला शासकीय मदत तातडीने देण्याची कार्यवाही करावी, असे राज्यपालांनी गुहागर येथील आरजीपीपीएल गेस्ट हाऊस येथे झालेल्या आढावा बैठकीत सूचना दिल्या. 'मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या पूरग्रस्त नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना मदत करणे महत्वाचे आहे, केंद्र शासनाकडूनही आवश्यक ती मदत दिली जाईल, संपूर्ण देश पूरग्रस्तांच्या दुःखात सहभागी आहे, असेही राज्यपालांनी सांगितले. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSharad Pawarशरद पवारchiplun floodचिपळूणला महापुराचा वेढाbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी