शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

ओमानमध्ये अडकून पडलेले इकबाल पावसकर २७ वर्षानंतर मायदेशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 20:38 IST

आोमान येथे गेल्यानंतर तिथे कोसळलेल्या विविध संकटामुळे तब्बल २७ वर्षे तिथे अडकून पडले.

शोभना कांबळे

रत्नागिरी : आोमान येथे गेल्यानंतर तिथे कोसळलेल्या विविध संकटामुळे तब्बल २७ वर्षे या देशात अडकून पडलेल्या इकबाल पावसकर यांच्यासाठी देवदूत ठरलेल्या मुस्लीम वेल्फेअर समितीने त्यांना आपल्या मायदेशीच नव्हे तर रत्नागिरी नजिकच्या केळ्ये मजगाव येथील घरीही सुखरूप आणले. एवढेच नव्हे तर तिथल्या रूग्णालयात दाखल असल्याने झालेला खर्चही मोफत करायला लावला. यात मुस्लीम वेल्फेअर समितीचे अकील नाईक आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे.

एखादी व्यक्ती परदेशात कामाला गेल्यानंतर तिथे कोसळलेल्या विविध संकटांमुळे मायदेशी परतण्याचे सर्व दोर कापले जातात. मात्र कर्मधर्म संयोगाने त्याच्या देशातील काही लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून याची माहिती मिळते आणि त्यांच्या मदतीने ही व्यक्ती तब्बल २७ वर्षानंतर पुन्हा आपल्या मायदेशी भारतात परतते. चित्रपटाच्या कथेप्रमाणे ही सत्यकथा आहे इकबाल पावसकर यांची आणि त्यांची तारणहार ठरलेली संस्था आहे लांजातील मुस्लिम वेल्फेअर सोसायटी आणि तिचे कार्याध्यक्ष अकिल नाईक व सहकारी. या सोसायटीच्या माध्यमातून सामाजिक काम करणारे अकिल नाईक हे नोकरी निमित्ताने परदेशात काम करतात. काही महिन्यापूर्वी ते ओमान देशात गेले होते.

यावेळी त्यांना इकबाल हसन पावसकर हे बेपत्ता असल्याचा फोटो व्हॉटसअ‍ॅपवर फिरताना दिसला. त्यावेळी काही व्यक्तींनी या फोटोबाबत चौकशी केली. अखेर ही व्यक्ती तेथील एका हॉस्पिटलमध्ये असल्याची माहिती मिळाली. अकिल नाईक तिथे गेले तेव्हा  इक्बाल पावसकर तिथे असल्याची माहिती मिळाली. मात्र त्यांच्याकडे ओळखपत्राचा कोणताही पुरावा नव्हता. त्यामुळे त्यांची ओळख पटवण्यात प्रचंड मेहनत घ्यावी लागली. पावसकर याचे हॉस्पिटलचे जवळपास ४-५ लाखांचे बिल झाले होते. हे बिल मुस्लीम वेल्फेअर सोसायटीच्या सदस्यांनी मोफत करुन घेतले.

तिथून त्यांना भारतात आणायचे कसे,असा प्रश्न निर्माण झाला.  कोणतीच कागदपत्रे नसल्याने  भारतात नेण्यासाठी पासपोर्ट काढणे कठीण झाले होते. मात्र, तेथील कामगार विभागाचे अहमद यांनी सुमारे ३ लाखापर्यंत दंड मुस्लिम वेलफेयर सोसायटी यांच्या सांगण्यावर माफ केला.  इंडियन एम्बसी सलालाचे प्रमुख एजन्ट सनानाथ थार यांच्या सहकार्यामुळे आऊट पासपोर्टसाठी मदत केली. पण काही पुरावा नसल्याने पासपोर्ट अडकला. अखेर मस्कत येथे कार्यरत असणारी AIM (डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल मिशन ) ओमानचे प्रकाश पंडित यांच्या प्रयत्नामुळे पावसकर यांचा पासपोर्ट तयार झाला आणि मुस्लिम वेलफेअर सोसायटीच्या माध्यमातून ते भारतात येण्यास निघाले.

इकबाल यांची मानसिक स्थिती बरोबर नसल्याने विमान प्रवासात त्यांचे लहान मुलासारखे पण त्रासदायक चाळे सुरू होते. अखेर कसाबसा हा प्रवास पार करत ते भारतात परतले आणि मुस्लिम वेल्फेअर सोसायटीचे अकील नाईक आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या अथक प्रयत्नाने ते तब्बल २७ वर्षानंतर आपल्या कुटुंबात पोहोचले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी