शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

खेड : खाडीपट्ट्यातील मासेमरतूक रोजचीच!

By admin | Updated: September 20, 2014 00:21 IST

जगबुडीतील थैमान : प्रदूषित पाणी घेतेय माशांचा जीव...

खेड : खाडीपट्ट्यातील जगबुडी नदी आणि खाडीत दररोज मासे मरण्याच्या घटना घडत आहेत़ माशांचा अक्षरश: खच पडला आहे. लोटे आद्यौगिक वसाहतीमधून सोडण्यात येत असलेल्या रासायानिक पाण्यामुळेच हे मासे मरत होत असल्याचे अनेकवेळा केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. तसा अहवाल येथील तहसीलदारांना तसेच कोल्हापुर येथील प्रदूषण नियंत्रण विभागाला सादर करण्यात आला आहे़ सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही हे रासायनिक पाणी सोडण्यात येत असल्याने न्यायालयाचा अवमान होत होत आहे़ यामुळे संबंधित कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे़बहिरवली, तुंबाड आणि कर्जी परिसरातील गावातील नदी आणि खाडी परिसरात असे प्रकार नित्याचे झाले आहेत़ येथील खाडीलगत जगबुडी नदीची वारंवार पाहणी व पंचनामा करण्यात आला़ यावेळी नदीतील पाण्याचा रंग हलका काळसर आढळला़ तसेच नदीपात्रात काळचरू, बोथरेट, कोळंबी आदी प्रकारचे मासे मृतावस्थेत आढळले होते़ हे मासे पाण्यावर तरंगताना आढळल्याचे ग्रामस्थांनी पाहिले.याबाबत तहसीलदार यांना तसा अहवालदेखील सादर करण्यात आले आहेत. मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या बोटचोपे पद्धतीच्या भूमिकेमुळे या मासेमारीला आळा घातला जात नसल्याचे दिसून येत आहे. न्यायालयात याबाबत चौकशी सुरू असतानाही सीईटीपीतून पाणी सोडण्यात येते तसेच यामुळे मासे मरण्याच्या घटना होत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.हा न्यायालयाचा अवमान आहे. याबाबत पुनर्दुरूस्ती याचिका लवकरच दाखल होणार असल्याची माहिती खाडीपट्ट्यातील ग्रामस्थांनी दिली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ या प्रकाराकडे लक्ष देत नसल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)प्रकार थांबणार कधी?लोटे औद्योगिक वसाहतीतील शेतकरी, नागरिकांनी व्यक्त केली चिंता प्रदूषण नियंत्रण मंडळ करतेय कायमासे मरण्याचे प्रकार वारंवारसंबंधित कारखान्यावर कारवाईची मागणीबहिरवली, तुंबाड,कर्जी गावाना मोठा फटकापंचनाम्याचा काय उपयोग