शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

हापूस आंब्याची आवक वाढल्याने दरात घसरण

By admin | Updated: March 18, 2016 23:32 IST

वाशी मार्केट : रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांतून १६ हजार आंबा पेट्या दाखल

रत्नागिरी : वाढत्या उष्म्यामुळे आंबा लवकर तयार होऊ लागला आहे. त्यामुळे वाशी मार्केटमध्ये आंब्याची आवक दिवसेंदिवस वाढत आहे. शुक्रवारी मार्केटमध्ये १६ हजार आंबा पेट्या विक्रीस उपलब्ध होत्या. आवक वाढल्यामुळे दरात घसरण झाली आहे. १००० ते १५०० रूपये डझन असलेला आंबा आता ३०० ते ८०० रूपये डझनवर येऊन ठेपला आहे. यामुळे आंब्यासाठी केलेला खर्च भरून कसा येईल याच विवंचनेत शेतकरीवर्ग सापडला आहे.गत आठवड्यातील ढगाळ वातावरणामुळे मोहोरावर तसेच फळांवर काळे डाग पडले आहेत. मोहोरावरील बुरशीसदृश्य रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी अद्याप शेतकऱ्यांना फवारणी करावी लागत आहे. त्यामुळे आर्थिक खर्चात दिवसेंदिवस वाढच होत आहे. वाढता इंधनखर्च, मजुरी, कीटकनाशकांचा खर्च, खोका, हमाली, दलाली तसेच भाडेतत्वावर घेतलेल्या बागांसाठी मोजावे लागणारे पैसे, संबंधित सर्व खर्च जावून शेतकऱ्यांच्या हातात किती पैसे येणार हाच प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. फयानपासून दरवर्षी येनकेन प्रकारे आंबा पिकाचे उत्पादनात नैसर्गिक परिस्थितीमुळे घट होत आहे. उष्म्यामुळे फळ तयार होण्याच्या प्रक्रियेबरोबर भाजण्याचा धोका देखील वाढला आहे. फळांवर काळे डाग पडत असून, आंबा गळून जमिनीवर पडत आहे. काळे डाग असलेला आंबा मार्केटमध्ये चालत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. दरवर्षी शासनाकडे शेतकरी समस्या मांडत असतात. परंतु शासनाकडून तुटपंूजी आर्थिक मदत देऊ केली जाते. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आखडता हात घेतला जातो. शासनाला शेतकऱ्यांना मदत करता येत नसेल, तर दरावरती निर्बंध आणावेत. जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला चांगला भाव मिळेल.सध्या वाशी मार्केटमधून आखाती प्रदेशात निर्यात सुरू करण्यात आली आहे. परदेशातील व्यापाऱ्यांकडून आंब्याला मागणी होत असली, तरी पुरवठा करण्यात शेतकरी कमी पडत आहेत. वास्तविक पुर्नमोहोर प्रक्रियेमुळे सुरूवातीचा आंबा गळून गेल्यामुळे शेतकऱ्यांकडे आंबा कमी आहे. सध्या वाशी मार्केटमध्ये रायगड, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांतून १६ हजार पेट्या दिवसाला विक्रीसाठी येत आहेत. (प्रतिनिधी)ढगाळ हवामानामुळे आंब्याचा मोहोर काळा पडला आहे. खारसदृश्य बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. संबंधित बुरशी रोखण्यासाठी शेतकऱ्यांना वारंवार फवारणी करावी लागत आहे. अद्याप शेतकऱ्यांना फवारणी करावी लागत असल्यामुळे खर्च वाढला आहे. मोहोरावरील बुरशी फळांवर येत असल्यामुळे काहीवेळा फळेदेखील पुसावी लागत आहेत.एस. पी. सावंत, शेतकरी.