शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत भारतीय संविधान दिन, देवरे म्हणाले, वादात संविधान संपणार नाही; याची काळजी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 13:03 IST

भारतीय संविधानाला वाचवण्यासाठी बामसेफ/भारत मुक्ती मोर्चाची चळवळ सुरू आहे. त्यामुळे आपापसाच्या वादात संविधान संपणार नाही, याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन भारत मुक्ती मोर्चा व बामसेफचे राष्ट्रीय प्रचारक तसेच भारत मुक्ती मोर्चा, रायगडचे अध्यक्ष प्रा. सुनील देवरे यांनी रत्नागिरीत केले.

ठळक मुद्देसुनील देवरे यांचे रत्नागिरीत प्रतिपादनभारतीय संविधान दिनानिमित्त संविधान हक्क आणि स्थिती विषयावर व्याख्यान

रत्नागिरी : भारतीय संविधानाला वाचवण्यासाठी बामसेफ/भारत मुक्ती मोर्चाची चळवळ सुरू आहे. त्यामुळे आपापसाच्या वादात संविधान संपणार नाही, याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन भारत मुक्ती मोर्चा व बामसेफचे राष्ट्रीय प्रचारक तसेच भारत मुक्ती मोर्चा, रायगडचे अध्यक्ष प्रा. सुनील देवरे यांनी रत्नागिरीत  केले.बौध्दजन पंचायत समिती, रत्नागिरी तालुका व बौध्द महासभा, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने ६८व्या भारतीय संविधान दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संविधान हक्क आणि स्थिती या विषयावर प्रा. देवरे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विजय आयरे, बौध्दजन पंचायत समितीचे अध्यक्ष प्रकाश पवार, बौध्द महासभा, रत्नागिरीचे अध्यक्ष रत्नदीप कांबळे उपस्थित होते.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मूलभूत तत्त्वांना अंतर्भूत करून संपूर्ण राज्य घटना लिहिली. संविधानाचा १०० टक्के वापर ज्यावेळी होईल, त्यावेळी भारत जागतिक महासत्ता बनेल. बाबासाहेब सर्वांना त्यांचे हक्क देऊ इच्छितात. परंतु संविधान राबवणाऱ्यांनी ते असफल बनवलं आहे. 

कलम ४५ मध्ये शिक्षणाचा अधिकार असताना पहिल्या दशकात पहिली ते आठवीपर्यंत मोफत शिक्षण दर दहा वर्षानी शिक्षणाची आवश्यकता ओळखून मोफत करावे, असे नमूद असताना सन २००८मध्ये मोफत व सक्तीचे शिक्षण म्हणवताना आठवीपर्यंत परीक्षाच बंद केली. शिक्षणातून बुध्दी, सद्सद्विवेकबुध्दी, चिंतन, निष्कर्ष काढण्याची क्षमता, नेतृत्व येते. मात्र, शासनाने नेमके तेच बंद केले असल्याची खंत व्यक्त केली.कलम १९मध्ये मत मांडण्याचे स्वातंत्र्य दिले आहे.परंतु प्रस्थापित सरकार नेमकं भारतीय संविधान हळूहळू संपवण्याच्या प्रयत्नात असल्याचे सांगितले. कलम १३चे उपकलम एकमध्ये संविधान लागू होण्याच्या तारखेपासून आधीचे कायदे शून्यवत करण्यात येत आहेत. यापुढे एकच कायदा राहील, असे म्हटले आहे.

कलम १३च्या उपकलम २मध्ये संसद, विधानसभेने घटनाबाह्य कायदा संमत केला व जो फंडामेंटल कायद्याचे उल्लंघन करीत असेल तर तो रद्द केला जाईल, असेही म्हटले आहे. परंतु संविधान संपवण्याचा घाट घालण्यात येत आहे, असे ते म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीIndiaभारत