शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
3
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
4
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
5
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
6
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
7
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
8
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
9
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
10
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
11
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
12
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
13
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
14
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
15
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
16
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
17
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
18
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
19
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
20
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत

कान्होजी आंग्रे सागरी मोहिमेला सोमवारपासून प्रारंभ

By admin | Updated: January 14, 2015 00:40 IST

तुषार वाळुंजकर : महाराष्ट्र एनसीसी व महाराष्ट्र नेव्हल युनिटतर्फे आयोजन

रत्नागिरी : महाराष्ट्र राष्ट्रीय एन. सी. सी. मुख्यालय, मुंबई व दोन महाराष्ट्रा नेव्हल युनिट, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने सरखेल कान्होजी आंग्रे कोकणरत्न सागरी मोहिमेला दि. १८ जानेवारीपासून प्रारंभ होणार असल्याची माहिती नागपूरचे एन. सी. सी. कमांडिंग आॅफीसर कॅ. तुषार वाळुंजकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. यावेळी कमांडिंग आॅफीसर कर्नल पी. वाय. परबते उपस्थित होते.महाराष्ट्र नेव्हल युनिट एन. सी. सी., रत्नागिरीतर्फे सहावी सागरी नौका भ्रमण मोहीम सुरू होत आहे. या मोहिमेत दोन शिडाच्या २७ फुटी बोटीतून दहा दिवसात दहा बंदरांना भेट देण्यात येणार आहे. रत्नागिरी, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३२ मुलगे व ११ मुली तसेच भूदल व वायू दलातील मिळून एकूण ४४ छात्रसैनिक, दोन अध्यापकीय एनसीसी आॅफीसर, ६ नौसैनिक, १ नौका प्रतिमान निदर्शक, प्रशिक्षित लिपिक, लेखालिपिक, वाहनचालक, लष्कर आदी सहभागी होणार आहेत. दोन शिडांच्या नौकांसह दोन मोठ्या मच्छिमारी नौका व एक यांत्रिक बोट यात सहभागी होणार आहे.छात्रसैनिकांच्या धाडसी व पाण्यातील साहसी वृत्तीला चालना देणे, तसेच त्यांच्यामध्ये विश्वास, शक्ती, मानसिक वृत्ती बळकट करणे व दर्यावर्दी जीवनाचा अनुभव प्राप्त करणे यासाठी या मोहिमेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कॅ. वाळुंजकर यांनी दिली. मुक्कामाच्या गावात पथनाट्याच्या माध्यमातून मार्गदर्शन करणयात येणार आहे. स्त्रीमुक्ती सुधारणा, प्रथमोपचार, पर्यावरण समतोल, समुद्री पर्यावरण समतोल, स्वच्छता अभियान याविषयी माहिती देण्यात येणार आहे. तसेच भारताच्या तिन्ही दलात किंवा तटरक्षक दलांमध्ये ग्रामीण युवकांना समाविष्ट होण्यास लागणाऱ्या शैक्षणिक व शारीरिक प्रक्रियेबाबत माहिती देण्यात येणार आहे.दोन शिडांच्या बोटीतील केवळ कॅन्व्हासच्या शिडाच्या माध्यमातून ५२० किलोमीटर सागरी प्रवास करण्यात येणार आहे. दि. १८ रोजी मोहिमेला देवगड पोर्ट बंदर येथून प्रारंभ होणार असून, विजयदुर्ग येथे मुक्काम आहे. १९ रोजी विजयदुर्ग ते रत्नागिरी, दि. २० रोजी रत्नागिरी ते जयगड, दि. २१ रोजी जयगड ते हर्णै, दि. २२ रोजी हर्णै ते मुरूड (आगरदांडा), दि. २३ रोजी मुरूड (आगरदांडा) ते अलिबाग दि. २४ रोजी मुक्काम असून, दि. २५ रोजी परतीच्या प्रवासाला प्रारंभ होणार आहे. दि. २५ रोजी अलिबाग ते रेवदंडा, दि. २६ रोजी रेवदंडा ते श्रीवर्धन, दि. २७ रोजी श्रीवर्धन ते दाभोळ, दि. २८ रोजी दाभोळ ते रत्नागिरी असा प्रवास होणार आहे. (प्रतिनिधी)मोहिमेत दोन शिडाच्या बोटीतून दहा दिवसात दहा बंदरांना भेट देण्यात येणार.\रत्नागिरी, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३२ मुलगे व ११ मुली तसेच भूदल व वायू दलातील मिळून एकूण ४४ छात्रसैनिक, दोन अध्यापकीय एनसीसी आॅफीसर, ६ नौसैनिक, १ नौका प्रतिमान निदर्शक सहभागी होणार.