शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

Chiplun Floods: "कुणाचेही संसार वाहून जाताना पाहणं हे माेठे दु:ख; वर्दीतला माणूसही हेलावून जातो!"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 12:47 IST

रत्नागिरी : संकटात सापडलेल्या लोकांना मदत करणे ही आमची जबाबदारीच आहे, ती आम्ही निभावतच असतो; परंतु निष्पाप लोकांचे संसार ...

रत्नागिरी : संकटात सापडलेल्या लोकांना मदत करणे ही आमची जबाबदारीच आहे, ती आम्ही निभावतच असतो; परंतु निष्पाप लोकांचे संसार जेव्हा उघड्या डोळ्यासमोर वाहून जाताना दिसतात तेव्हा आमच्या वर्दीतला माणूसही हेलावूनच जातो, अशा शब्दात तब्बल ९ दिवस चिपळूणमध्ये मदतकार्यासाठी तळ ठोकून बसलेल्या रत्नागिरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांनी भावना व्यक्त केल्या. कुणाचेही संसार वाहून जाताना पाहून जे दु:ख हाेते ते शब्दात नाही सांगता येऊ शकत, असेही वाघमारे म्हणाले.

चिपळूणला आलेल्या महापुराने अनेकांवर आर्थिक, सामाजिक आणि भावनिक आघात केले. या महापुरात ज्यांचे सर्वस्व वाहून गेले त्यांना आधार देण्यासाठी हजारो हात उभे राहिले. यावेळी रत्नागिरी पोलिसांनी आपली जबाबदारी चोख बजावली. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी चौकटीच्या बाहेर जाऊन काम केले. यामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्यावर डॉ. गर्ग यांनी विशेष जबाबदारी सोपविली होती. ती जबाबदारी निभावताना वाघमारे यांनी अनेकांचा उघड्यावर आलेला संसार पाहिला. ही सारी परिस्थिती पाहून त्यांनाही गहिवरून आले.

पुराबाबतच्या आठवणी सांगताना त्यांनी सांगितले की, महापुराची स्थिती जसजशी गंभीर होत होती तसे लोकांचे मदतीसाठी मोठ्या संख्यने सोशल मीडिया किंवा फोनद्वारे मेसेज होते. प्रत्येकाला मदत हवी होती. अशावेळी हे संदेश एकत्रित करून प्रत्येकापर्यंत किमान संपर्क साधण्याचा किंवा पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न केला. सुटका आणि मदतीसाठी जे-जे शक्य असेल ते-ते आम्ही त्यावेळी केले.

तर जसजसा पूर कमी होत होता तसतशा येणाऱ्या इतर समस्यांकडे आम्ही वळलो आणि त्यानुसार कामांचे नियोजन आखले. पूर कमी झाल्यानंतर चिपळूणमध्ये मदतीचे ओघ वाढले; मात्र त्यामुळे वाहतूक नियंत्रण करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले. पुरामुळे चिपळूणची दुरवस्था झाली होती. स्वच्छता हा मोठा विषय होता. जे स्वच्छता कर्मचारी कार्यरत होते त्यांच्या मदतीला आम्ही उभे राहिलो, त्यांना मदत केली, काम करताना अडचण आल्यास ती सोडवण्यास मदत केली. चिखल गाळ काढण्यासाठी पोलिसांनीही मदत सुरू केली. चिखल, गाळ काढण्यासाठी ३ जेसीबी आणि ६ डंपर उपलब्ध करण्यात आले हाेते, असे वाघमारे यांनी सांगितले.

पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री यांच्यासह लोकप्रतिनिधींचे मोठ्या प्रमाणात दौरे सुरू झाले. त्या दौऱ्यांचे नियोजनही करण्याची जबाबदारी हाेतीच. त्यासाठी २० अधिकारी आणि १४० अंमलदार चिपळूण येथे कार्यरत होते, असे वाघमारे यांनी सांगितले. यापूर्वी २०१९ ला आलेल्या महापुरावेळी मी नाशिकला होतो. तेथेही पुरामुळे अनेक संसार उघड्यावर आलेले पाहिले आहेत. चिपळूणची आपत्ती ही नाशिकपेक्षा मोठी होती; पण कुणाचेही संसार वाहून जाताना पाहणे हे खरंच मोठे दुःख असते. ते दुःख दोन्ही ठिकाणी मी अनुभवलेत; परंतु त्याचवेळी अशा संकटाच्या काळात माणूस जात, धर्म विसरून माणसाच्या पाठीशी मदतीच्या रूपाने कसा उभा राहतो, हेही चिपळूण आपत्तीच्या निमित्ताने दिसल्याचे वाघमारे यांनी सांगितले.

टॅग्स :chiplun floodचिपळूणला महापुराचा वेढाRatnagiri Floodरत्नागिरी पूर