शहरं
Join us  
Trending Stories
1
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
2
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
3
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
4
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
5
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
6
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
7
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
8
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
9
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
10
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
11
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
12
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
13
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
14
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?
15
Mumbai: धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; आईसह तिच्या प्रियकराला अटक
16
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार
17
प्यार तूने क्या किया! डिजिटल अफेअर्स म्हणजे काय, भारतात का लोकप्रिय होतोय रिलेशनशिप ट्रेंड?
18
IPL मध्ये आतापर्यंत खेळले १२०० क्रिकेटर्स, पण 'ही' कामगिरी करणारा साई सुदर्शन 'एकमेव'!!
19
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
20
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल

कोकण रेल्वेच्या आरक्षित गाड्यांमध्ये घुसखोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:39 IST

आरामदायी व सुरक्षित प्रवासाचे स्वप्न भंगले. लोकमत न्यूज नेटवर्क खेड : कोकणातील गौरी-गणपती उत्सव साजरा झाला असून, परतीच्या प्रवासाला ...

आरामदायी व सुरक्षित प्रवासाचे स्वप्न भंगले.

लोकमत न्यूज नेटवर्क

खेड : कोकणातील गौरी-गणपती उत्सव साजरा झाला असून, परतीच्या प्रवासाला निघालेल्या भाविकांना कोकण रेल्वेमध्ये घुसखोर प्रवाशांचा उपद्रव सहन करावा लागत आहे. महिना, दोन महिने अगोदर रांगेत उभे राहून रेल्वे प्रशासनाला आगाऊ रेल्वे शुल्क अदा केलेल्या प्रवाशांना होणारा त्रास कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने कोणतीही पावले उचलली नसल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

कोकणातील प्रमुख सण असलेल्या गौरी-गणपतीसाठी कोकणातील लाखो भाविक तीन ते चार महिने तयारी करतात. त्यासाठी लाखो प्रवासी दुहेरी प्रवासाचे भाडे दोन-तीन महिने आधीच जमा करतात. मात्र, एवढे मोठे उत्पन्न मिळत असूनही, कोकण रेल्वे प्रशासनाकडून कोकणात आलेल्या भाविकांचा प्रवास आरामदायी व सुरक्षित व्हावा यासाठी रेल्वे प्रशासन कोणतीही काळजी घेताना दिसत नाही.

मंगळवारी (दि.१४) गौरी गणपती विसर्जन झाल्यानंतर परतीच्या प्रवासासाठी रेल्वे स्थानकात पोहोचलेल्या प्रवाशांना यावर्षीही घुसखोर प्रवाशांचा उपद्रव अनुभवायला मिळाला. महिनाभर अगोदर आसने आरक्षित करूनही या प्रवाशांना रेल्वे प्रशासनाकडून आरामदायी प्रवासाचा अनुभव घेता आला नाही. घुसखोर प्रवाशांना आवरण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाकडून काही स्थानकांवर कोणताही अटकाव होताना दिसत नव्हता. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्या प्रवाशांकडे आरक्षित तिकिटे नसतील अशा प्रवाशांना रेल्वेस्थानकात प्रवेश न करण्याचे आवाहन केले होते. कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला होता. परंतु त्याची अंमलबजावणी झालीच नाही. त्यामुळे घुसखोर प्रवाशांची संख्या यंदाही होती.

रेल्वे प्रशासन दरवर्षी गणेशोत्सवासाठी केवळ मोघम उपाययोजना सोडल्यास कोणत्याही विशेष सुविधा दिल्या जात नाहीत. कोकण रेल्वे प्रशासनाकडे या मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू झाल्यापासून नगण्य संख्येत सुरक्षा दलाचे जवान तैनात आहेत. त्यांची संख्या न वाढवता केवळ स्थानिक पोलीस प्रशासन व गृहरक्षक दलाची मदत घेताना दिसते. यावर्षी रेल्वे प्रशासनाने गणेशोत्सवासाठी सर्व स्थानकांत रेल्वे थांबतील अशा अनेक गाड्या सोडल्या आहेत. मात्र, तरीही गणेशोत्सवासाठी दाखल झालेल्या अनेकांनी या मार्गावरून धावणाऱ्या अन्य आरक्षित गाड्यांमध्ये घुसखोरी करून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडविला. विशेष म्हणजे आरक्षित डब्यांमध्ये तिकीट तपासनीस किंवा सुरक्षा दलाचे जवान उपस्थित नसल्याने आरक्षण केलेल्या प्रवाशांना घुसखोरांचा उपद्रव सहन करत प्रवास करावा लागला.

--आरक्षणाशिवाय प्रवास..........

कोरोना महामारीच्या काळात रेल्वे प्रवासाचा शुभारंभ करताना विना आरक्षण प्रवास करण्यास बंदी घातली आहे. मात्र, तरीही या मार्गावर धावत असलेल्या आरक्षित गणपती विशेष गाड्यांमध्ये प्रतीक्षा यादीतील प्रवासी व तिकीट नसलेले काही घुसखोर प्रवेश करतात आणि त्याकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी ही घुसखोरीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.