शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
4
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
5
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
6
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
7
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
8
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
9
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
10
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
11
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
12
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
13
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
14
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
15
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
16
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
17
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
19
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
20
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया

आंबा बागेत आवळ्याचे आंतरपीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:33 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : वडिलोपार्जित मिठाई व्यवसाय असला तरी आदित्य प्रसन्न गांधी यांनी दाभिळआंबेरे येथे बागायत शेती फुलविली ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : वडिलोपार्जित मिठाई व्यवसाय असला तरी आदित्य प्रसन्न गांधी यांनी दाभिळआंबेरे येथे बागायत शेती फुलविली आहे. मिठाई व्यवसायासाठी मदत करीत असतानाच आदित्य यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर बागायती शेतीकडे लक्ष केंद्रित केले आहे. आंबा बागेत आवळ्याचे आंतरपीक घेतले असून, दीड टन आवळा उत्पादन त्यांना प्राप्त झाले आहे.

त्यांनी हापूसची १,४०० कलमे लावली असून, वेंगुर्ला ७ या विद्यापीठ प्रमाणित काजूची १,९०० कलमे लावली आहेत, तसेच ६० नारळांची लागवडही केली आहे. हापूस कलमांच्या बागेत संरक्षक भिंतीच्या कडेने शंभर आवळ्याची झाडे लावली आहेत. २००१ साली लागवड केलेल्या आवळ्याचे उत्पन्न सुरू झाले असून, वर्षाला एक ते दीड टन आवळा प्राप्त होत आहे.

शेतीला जोड म्हणून आदित्य यांनी कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला आहे. एका शेडमध्ये साडेचारशे पक्षी याप्रमाणे आठ शेड उभारले आहेत. त्यांची जिल्ह्यातच विक्री होत आहे. याशिवाय खतासाठी कोंबड्यांची विष्ठाही ते विक्री करीत असून, त्यातूनही उत्पन्न त्यांना प्राप्त होत आहे.

बागेत जमा होणारा पालापाचोळा, काडीकचरा एकत्र करून त्यापासून खतनिर्मिती युनिट उभारण्यावर त्यांनी भर दिला आहे. खत व्यवस्थापनापासून आंबा, काजू, नारळ, आवळा उत्पादनासाठी योग्य नियोजन, कृषी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आदित्य घेत आहेत. यावर्षी हवामानातील बदलामुळे एकूणच उत्पादन कमी असले तरी आदित्य यांच्या बागेतील उत्पन्न व दर्जा चांगला आहे. ते आंबा मुंबई, पुणे येथे विक्रीसाठी पाठवीत आहेत, तर काजूवर प्रक्रिया करून विक्री करीत आहेत. आवळा व नारळासाठी मात्र स्थानिक बाजारपेठेतच चांगली मागणी होत आहे.

सेंद्रिय खत युनिट

सेंद्रिय उत्पादनावर आदित्य यांनी भर दिला आहे. त्यामुळे बागेत पडलेला पालापाचोळा, काडीकचरा एकत्र करून त्यापासून खतनिर्मिती युनिट उभारणीचे काम सध्या सुरू आहे. सेंद्रिय खतामुळे त्यांच्याकडील उत्पादन व दर्जा राखण्यात त्यांनी यश मिळविले असून, त्यासाठी खतनिर्मिती स्वत:च करणार असल्याचे सांगितले. यापुढे सेंद्रिय खत विकत न आणता, स्वत:च निर्मिती करण्यावर त्यांचा भर आहे.

काजूवर प्रक्रिया

आदित्य यांच्या बागेत १९०० काजू कलमांची लागवड केली असून, साधारणत: वर्षाला आठ ते नऊ टन काजू उत्पादन प्राप्त होते. यावर्षी हवामानातील बदलामुळे उत्पादन निम्म्यापेक्षा कमी प्राप्त झाले आहे. मात्र, अखंड काजू बी विक्रीऐवजी काजूवर प्रक्रिया करून विक्री करीत आहेत. त्यासाठी ग्राहकांकडून चांगली मागणी होत आहे. यावर्षी काजू उत्पादनही घटले असल्याचे त्यांनी नमूद केले.

आवळा विक्री

आंबा बागेतच आवळ्याचे आंतरपीक घेण्यात येत आहे. आवळा पिकासाठी फारशी मेहनत घ्यावी लागत नाही. प्रक्रिया व्यावसायिकांकडून आवळ्याला चांगली मागणी असल्याने आवळ्याचा खप हातोहात होतो. आवळ्याचा आकार, दर्जा चांगला असल्याने आंतरपिकातून बऱ्यापैकी उत्पन्न प्राप्त होत आहे. झाडेही लहान असल्याने काढणीही सोपी होत आहे.