शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

आंबा बागेत आवळ्याचे आंतरपीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:33 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : वडिलोपार्जित मिठाई व्यवसाय असला तरी आदित्य प्रसन्न गांधी यांनी दाभिळआंबेरे येथे बागायत शेती फुलविली ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : वडिलोपार्जित मिठाई व्यवसाय असला तरी आदित्य प्रसन्न गांधी यांनी दाभिळआंबेरे येथे बागायत शेती फुलविली आहे. मिठाई व्यवसायासाठी मदत करीत असतानाच आदित्य यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर बागायती शेतीकडे लक्ष केंद्रित केले आहे. आंबा बागेत आवळ्याचे आंतरपीक घेतले असून, दीड टन आवळा उत्पादन त्यांना प्राप्त झाले आहे.

त्यांनी हापूसची १,४०० कलमे लावली असून, वेंगुर्ला ७ या विद्यापीठ प्रमाणित काजूची १,९०० कलमे लावली आहेत, तसेच ६० नारळांची लागवडही केली आहे. हापूस कलमांच्या बागेत संरक्षक भिंतीच्या कडेने शंभर आवळ्याची झाडे लावली आहेत. २००१ साली लागवड केलेल्या आवळ्याचे उत्पन्न सुरू झाले असून, वर्षाला एक ते दीड टन आवळा प्राप्त होत आहे.

शेतीला जोड म्हणून आदित्य यांनी कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला आहे. एका शेडमध्ये साडेचारशे पक्षी याप्रमाणे आठ शेड उभारले आहेत. त्यांची जिल्ह्यातच विक्री होत आहे. याशिवाय खतासाठी कोंबड्यांची विष्ठाही ते विक्री करीत असून, त्यातूनही उत्पन्न त्यांना प्राप्त होत आहे.

बागेत जमा होणारा पालापाचोळा, काडीकचरा एकत्र करून त्यापासून खतनिर्मिती युनिट उभारण्यावर त्यांनी भर दिला आहे. खत व्यवस्थापनापासून आंबा, काजू, नारळ, आवळा उत्पादनासाठी योग्य नियोजन, कृषी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आदित्य घेत आहेत. यावर्षी हवामानातील बदलामुळे एकूणच उत्पादन कमी असले तरी आदित्य यांच्या बागेतील उत्पन्न व दर्जा चांगला आहे. ते आंबा मुंबई, पुणे येथे विक्रीसाठी पाठवीत आहेत, तर काजूवर प्रक्रिया करून विक्री करीत आहेत. आवळा व नारळासाठी मात्र स्थानिक बाजारपेठेतच चांगली मागणी होत आहे.

सेंद्रिय खत युनिट

सेंद्रिय उत्पादनावर आदित्य यांनी भर दिला आहे. त्यामुळे बागेत पडलेला पालापाचोळा, काडीकचरा एकत्र करून त्यापासून खतनिर्मिती युनिट उभारणीचे काम सध्या सुरू आहे. सेंद्रिय खतामुळे त्यांच्याकडील उत्पादन व दर्जा राखण्यात त्यांनी यश मिळविले असून, त्यासाठी खतनिर्मिती स्वत:च करणार असल्याचे सांगितले. यापुढे सेंद्रिय खत विकत न आणता, स्वत:च निर्मिती करण्यावर त्यांचा भर आहे.

काजूवर प्रक्रिया

आदित्य यांच्या बागेत १९०० काजू कलमांची लागवड केली असून, साधारणत: वर्षाला आठ ते नऊ टन काजू उत्पादन प्राप्त होते. यावर्षी हवामानातील बदलामुळे उत्पादन निम्म्यापेक्षा कमी प्राप्त झाले आहे. मात्र, अखंड काजू बी विक्रीऐवजी काजूवर प्रक्रिया करून विक्री करीत आहेत. त्यासाठी ग्राहकांकडून चांगली मागणी होत आहे. यावर्षी काजू उत्पादनही घटले असल्याचे त्यांनी नमूद केले.

आवळा विक्री

आंबा बागेतच आवळ्याचे आंतरपीक घेण्यात येत आहे. आवळा पिकासाठी फारशी मेहनत घ्यावी लागत नाही. प्रक्रिया व्यावसायिकांकडून आवळ्याला चांगली मागणी असल्याने आवळ्याचा खप हातोहात होतो. आवळ्याचा आकार, दर्जा चांगला असल्याने आंतरपिकातून बऱ्यापैकी उत्पन्न प्राप्त होत आहे. झाडेही लहान असल्याने काढणीही सोपी होत आहे.