शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

राजापूर तालुक्यातील 'जुवे बेट' पाडणार जगाच्या नकाशावर वेगळी छाप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2022 18:59 IST

दळणवळणाची अन्य कोणतीही साधने नसलेल्या जुवे गावाची बेट म्हणून स्वतंत्र ओळख स्वातंत्र्याच्या 71 वर्षानंतर आजही कायम

विनोद पवारराजापूर :  तालुक्यात चारी बाजूंनी पाण्याने वेढलेले गाव म्हणजे जुवे. पारंपरिक छबिना म्हणजे होडी वगळता दळणवळणाची अन्य कोणतीही साधने नसलेल्या जुवे गावाची बेट म्हणून स्वतंत्र ओळख स्वातंत्र्याच्या 71 वर्षानंतर आजही कायम आहे. मात्र याठिकाणी पर्यटकांचा ओढा वाढत आहे. 

जुवे बेटावरील याच पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यावरणाचा कोणताही ऱ्हास न करता रोजगाराला चालना देत वन विभागामार्फत कांदळवन उद्यान निर्मितीचे काम हाती घेण्यात येणार आहे. याकरीता 10 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे राजापूर तालुक्यातील जुवे बेट लवकरच जगाच्या नकाशावर आपली वेगळी छाप पाडणार आहे. आमदार राजन साळवी यांच्या प्रयत्नाने व पालकमंत्री अॅड.अनिल परब यांच्या शिफारशीने चिपळुण वन विभागामार्पत कांदळवन उद्यान निर्मितीचे काम हाती घेण्यात येणार आहे. 10.60 हेक्टर क्षेत्राकरीता सुमारे 10 कोटी रूपयांची तरतुद करण्यात आली आहे.कांदळवन उद्यानाच्या माध्यमातून स्थानिक युवकांना रोजगार निर्मीती अंतर्गत खेकडा पालन, कोळंबी पालन, विविध रंगीत माशांचे उत्पादन करणे या बाबीकरीता वाव मिळणार आहे. सदर उद्यानामध्ये निसर्ग माहिती केंद्र, कांदळवन म्युझियम, तरंगते रस्त, जेटी, निरीक्षण मनोरे इत्यादी इतर कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. त्यामुळे राजापूर तालुक्यातील हे छोटेसे जुवे बेट लवकरच जगाच्या नकाशावर येणार आहे.निळ्याशार पाण्याचा वेढा ब्रिटिशकाळामध्ये राजापूरचे बंदर निर्यातीसाठी प्रसिद्ध होते. बंदरामध्ये ज्या खाडीतून जहाजे येत होती, त्या जैतापूरच्या खाडीमध्ये विलीन होणाऱ्या अर्जुना नदीच्या मुखाशी जुवे बेट वसले आहे. एका बाजूला जैतापूर बंदर, दुसऱ्या बाजूला देवाचेगोठणे, धाऊलवल्ली, मारवेली गाव आदी गावांचा सहवास लाभलेल्या जुवे बेटाला समुद्राच्या निळ्याशार पाण्याने वेढा घातलेला आहे. 

छोट्या होडीतून सुमारे तीन किलोमीटरची समुद्रसफर करून गावात प्रवेश केल्यानंतर गावपणाची साक्ष मिळते. या अनोख्या गावाचे क्षेत्र अवघे 45 हेक्टर आहे. तर या गावाची लोकसंख्या 78 इतकी असून गावात 35 घरे आहेत. 

ऐतिहासिक पार्श्वभूमीजुवे बेटाला ऐतिहासिक पार्श्वभूमीही लाभली आहे. औरंगजेबाकडून संभाजीराजांना कोकणात संगमेश्वर येथे अटक होण्यापूर्वी राजांनी सोबत असणाऱ्या ताराराणींना कोल्हापूरला सुखरूप पाठविण्यापूर्वी राजापूर किंवा सिंधुदुर्गात काही काळ ठेवण्याच्या सूचना मावळ्यांना केल्या होत्या. त्यावेळी ताराराणींना आरमाराने राजापूर खाडीमार्गे सिंधुदुर्गला नेण्यात येणार होते. ही जबाबदारी आरमारी मालोजी खोत शिंदे-कांबळी यांच्यावर होती. राजापूर खाडीच्या मुखावर व अरबी समुद्रालगत असलेल्या यशवंत गडावरील पोर्तुगीजांमुळे ताराराणींना बाहेर नेणे शक्य नव्हते. त्यामुळे काही दिवस ताराराणींना जुवे बेटावर ठेवण्यात आले. ही जबाबदारी पार पाडणाऱया मालोजी खोत शिंदे-कांबळींना हे बेट इनाम देण्यात आले. अन् जुवेवासीयांनी धरली मुंबईची वाट 

कुणाचीही वस्ती नसलेल्या जुवे गावचे कांबळी पहिले वंशज मानले जातात. किरकोळ शेती, सागरसंपत्तीवर अवलंबून असलेल्या जुवेवासीयांना काळानुरूप उदरनिर्वाहाचा प्रश्न भेडसावू लागला. त्यातून जुवेवासीयांनी मुंबईची वाट धरली. खाडीतील मुळे, खेकडे, कालवे या व्यतिरिक्त उत्पन्नाचे साधन नाही. ग्रामपंचायत आणि फळबाग लागवड योजनेच्या माध्यमातून आंबा आणि काजूची अडीच हजारांहून अधिक झाडांची लागवड झाली. गावात 1984 मध्ये वीज आली. होडी हेच संपर्काचे एकमेव साधन. गावामध्ये एकही दवाखाना वा वैद्यकीय सुविधा नाही वा दुकान नाही. जुवे गावात पारंपरिक पद्धतीची उताराची कौलारू घरे अधिक आहेत. अलीकडे चिरेबंदी आणि स्लॅबच्या घरांची उभारणी झाली आहे. आंबा, फणस, नारळ, काजू यांबरोबरच वड, काजरा, धामन, किंजळ, पिंपळ आदी झाडांमुळे आल्हाददायक वातावरण आहे. गावामध्ये श्री रवळनाथाच्या दोन प्रमुख मंदिरांबरोबरच राईतील श्री सीमराई देवीची मंदिरे आहेत. समुद्रकिनाऱयामुळे जुवे गावाला काही समस्यांना सामोरे जावे लागत आहे. असे असले तरी त्या समुद्रकिनाऱ्यामुळे तसेच निसर्गसौंदर्यामुळे गावाला पर्यटन साज चढला आहे. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी