शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता सुरक्षिततेसाठी लोकांमध्ये स्वयंशिस्त निर्माण होणे गरजेचे

By शोभना कांबळे | Updated: August 23, 2023 15:37 IST

जिल्हा न्यायालयात आयोजित वाहतूक सुरक्षा जनजागृती कार्यक्रमात मान्यवरांनी केले विचार व्यक्त 

रत्नागिरी : केवळ शिक्षा करून, कारवाया करून वाहतूक शिस्तीचा प्रश्न सुटणार नाही, त्यासाठी लोकांमध्ये स्वयंशिस्त निर्माण हाेणे, लोकांनी स्वत:हून आपली व इतरांचीही सुरक्षितता सांभाळली पाहिजे. यादृष्टीने त्यांच्यात जागृती होणे गरजेचे असल्याचे मत वाहतूक आणि रस्ते सुरक्षा जनजागृती कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांनी व्यक्त केले.जिल्हा न्यायालयाच्या आवारात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि जिल्हा पोलिस दल यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी वाहतूक आणि रस्ते सुरक्षा जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनायक जोशी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य न्याय दंडाधिकारी राहूल चाैत्रे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव निखिल गोसावी, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हनकर, जिल्हा पोलिस अधिक्षक धनंजय कुलकर्णी, सहायक पोलिस निरीक्षक सुधीर धायरकर आणि वकील बार संघाचे अध्यक्ष दिलीप धारिया, सरकारी वकील अनिरूद्ध फणसेकर आदी प्रमुख अतिथी उपस्थित होते.प्रारंभी प्राधिकरणचे सचिव निखिल गोसावी यांनी प्रास्ताविकात सांगितले की, अपघाताचे प्रमाण वाढत आहे. दुचाकीचे होणारे अपघात आणि त्यात होणारे मृत्यू हे केवळ आणि केवळ हेल्मेट न घातल्याने होत असल्याचे दिसून येते. युवा पिढी ही देशाचे भवितव्य असल्याने या पिढीने हेल्मेट घातलेच पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन त्यांनी केले.सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हनकर यांनी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून विविध जागृतीचे उपक्रम राबवीत असल्याने अपघातांची संख्या ३० टक्केपर्यंत खाली असल्याचे सांगितले. या कार्यालयाकडून सातत्याने जागृतीचे उपक्रम राबवीत असल्याची माहिती त्यांनी दिली.धनंजय कुलकर्णी यांनी न्यायाधीशांनीच महत्वाचे काम हाती घेतल्याबद्दल जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला धन्यवाद दिले. ते म्हणाले केवळ, दंड, चालान भरून, कारवाया करून दरवर्षी प्रश्न सुटणार नाहीत. त्यासाठी लोकांमध्ये स्वयंशिस्त - जागृती होणे गरजेचे आहे.जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी वाहन चालविताना शरीर गाडीवर आणि मन दुसरीकडे भरकटत स्पष्ट केले. नागरिकांमध्ये काॅमन सेन्स असणे गरजेचे आहेत. वाहतुकीच्या नियमांबाबत त्यांच्यात जागरूकता निर्माण होण्याची गरज ज्यांनी व्यक्त केली.प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनायक जोशी यांनी अध्यक्षीय भाषणात समाजातील सर्वच घटकांकडून याबाबत जागृती होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. सह दिवाणी न्यायाधीश आर. बी. यादव यांनी आभारप्रदर्शन केले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीroad safetyरस्ते सुरक्षा