शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

जाधव - कदम एकत्र येणार?

By admin | Updated: June 30, 2016 23:11 IST

उत्सुकता : राष्ट्रवादी काँग्रेसचा उद्या पाग येथे मेळावा

सावर्डे : पाग येथील लक्ष्मीबाई माटे सभागृहात २ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यादरम्यान एकाच व्यासपीठावर आमदार भास्कर जाधव, माजी आमदार रमेश कदम एकत्र येण्याचे संकेत मिळत आहेत. तसे झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी बळ मिळून पक्ष संघटना मजबूत होण्यास हातभार लागेल, असे कार्यकर्त्यांमधून बोलले जात आहे.जिल्ह्यात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी पक्षाने भास्कर जाधव यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. माणसे ओळखण्याची पारख, हातोटी यामुळे ते सर्वपरिचित आहेत. पालकमंत्री असताना त्यांनी जिल्ह्यात अनेक विकासकामे केली आहेत. माणसे जोडण्याची कला त्यांना चांगली अवगत आहे. वक्तृत्व शैली आणि पहाडी आवाजमुळे कार्यकर्ता आकृष्ट होतो. गुहागरात आमदार जाधव यांनी भाजपच्या विनय नातू यांना हादरा देत त्या पक्षाच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेतील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय पक्षांनी आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. काही राजकीय पक्षांनी उमेदवारांची चाचपणी करण्यास सुरूवात केली आहे. राष्ट्रवादीकडून तालुकानिहाय मेळाव्यातून कार्यकर्ते व मतदारांचा कल आजमावण्याचा प्रयत्न नेतेमंडळी करत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेता पक्ष सोडून गेला तर त्यांच्यावर अवलंबून असणारी दुसरी फळी संभ्रमावस्थेत पडते.नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये सत्ता मिळवण्यासाठी भास्कर जाधव - रमेश कदम दिलजमाई होणे आवश्यक आहे. अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीला गटातटाच्या राजकारणाने घेरले आहे. जो तो आपली प्रतिष्ठा जपण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये पक्षाचे नुकसान होत आहे. चिपळूणच्या मेळाव्याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले असून, जाधव-कदम एकत्र आले तर राजकीय समीकरणेही बदलणार आहेत. हे शक्य होईल का? असा पक्षातील नेत्यांपुढे प्रश्न पडला आहे. यामुळे या मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. जाधव यांनी राष्ट्रवादीला बळकटी देण्यासाठी शिबिर घेण्यास सुरूवात केली आहे. त्याला रमेश कदमांची साथ मिळणार का, याकडे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)जिल्ह्यात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी भास्कर जाधव यांच्यावर जबाबदारी.भास्कर जाधव, रमेश कदम एकत्र आल्यास पक्षाला बळकटी.दिलजमाई होण्याची कार्यकर्त्यांची इच्छा.