शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

कोकण रेल्वेच्या आरक्षित गाड्यांमध्ये घुसखोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:39 IST

आरामदायी व सुरक्षित प्रवासाचे स्वप्न भंगले. लोकमत न्यूज नेटवर्क खेड : कोकणातील गौरी-गणपती उत्सव साजरा झाला असून, परतीच्या प्रवासाला ...

आरामदायी व सुरक्षित प्रवासाचे स्वप्न भंगले.

लोकमत न्यूज नेटवर्क

खेड : कोकणातील गौरी-गणपती उत्सव साजरा झाला असून, परतीच्या प्रवासाला निघालेल्या भाविकांना कोकण रेल्वेमध्ये घुसखोर प्रवाशांचा उपद्रव सहन करावा लागत आहे. महिना, दोन महिने अगोदर रांगेत उभे राहून रेल्वे प्रशासनाला आगाऊ रेल्वे शुल्क अदा केलेल्या प्रवाशांना होणारा त्रास कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने कोणतीही पावले उचलली नसल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

कोकणातील प्रमुख सण असलेल्या गौरी-गणपतीसाठी कोकणातील लाखो भाविक तीन ते चार महिने तयारी करतात. त्यासाठी लाखो प्रवासी दुहेरी प्रवासाचे भाडे दोन-तीन महिने आधीच जमा करतात. मात्र, एवढे मोठे उत्पन्न मिळत असूनही, कोकण रेल्वे प्रशासनाकडून कोकणात आलेल्या भाविकांचा प्रवास आरामदायी व सुरक्षित व्हावा यासाठी रेल्वे प्रशासन कोणतीही काळजी घेताना दिसत नाही.

मंगळवारी (दि.१४) गौरी गणपती विसर्जन झाल्यानंतर परतीच्या प्रवासासाठी रेल्वे स्थानकात पोहोचलेल्या प्रवाशांना यावर्षीही घुसखोर प्रवाशांचा उपद्रव अनुभवायला मिळाला. महिनाभर अगोदर आसने आरक्षित करूनही या प्रवाशांना रेल्वे प्रशासनाकडून आरामदायी प्रवासाचा अनुभव घेता आला नाही. घुसखोर प्रवाशांना आवरण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाकडून काही स्थानकांवर कोणताही अटकाव होताना दिसत नव्हता. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्या प्रवाशांकडे आरक्षित तिकिटे नसतील अशा प्रवाशांना रेल्वेस्थानकात प्रवेश न करण्याचे आवाहन केले होते. कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला होता. परंतु त्याची अंमलबजावणी झालीच नाही. त्यामुळे घुसखोर प्रवाशांची संख्या यंदाही होती.

रेल्वे प्रशासन दरवर्षी गणेशोत्सवासाठी केवळ मोघम उपाययोजना सोडल्यास कोणत्याही विशेष सुविधा दिल्या जात नाहीत. कोकण रेल्वे प्रशासनाकडे या मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू झाल्यापासून नगण्य संख्येत सुरक्षा दलाचे जवान तैनात आहेत. त्यांची संख्या न वाढवता केवळ स्थानिक पोलीस प्रशासन व गृहरक्षक दलाची मदत घेताना दिसते. यावर्षी रेल्वे प्रशासनाने गणेशोत्सवासाठी सर्व स्थानकांत रेल्वे थांबतील अशा अनेक गाड्या सोडल्या आहेत. मात्र, तरीही गणेशोत्सवासाठी दाखल झालेल्या अनेकांनी या मार्गावरून धावणाऱ्या अन्य आरक्षित गाड्यांमध्ये घुसखोरी करून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडविला. विशेष म्हणजे आरक्षित डब्यांमध्ये तिकीट तपासनीस किंवा सुरक्षा दलाचे जवान उपस्थित नसल्याने आरक्षण केलेल्या प्रवाशांना घुसखोरांचा उपद्रव सहन करत प्रवास करावा लागला.

--आरक्षणाशिवाय प्रवास..........

कोरोना महामारीच्या काळात रेल्वे प्रवासाचा शुभारंभ करताना विना आरक्षण प्रवास करण्यास बंदी घातली आहे. मात्र, तरीही या मार्गावर धावत असलेल्या आरक्षित गणपती विशेष गाड्यांमध्ये प्रतीक्षा यादीतील प्रवासी व तिकीट नसलेले काही घुसखोर प्रवेश करतात आणि त्याकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी ही घुसखोरीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.