शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

रत्नागिरीतील जे. के. फाईल्स कंपनीला लागणार टाळे?

By मनोज मुळ्ये | Updated: June 17, 2023 19:01 IST

रत्नागिरी : शहरातील सर्वात जुन्या कंपन्यांपैकी एक असलेल्या जे. के. फाईल्स इंजिनिअरींग कंपनी बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ...

रत्नागिरी : शहरातील सर्वात जुन्या कंपन्यांपैकी एक असलेल्या जे. के. फाईल्स इंजिनिअरींग कंपनी बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. कंपनीने रत्नागिरीतील तीन डिपार्टमेंट बंद करुन तेथील कामगारांना उर्वरीत चार डिपार्टमेंटमध्ये हलवले आहे. संचालक मंडळाने शुक्रवारी (१६ जून) रत्नागिरीत येऊन कामगारांना सात लाख रुपये देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. मात्र, कंपनी बंद झाल्यास कायमस्वरुपी असलेल्या सुमारे तीनशेहून अधिक कर्मचाऱ्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होणार आहे.रत्नागिरी येथील मिरजोळे एमआयडीसीमध्ये सुमारे पंचेचाळीस वर्षापूर्वी १९७८ मध्ये जे. के. फाईल्स इंजिनिअरींग ही कंपनी सुरु झाली. या कंपनीत रत्नागिरीतील शेकडोजण नोकरी करत आहेत. आजही या कंपनीत सुमारे तीनशे ते चारशे कामगार कायमस्वरुपी या ठिकाणी कामाला आहेत. या कंपनीमध्ये पूर्वी सात डिपार्टमेंटमध्ये काम चालत होते. फाईल्स तयार करण्याचे काम त्यानंतर मिरजोळे एमआयडीसीत अन्य ठिकाणी देण्यात येत होते.या कंपनीतून रत्नागिरीत बाहेर देण्यात येणारी काम बंद झाली आहेत. तर कंपनीमध्ये असणारे ठेकेदारांचे कामगारही हळूहळू कमी करण्यात येऊ लागले. मालाला उठाव नसल्याचे कारण देत संचालक मंडळाने कामही कमी केले. याचवेळी चिपळूण खडपोलीतील कामे मात्र वाढली आहेत.जे. के. फाईल्स कंपनीचे काही संचालक रत्नागिरीत आले होते. त्यांनी कामगारांशी संवाद साधला. यावेळी मालाचा उठाव होत नाही व कंपनीला परवडत नसल्याचे सांगण्यात आले. कंपनी कामगारांना प्रत्येकी सात लाख व अन्य योजनांचा लाभ देण्यास तयार असल्याचे सांगण्यात आले. मात्र कामगारांकडून फारसा प्रतिसाद त्यांना मिळाला नाही. परंतु, कंपनी बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे कामगारांकडून सांगितले जात आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी