शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

किरण सामंत लोकसभेला उभे राहिले तर ३ लाखांच्या फरकाने जिंकतील, मंत्री उदय सामंतांनी व्यक्त केला विश्वास

By मनोज मुळ्ये | Updated: September 14, 2023 18:00 IST

'आम्ही नागपूर मागितले तर कसे दिसेल'

रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीला शिवसेनेकडून कोणाला उमेदवारी मिळेल, हे अजून निश्चित नाही. निवडणुकीला उभे राहायचे की नाही, हा निर्णय माझे थोरले बंधू किरण सामंत स्वत: घेतील. मात्र जर ते उभे राहिले तर शिवसेना, भाजप आणि मित्रपक्षांच्या मदतीने तीन लाखांच्या फरकाने निवडून येतील, याची मला खात्री आहे, असे राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.उद्योजक किरण सामंत अनेक वर्षे राजकारणात कार्यरत आहेत. मात्र ते नेहमी पडद्यामागे होते. शिंदे सरकार सत्तेत आल्यापासून ते पडद्यासमोर येऊन कार्यरत झाले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचे संभाव्य उमेदवार म्हणून त्यांचे नाव चर्चेत आहे. कार्यकर्ते, नेते त्यांना आग्रह करत आहेत. याबाबत प्रथमच मंत्री उदय सामंत यांनी भाष्य केले आहे.माझ्या राजकारणाचे निर्णय मी घेतो. तसेच त्यांच्या राजकारणाबाबतचा निर्णय ते स्वत: घेतील. ते सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात कार्यरत आहेत. जर त्यांनी उभे राहण्याचे ठरवले आणि शिवसेनेने त्यांना उमेदवारी दिली तर शिवसेना, भाजप आणि मित्रपक्षांच्या मदतीने ते तीन लाखांच्या फरकाने विजयी होतील, याची मला खात्री आहे, असे मंत्री सामंत म्हणाले. त्यांची स्वत:ची तशी मानसिकता व्हायला हवी आणि त्यांनी ती करावी, असे मी तुमच्यामार्फतच सांगतो, असेही मंत्री सामंत मिश्किलपणे म्हणाले.

लोकसभेची जागा भाजप लढवणार, असे भाजपचे प्रमोद जठार म्हणाले आहेत. या त्यांच्या भावना आहेत. कदाचित ते इच्छुक असतील. मला माहिती नाही. अर्थात उद्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, रत्नागिरी भाजप लढवेल ते त्यांचे अधिकार आहेत. त्यावर ते, एकनाथ शिंदे निर्णय घेतील, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.

आम्ही नागपूर मागितले तर कसे दिसेललोकसभेसाठी आमचे कार्यकर्ते नागपूरची जागा लढवतो म्हणाले तर कसे दिसेल? मतदार संघाची मागणी कोणीही करु शकतो. पण ती संयुक्तिक असायला हवी, एवढंच आपले मत असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीShiv SenaशिवसेनाUday Samantउदय सामंतlok sabhaलोकसभा