शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ओमानमध्ये अडकून पडलेले इकबाल पावसकर २७ वर्षानंतर मायदेशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 20:38 IST

आोमान येथे गेल्यानंतर तिथे कोसळलेल्या विविध संकटामुळे तब्बल २७ वर्षे तिथे अडकून पडले.

शोभना कांबळे

रत्नागिरी : आोमान येथे गेल्यानंतर तिथे कोसळलेल्या विविध संकटामुळे तब्बल २७ वर्षे या देशात अडकून पडलेल्या इकबाल पावसकर यांच्यासाठी देवदूत ठरलेल्या मुस्लीम वेल्फेअर समितीने त्यांना आपल्या मायदेशीच नव्हे तर रत्नागिरी नजिकच्या केळ्ये मजगाव येथील घरीही सुखरूप आणले. एवढेच नव्हे तर तिथल्या रूग्णालयात दाखल असल्याने झालेला खर्चही मोफत करायला लावला. यात मुस्लीम वेल्फेअर समितीचे अकील नाईक आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे.

एखादी व्यक्ती परदेशात कामाला गेल्यानंतर तिथे कोसळलेल्या विविध संकटांमुळे मायदेशी परतण्याचे सर्व दोर कापले जातात. मात्र कर्मधर्म संयोगाने त्याच्या देशातील काही लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून याची माहिती मिळते आणि त्यांच्या मदतीने ही व्यक्ती तब्बल २७ वर्षानंतर पुन्हा आपल्या मायदेशी भारतात परतते. चित्रपटाच्या कथेप्रमाणे ही सत्यकथा आहे इकबाल पावसकर यांची आणि त्यांची तारणहार ठरलेली संस्था आहे लांजातील मुस्लिम वेल्फेअर सोसायटी आणि तिचे कार्याध्यक्ष अकिल नाईक व सहकारी. या सोसायटीच्या माध्यमातून सामाजिक काम करणारे अकिल नाईक हे नोकरी निमित्ताने परदेशात काम करतात. काही महिन्यापूर्वी ते ओमान देशात गेले होते.

यावेळी त्यांना इकबाल हसन पावसकर हे बेपत्ता असल्याचा फोटो व्हॉटसअ‍ॅपवर फिरताना दिसला. त्यावेळी काही व्यक्तींनी या फोटोबाबत चौकशी केली. अखेर ही व्यक्ती तेथील एका हॉस्पिटलमध्ये असल्याची माहिती मिळाली. अकिल नाईक तिथे गेले तेव्हा  इक्बाल पावसकर तिथे असल्याची माहिती मिळाली. मात्र त्यांच्याकडे ओळखपत्राचा कोणताही पुरावा नव्हता. त्यामुळे त्यांची ओळख पटवण्यात प्रचंड मेहनत घ्यावी लागली. पावसकर याचे हॉस्पिटलचे जवळपास ४-५ लाखांचे बिल झाले होते. हे बिल मुस्लीम वेल्फेअर सोसायटीच्या सदस्यांनी मोफत करुन घेतले.

तिथून त्यांना भारतात आणायचे कसे,असा प्रश्न निर्माण झाला.  कोणतीच कागदपत्रे नसल्याने  भारतात नेण्यासाठी पासपोर्ट काढणे कठीण झाले होते. मात्र, तेथील कामगार विभागाचे अहमद यांनी सुमारे ३ लाखापर्यंत दंड मुस्लिम वेलफेयर सोसायटी यांच्या सांगण्यावर माफ केला.  इंडियन एम्बसी सलालाचे प्रमुख एजन्ट सनानाथ थार यांच्या सहकार्यामुळे आऊट पासपोर्टसाठी मदत केली. पण काही पुरावा नसल्याने पासपोर्ट अडकला. अखेर मस्कत येथे कार्यरत असणारी AIM (डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल मिशन ) ओमानचे प्रकाश पंडित यांच्या प्रयत्नामुळे पावसकर यांचा पासपोर्ट तयार झाला आणि मुस्लिम वेलफेअर सोसायटीच्या माध्यमातून ते भारतात येण्यास निघाले.

इकबाल यांची मानसिक स्थिती बरोबर नसल्याने विमान प्रवासात त्यांचे लहान मुलासारखे पण त्रासदायक चाळे सुरू होते. अखेर कसाबसा हा प्रवास पार करत ते भारतात परतले आणि मुस्लिम वेल्फेअर सोसायटीचे अकील नाईक आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या अथक प्रयत्नाने ते तब्बल २७ वर्षानंतर आपल्या कुटुंबात पोहोचले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी