शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
2
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
3
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
4
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
5
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
6
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
7
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
8
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
9
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
10
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
11
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
12
विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर  
13
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
14
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
15
ना कोळसा, ना डिझेल, ना वीज, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन या इंधनावर चालणार? चाचणी यशस्वी
16
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
17
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे
18
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
19
गाजलेल्या शिक्षक हत्येतील आरोपी कळंबा जेलमधून पसार, कावळेसादच्या दरीत सापडला होता मृतदेह
20
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर

आंबा बागेत आवळ्याचे आंतरपीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:33 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : वडिलोपार्जित मिठाई व्यवसाय असला तरी आदित्य प्रसन्न गांधी यांनी दाभिळआंबेरे येथे बागायत शेती फुलविली ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : वडिलोपार्जित मिठाई व्यवसाय असला तरी आदित्य प्रसन्न गांधी यांनी दाभिळआंबेरे येथे बागायत शेती फुलविली आहे. मिठाई व्यवसायासाठी मदत करीत असतानाच आदित्य यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर बागायती शेतीकडे लक्ष केंद्रित केले आहे. आंबा बागेत आवळ्याचे आंतरपीक घेतले असून, दीड टन आवळा उत्पादन त्यांना प्राप्त झाले आहे.

त्यांनी हापूसची १,४०० कलमे लावली असून, वेंगुर्ला ७ या विद्यापीठ प्रमाणित काजूची १,९०० कलमे लावली आहेत, तसेच ६० नारळांची लागवडही केली आहे. हापूस कलमांच्या बागेत संरक्षक भिंतीच्या कडेने शंभर आवळ्याची झाडे लावली आहेत. २००१ साली लागवड केलेल्या आवळ्याचे उत्पन्न सुरू झाले असून, वर्षाला एक ते दीड टन आवळा प्राप्त होत आहे.

शेतीला जोड म्हणून आदित्य यांनी कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला आहे. एका शेडमध्ये साडेचारशे पक्षी याप्रमाणे आठ शेड उभारले आहेत. त्यांची जिल्ह्यातच विक्री होत आहे. याशिवाय खतासाठी कोंबड्यांची विष्ठाही ते विक्री करीत असून, त्यातूनही उत्पन्न त्यांना प्राप्त होत आहे.

बागेत जमा होणारा पालापाचोळा, काडीकचरा एकत्र करून त्यापासून खतनिर्मिती युनिट उभारण्यावर त्यांनी भर दिला आहे. खत व्यवस्थापनापासून आंबा, काजू, नारळ, आवळा उत्पादनासाठी योग्य नियोजन, कृषी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आदित्य घेत आहेत. यावर्षी हवामानातील बदलामुळे एकूणच उत्पादन कमी असले तरी आदित्य यांच्या बागेतील उत्पन्न व दर्जा चांगला आहे. ते आंबा मुंबई, पुणे येथे विक्रीसाठी पाठवीत आहेत, तर काजूवर प्रक्रिया करून विक्री करीत आहेत. आवळा व नारळासाठी मात्र स्थानिक बाजारपेठेतच चांगली मागणी होत आहे.

सेंद्रिय खत युनिट

सेंद्रिय उत्पादनावर आदित्य यांनी भर दिला आहे. त्यामुळे बागेत पडलेला पालापाचोळा, काडीकचरा एकत्र करून त्यापासून खतनिर्मिती युनिट उभारणीचे काम सध्या सुरू आहे. सेंद्रिय खतामुळे त्यांच्याकडील उत्पादन व दर्जा राखण्यात त्यांनी यश मिळविले असून, त्यासाठी खतनिर्मिती स्वत:च करणार असल्याचे सांगितले. यापुढे सेंद्रिय खत विकत न आणता, स्वत:च निर्मिती करण्यावर त्यांचा भर आहे.

काजूवर प्रक्रिया

आदित्य यांच्या बागेत १९०० काजू कलमांची लागवड केली असून, साधारणत: वर्षाला आठ ते नऊ टन काजू उत्पादन प्राप्त होते. यावर्षी हवामानातील बदलामुळे उत्पादन निम्म्यापेक्षा कमी प्राप्त झाले आहे. मात्र, अखंड काजू बी विक्रीऐवजी काजूवर प्रक्रिया करून विक्री करीत आहेत. त्यासाठी ग्राहकांकडून चांगली मागणी होत आहे. यावर्षी काजू उत्पादनही घटले असल्याचे त्यांनी नमूद केले.

आवळा विक्री

आंबा बागेतच आवळ्याचे आंतरपीक घेण्यात येत आहे. आवळा पिकासाठी फारशी मेहनत घ्यावी लागत नाही. प्रक्रिया व्यावसायिकांकडून आवळ्याला चांगली मागणी असल्याने आवळ्याचा खप हातोहात होतो. आवळ्याचा आकार, दर्जा चांगला असल्याने आंतरपिकातून बऱ्यापैकी उत्पन्न प्राप्त होत आहे. झाडेही लहान असल्याने काढणीही सोपी होत आहे.