शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

ओमानमध्ये अडकून पडलेले इकबाल पावसकर २७ वर्षानंतर मायदेशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 20:38 IST

आोमान येथे गेल्यानंतर तिथे कोसळलेल्या विविध संकटामुळे तब्बल २७ वर्षे तिथे अडकून पडले.

शोभना कांबळे

रत्नागिरी : आोमान येथे गेल्यानंतर तिथे कोसळलेल्या विविध संकटामुळे तब्बल २७ वर्षे या देशात अडकून पडलेल्या इकबाल पावसकर यांच्यासाठी देवदूत ठरलेल्या मुस्लीम वेल्फेअर समितीने त्यांना आपल्या मायदेशीच नव्हे तर रत्नागिरी नजिकच्या केळ्ये मजगाव येथील घरीही सुखरूप आणले. एवढेच नव्हे तर तिथल्या रूग्णालयात दाखल असल्याने झालेला खर्चही मोफत करायला लावला. यात मुस्लीम वेल्फेअर समितीचे अकील नाईक आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे.

एखादी व्यक्ती परदेशात कामाला गेल्यानंतर तिथे कोसळलेल्या विविध संकटांमुळे मायदेशी परतण्याचे सर्व दोर कापले जातात. मात्र कर्मधर्म संयोगाने त्याच्या देशातील काही लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून याची माहिती मिळते आणि त्यांच्या मदतीने ही व्यक्ती तब्बल २७ वर्षानंतर पुन्हा आपल्या मायदेशी भारतात परतते. चित्रपटाच्या कथेप्रमाणे ही सत्यकथा आहे इकबाल पावसकर यांची आणि त्यांची तारणहार ठरलेली संस्था आहे लांजातील मुस्लिम वेल्फेअर सोसायटी आणि तिचे कार्याध्यक्ष अकिल नाईक व सहकारी. या सोसायटीच्या माध्यमातून सामाजिक काम करणारे अकिल नाईक हे नोकरी निमित्ताने परदेशात काम करतात. काही महिन्यापूर्वी ते ओमान देशात गेले होते.

यावेळी त्यांना इकबाल हसन पावसकर हे बेपत्ता असल्याचा फोटो व्हॉटसअ‍ॅपवर फिरताना दिसला. त्यावेळी काही व्यक्तींनी या फोटोबाबत चौकशी केली. अखेर ही व्यक्ती तेथील एका हॉस्पिटलमध्ये असल्याची माहिती मिळाली. अकिल नाईक तिथे गेले तेव्हा  इक्बाल पावसकर तिथे असल्याची माहिती मिळाली. मात्र त्यांच्याकडे ओळखपत्राचा कोणताही पुरावा नव्हता. त्यामुळे त्यांची ओळख पटवण्यात प्रचंड मेहनत घ्यावी लागली. पावसकर याचे हॉस्पिटलचे जवळपास ४-५ लाखांचे बिल झाले होते. हे बिल मुस्लीम वेल्फेअर सोसायटीच्या सदस्यांनी मोफत करुन घेतले.

तिथून त्यांना भारतात आणायचे कसे,असा प्रश्न निर्माण झाला.  कोणतीच कागदपत्रे नसल्याने  भारतात नेण्यासाठी पासपोर्ट काढणे कठीण झाले होते. मात्र, तेथील कामगार विभागाचे अहमद यांनी सुमारे ३ लाखापर्यंत दंड मुस्लिम वेलफेयर सोसायटी यांच्या सांगण्यावर माफ केला.  इंडियन एम्बसी सलालाचे प्रमुख एजन्ट सनानाथ थार यांच्या सहकार्यामुळे आऊट पासपोर्टसाठी मदत केली. पण काही पुरावा नसल्याने पासपोर्ट अडकला. अखेर मस्कत येथे कार्यरत असणारी AIM (डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल मिशन ) ओमानचे प्रकाश पंडित यांच्या प्रयत्नामुळे पावसकर यांचा पासपोर्ट तयार झाला आणि मुस्लिम वेलफेअर सोसायटीच्या माध्यमातून ते भारतात येण्यास निघाले.

इकबाल यांची मानसिक स्थिती बरोबर नसल्याने विमान प्रवासात त्यांचे लहान मुलासारखे पण त्रासदायक चाळे सुरू होते. अखेर कसाबसा हा प्रवास पार करत ते भारतात परतले आणि मुस्लिम वेल्फेअर सोसायटीचे अकील नाईक आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या अथक प्रयत्नाने ते तब्बल २७ वर्षानंतर आपल्या कुटुंबात पोहोचले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी