शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
2
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
3
Gold Silver Price Today 6 October: सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले; एकाच दिवसात सोनं ₹२१०० पेक्षा अधिकनं वाढलं, चांदीत ४ हजारांची तेजी
4
गायिका मैथिली ठाकूर भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार? विनोद तावडेंची घेतली भेट
5
'उपमुख्यमंत्र्यांनी तुमच्याकडून मदत घेण्याचे सांगितले' अकोल्याच्या माजी आमदारांना बदमाशांकडून फसवण्याचा प्रयत्न
6
IND vs PAK: पाकिस्तानचं 'संडे' रूटीन- भारताविरूद्ध खेळा, हरा आणि घरी जा! सलग ४ रविवार पराभव
7
Gautami Patil: अपघात प्रकरणात गौतमी पाटीलला 'क्लीन चीट', पोलिसांनी सांगितले, 'गुन्हा दाखल होऊ शकत नाही'
8
गिफ्ट मिळालेली 'HAVAL H9' कार अभिषेक शर्मा भारतात चालवू शकणार नाही; कारण ऐकून व्हाल हैराण
9
शिंदेसेना-भाजपा नेत्यांमध्ये कुरघोडी सुरूच; स्थानिक निवडणुकांपूर्वीच महायुतीत उडू लागले खटके
10
शाहरुख खानच्या मागे उभी असलेली ज्युनिअर आर्टिस्ट, आज आहे प्रसिद्ध अभिनेत्याची बायको
11
हृदयद्रावक! छोट्या भावाच्या मृत्यूचा धक्का, दादाला आला हार्ट अटॅक; प्रेग्नंट वहिनी कोसळली अन्...
12
Video: डोकं फोडलं, रक्तबंबाळ केलं..; भाजपच्या आमदार-खासदारवर जमावाचा जीवघेणा हल्ला
13
वकिलाने वस्तू भिरकावल्यावर सरन्यायाधीश भूषण गवई यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “तुम्ही...”
14
NPS आता म्युच्युअल फंडासारखं काम करणार! पैसे काढण्याचे नियम बदलले; १००% इक्विटीचा पर्याय
15
बिहारमध्ये कितपत खरे ठरले होते ओपिनियन पोल? आताच्या सर्व्हेत कुणाचं सरकार? 'इंटरेस्टिंग' आहेत आकडे!
16
'तू इथेच थांब, मी आलेच...'; सख्ख्या भावाच्या हातावर तुरी देऊन बहिणीच्याच नवऱ्यासोबत पळून गेली तरुणी!
17
“‘आय लव्ह मोहम्मद’ यात काही वाईट-चुकीचे नाही”; धीरेंद्र शास्त्रींना नेमके म्हणायचे तरी काय?
18
'सैयारा' फेम अहान पांडेच्या आगामी सिनेमाची चर्चा, 'ही' मराठी अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार?
19
राम मंदिरावर लक्ष्मी प्रसन्न! १५३ कोटी दान, १७३ कोटी बँक व्याज; कमाई आकडे पाहून व्हाल अवाक्
20
३ महिने भरपूर पैसा, ४ राशींचे आयुष्यच बदलेल; कल्पनेपलीकडे यश-लाभ, बाबा वेंगांचे मोठे भाकित!

आंबा बागेत आवळ्याचे आंतरपीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:33 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : वडिलोपार्जित मिठाई व्यवसाय असला तरी आदित्य प्रसन्न गांधी यांनी दाभिळआंबेरे येथे बागायत शेती फुलविली ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : वडिलोपार्जित मिठाई व्यवसाय असला तरी आदित्य प्रसन्न गांधी यांनी दाभिळआंबेरे येथे बागायत शेती फुलविली आहे. मिठाई व्यवसायासाठी मदत करीत असतानाच आदित्य यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर बागायती शेतीकडे लक्ष केंद्रित केले आहे. आंबा बागेत आवळ्याचे आंतरपीक घेतले असून, दीड टन आवळा उत्पादन त्यांना प्राप्त झाले आहे.

त्यांनी हापूसची १,४०० कलमे लावली असून, वेंगुर्ला ७ या विद्यापीठ प्रमाणित काजूची १,९०० कलमे लावली आहेत, तसेच ६० नारळांची लागवडही केली आहे. हापूस कलमांच्या बागेत संरक्षक भिंतीच्या कडेने शंभर आवळ्याची झाडे लावली आहेत. २००१ साली लागवड केलेल्या आवळ्याचे उत्पन्न सुरू झाले असून, वर्षाला एक ते दीड टन आवळा प्राप्त होत आहे.

शेतीला जोड म्हणून आदित्य यांनी कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला आहे. एका शेडमध्ये साडेचारशे पक्षी याप्रमाणे आठ शेड उभारले आहेत. त्यांची जिल्ह्यातच विक्री होत आहे. याशिवाय खतासाठी कोंबड्यांची विष्ठाही ते विक्री करीत असून, त्यातूनही उत्पन्न त्यांना प्राप्त होत आहे.

बागेत जमा होणारा पालापाचोळा, काडीकचरा एकत्र करून त्यापासून खतनिर्मिती युनिट उभारण्यावर त्यांनी भर दिला आहे. खत व्यवस्थापनापासून आंबा, काजू, नारळ, आवळा उत्पादनासाठी योग्य नियोजन, कृषी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आदित्य घेत आहेत. यावर्षी हवामानातील बदलामुळे एकूणच उत्पादन कमी असले तरी आदित्य यांच्या बागेतील उत्पन्न व दर्जा चांगला आहे. ते आंबा मुंबई, पुणे येथे विक्रीसाठी पाठवीत आहेत, तर काजूवर प्रक्रिया करून विक्री करीत आहेत. आवळा व नारळासाठी मात्र स्थानिक बाजारपेठेतच चांगली मागणी होत आहे.

सेंद्रिय खत युनिट

सेंद्रिय उत्पादनावर आदित्य यांनी भर दिला आहे. त्यामुळे बागेत पडलेला पालापाचोळा, काडीकचरा एकत्र करून त्यापासून खतनिर्मिती युनिट उभारणीचे काम सध्या सुरू आहे. सेंद्रिय खतामुळे त्यांच्याकडील उत्पादन व दर्जा राखण्यात त्यांनी यश मिळविले असून, त्यासाठी खतनिर्मिती स्वत:च करणार असल्याचे सांगितले. यापुढे सेंद्रिय खत विकत न आणता, स्वत:च निर्मिती करण्यावर त्यांचा भर आहे.

काजूवर प्रक्रिया

आदित्य यांच्या बागेत १९०० काजू कलमांची लागवड केली असून, साधारणत: वर्षाला आठ ते नऊ टन काजू उत्पादन प्राप्त होते. यावर्षी हवामानातील बदलामुळे उत्पादन निम्म्यापेक्षा कमी प्राप्त झाले आहे. मात्र, अखंड काजू बी विक्रीऐवजी काजूवर प्रक्रिया करून विक्री करीत आहेत. त्यासाठी ग्राहकांकडून चांगली मागणी होत आहे. यावर्षी काजू उत्पादनही घटले असल्याचे त्यांनी नमूद केले.

आवळा विक्री

आंबा बागेतच आवळ्याचे आंतरपीक घेण्यात येत आहे. आवळा पिकासाठी फारशी मेहनत घ्यावी लागत नाही. प्रक्रिया व्यावसायिकांकडून आवळ्याला चांगली मागणी असल्याने आवळ्याचा खप हातोहात होतो. आवळ्याचा आकार, दर्जा चांगला असल्याने आंतरपिकातून बऱ्यापैकी उत्पन्न प्राप्त होत आहे. झाडेही लहान असल्याने काढणीही सोपी होत आहे.