शहरं
Join us  
Trending Stories
1
Vanraj Andekar: वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून
2
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
3
अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा
4
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
5
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
6
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
7
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
8
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
9
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
10
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
11
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
12
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
13
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
14
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
15
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
16
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
17
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
18
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
19
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 
20
Pitru Paksha 2025: तिथीनुसार पितरांचे श्राद्ध करा, 'हे' लाभ मिळवा आणि तिथीच माहीत नसेल; तर... 

जाधव-कदम वादात चिपळूणची वाट लागली

By admin | Updated: November 4, 2015 00:08 IST

राजू देवळेकर : सत्ताधाऱ्यांमध्ये समन्वयच नसल्याची बोचरी टीका

चिपळूण : राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्यातील वादामुळे शहराच्या विकासाची वाट लागली आहे, असा आरोप करतानाच सत्ताधाऱ्यांमध्ये अनेक भानगडी आहेत. त्यांच्यात समन्वय नसल्याने ते कोणतीही गोष्ट गांभीर्याने घेत नाहीत, असे नगर परिषदेचे गटनेते राजू देवळेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. नगर परिषदेतील सत्ताधाऱ्यांचे विकासाकडे दुर्लक्ष झाले आहे. शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. याचा गांभीर्याने विचार करुन नियोजन करण्याची मानसिकता सत्ताधाऱ्यांमध्ये नाही. त्यांच्यामध्ये भानगडी सुरु आहेत. आपापसात आरोप-प्रत्यारोप करण्यात ते गुंतले आहेत. गेले आठ महिने विकासाकडे दुर्लक्ष झाल्याने नागरिकही हैराण झाले आहेत. आम्ही विरोधक असलो तरी केवळ विरोधाला विरोध करत नाही. सत्ताधाऱ्यांना संपूर्ण सहकार्य करू, शहराचा विकास करण्यावर आमचा भर आहे. परंतु, सत्ताधारीच हतबल असल्याने विकास खुंटला आहे, असेही देवळेकर यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला नगरसेवक शशिकांत मोदी, माधुरी पोटे, सुनील कुलकर्णी, राकेश देवळेकर, यतीन कानडे, विकी नरळकर आदी उपस्थित होते. शहर विकासासाठी आम्ही सत्ताधाऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य केले. आवश्यक तेथे नागरिकांच्यावतीने आवाज उठवला, तीव्र विरोध केला. विविध विकासकामांसाठी सत्ताधाऱ्यांबरोबर चर्चा केली. शिष्टमंडळेही नेली. तरीही त्यांच्यामध्ये फरक नाही. आता यांच्यापुढे काय करायचे, हा प्रश्न आहे. विकासाचा पाठपुरावा करुन प्रलंबित प्रकल्प मार्गी लावले पाहिजेत. खासदार विनायक राऊत रामतीर्थ तलावाच्या सुशोभिकरणासाठी निधी देणार आहेत. तीन महिने झाले तरी त्याबाबत कोणत्याही हालचाली नाहीत. आता सत्ताधाऱ्यांनी पत्र मागितल्यामुळे आम्ही पत्रही दिले आहे. पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी पालिकेला भेट देऊन निधी देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी आवश्यक ते प्रस्ताव त्यांनी मागितले आहेत. परंतु, कौन्सिलमध्ये त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडताना त्यांनी चालढकल केली, हे शोभादायक नाही. इनायत मुकादम यांच्याबाबतचा प्रकार हा शहराला काळिमा फासणारा आहे. ते सत्ताधारी पक्षाचा नगरसेवक असताना त्यांच्यावर कारवाई व्हावी, हे अयोग्य वाटते. नगरसेवक लियाकत शाह यांना व्हीप बजवावा लागतो. सदस्यांवर सत्ताधाऱ्यांचा अंकुश राहिला नाही. अनेक प्रकल्पांची कामे रखडलेली आहेत. नागरिकांना हे माहीत आहे. सत्ताधाऱ्यांनी एकही विकासकाम केले नसल्याने ताबडतोब खुर्च्या खाली व सत्ता सोडा, असे आव्हान देवळेकर यांनी दिले आहे. (प्रतिनिधी)गटनेते असूनही आपण पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या बैठकीला नगर परिषदेत उपस्थित राहिला नाहीत, असे विचारता ते म्हणाले, याबाबतचा खुलासा माझे वरिष्ठ नेते करतील, तर शहरप्रमुख म्हणून आपली निवड झाल्यानंतर काही पदाधिकाऱ्यांनी आपल्याविरोधी तक्रार केली आहे, असे निदर्शनास आणता तसे काही नाही, असेही देवळेकर यांनी स्पष्ट केले.