शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
4
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
5
हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग...
6
Crime: 'मी तुमच्या मुलीची हत्या केलीये'; मित्रासोबत रुमवर गेली अन् निळ्यामध्ये ड्रममध्ये...; तरुणीची हत्या का केली?
7
Neena Kulkarni: जेष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना मानाचा विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!
8
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
9
वीटभट्टीवर जुळले प्रेमसंबंध! दोन नातवंडांची आजी सुनेच्या दागिन्यांसह प्रियकरासोबत पळाली
10
Video - कॉर्पोरेट शॉक! "हे कल्चर सगळीकडे करा... "; बरोबर ५ वाजता संपूर्ण ऑफिस रिकामं
11
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
12
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
13
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
14
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
15
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
16
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
17
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
18
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
19
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
20
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?

हापूस आंब्याची आवक वाढल्याने दरात घसरण

By admin | Updated: March 18, 2016 23:32 IST

वाशी मार्केट : रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांतून १६ हजार आंबा पेट्या दाखल

रत्नागिरी : वाढत्या उष्म्यामुळे आंबा लवकर तयार होऊ लागला आहे. त्यामुळे वाशी मार्केटमध्ये आंब्याची आवक दिवसेंदिवस वाढत आहे. शुक्रवारी मार्केटमध्ये १६ हजार आंबा पेट्या विक्रीस उपलब्ध होत्या. आवक वाढल्यामुळे दरात घसरण झाली आहे. १००० ते १५०० रूपये डझन असलेला आंबा आता ३०० ते ८०० रूपये डझनवर येऊन ठेपला आहे. यामुळे आंब्यासाठी केलेला खर्च भरून कसा येईल याच विवंचनेत शेतकरीवर्ग सापडला आहे.गत आठवड्यातील ढगाळ वातावरणामुळे मोहोरावर तसेच फळांवर काळे डाग पडले आहेत. मोहोरावरील बुरशीसदृश्य रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी अद्याप शेतकऱ्यांना फवारणी करावी लागत आहे. त्यामुळे आर्थिक खर्चात दिवसेंदिवस वाढच होत आहे. वाढता इंधनखर्च, मजुरी, कीटकनाशकांचा खर्च, खोका, हमाली, दलाली तसेच भाडेतत्वावर घेतलेल्या बागांसाठी मोजावे लागणारे पैसे, संबंधित सर्व खर्च जावून शेतकऱ्यांच्या हातात किती पैसे येणार हाच प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. फयानपासून दरवर्षी येनकेन प्रकारे आंबा पिकाचे उत्पादनात नैसर्गिक परिस्थितीमुळे घट होत आहे. उष्म्यामुळे फळ तयार होण्याच्या प्रक्रियेबरोबर भाजण्याचा धोका देखील वाढला आहे. फळांवर काळे डाग पडत असून, आंबा गळून जमिनीवर पडत आहे. काळे डाग असलेला आंबा मार्केटमध्ये चालत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. दरवर्षी शासनाकडे शेतकरी समस्या मांडत असतात. परंतु शासनाकडून तुटपंूजी आर्थिक मदत देऊ केली जाते. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आखडता हात घेतला जातो. शासनाला शेतकऱ्यांना मदत करता येत नसेल, तर दरावरती निर्बंध आणावेत. जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला चांगला भाव मिळेल.सध्या वाशी मार्केटमधून आखाती प्रदेशात निर्यात सुरू करण्यात आली आहे. परदेशातील व्यापाऱ्यांकडून आंब्याला मागणी होत असली, तरी पुरवठा करण्यात शेतकरी कमी पडत आहेत. वास्तविक पुर्नमोहोर प्रक्रियेमुळे सुरूवातीचा आंबा गळून गेल्यामुळे शेतकऱ्यांकडे आंबा कमी आहे. सध्या वाशी मार्केटमध्ये रायगड, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांतून १६ हजार पेट्या दिवसाला विक्रीसाठी येत आहेत. (प्रतिनिधी)ढगाळ हवामानामुळे आंब्याचा मोहोर काळा पडला आहे. खारसदृश्य बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. संबंधित बुरशी रोखण्यासाठी शेतकऱ्यांना वारंवार फवारणी करावी लागत आहे. अद्याप शेतकऱ्यांना फवारणी करावी लागत असल्यामुळे खर्च वाढला आहे. मोहोरावरील बुरशी फळांवर येत असल्यामुळे काहीवेळा फळेदेखील पुसावी लागत आहेत.एस. पी. सावंत, शेतकरी.