शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

गुणवत्तावाढीने आयटीआय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:36 IST

क्षमतेपेक्षा अधिक अर्ज, गतवर्षीच्या तुलनेत मात्र संख्या घटली मेहरून नाकाडे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : गुणवत्ता वाढल्यामुळे महाविद्यालय प्रवेशाकडे ...

क्षमतेपेक्षा अधिक अर्ज, गतवर्षीच्या तुलनेत मात्र संख्या घटली

मेहरून नाकाडे

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : गुणवत्ता वाढल्यामुळे महाविद्यालय प्रवेशाकडे विद्यार्थ्यांचा कल अधिक असल्यामुळे औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील प्रवेशाकडे ओढा कमी आहे. त्यासाठी प्रवेश प्रोत्साहन अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त अर्ज दाखल झाले असले तरी गतवर्षीच्या तुलनेत मात्र घट झाली आहे.

औद्याेगिक प्रशिक्षण संस्थेत तुलनेने कमी अर्ज प्राप्त झाले. शहरी तसेच ग्रामीण भागात जनजागृती करण्यासाठी प्रवेश प्रोत्साहन अभियान राबविण्याचा निर्णय घेतला असून, त्यानुसार जनजागृती करण्यात येत आहे. प्रशिक्षण केंद्रातील काही महत्त्वपूर्ण ट्रेडकडे विद्यार्थ्यांचा ओढा अधिक असल्याने प्रवेशासाठी गुणवत्तेचा कस लागण्याची शक्यता आहे.

ठरावीक अभ्यासक्रमासाठी मोजक्याच जागा आहेत. त्यामुळे गुणवत्तेची खरी कसोटी लागणार आहे. अन्य अभ्यासक्रमाला प्रवेश मिळणार असेल तर अकरावी, बारावीनंतरही वेगळा अभ्यासक्रम निवडता येईल. दोन्हीकडे अर्ज भरला आहे.

-एम. ए. खान, रत्नागिरी

वर्षानुवर्षेे काही ठरावीक अभ्यासक्रमासाठी जागा निश्चित आहेत. त्यामुळे प्रवेश मिळत नाहीत. शासनाने चटकन रोजगाराची संधी उपलब्ध करून देणाऱ्या अभ्यासक्रमांच्या जागा वाढविणे गरजेचे आहे. काही अभ्यासक्रमाच्या जागा मात्र शिल्लक राहत आहेत.

- शुभम शिंदे, जयगड

गतवर्षी जिल्ह्यातील २९७२ जागांसाठी ४४०० अर्ज प्राप्त झाले होते. त्या तुलनेत यावर्षी संख्या घटली आहे.

प्रवेशासाठी दि. ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आतापर्यंत ३४०० अर्ज प्राप्त झाले असून, गतवर्षीच्या तुलनेत एक हजार अर्जाची घट झाली आहे.

ठरावीक अभ्यासक्रमाकडे मात्र कल असल्याने प्रवेशासाठी गुणवत्तेचा कस लागेल, त्यामुळे महाविद्यालय प्रवेशही घेतला आहे.

तत्काळ नोकरीची संधी उपलब्ध होणाऱ्या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा अधिक असल्याने गुणवत्तेचा कस लागतो.

- शशिकांत काेतवडेकर, जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी

प्रत्येक अभ्यासक्रम नक्कीच महत्त्वपूर्ण असून, त्यामुळे नोकरी किंवा व्यवसायाची संधी उपलब्ध होते. मात्र विद्यार्थी ठरावीक ट्रेडसाठी गर्दी करतात.

- खालिद कालसेकर, प्राचार्य, हाजी मोहम्मद ठाकूर औद्योगिक प्रशिक्षण संस्था, करंजारी