शहरं
Join us  
Trending Stories
1
फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०१ नोव्हेंबर २०२५: अचानक धनलाभ, प्रिय व्यक्तींचा सहवास; मन प्रसन्न राहील
3
विरोधकांचा आज मुंबईत निघणार 'सत्याचा मोर्चा'; निवडणूक आयोगाविरोधात करणार कोर्टात याचिका
4
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
5
जिल्हा परिषदांऐवजी आधी नगरपालिकांची निवडणूक; आयोगाकडून घोषणा पुढील आठवड्यात
6
हात बांधले, बंदूक रोखली अन्.. ओलीस नाट्याचा तीन महिन्यांपासून कट; चार दिवसांपासून सुरू होती रंगीत तालीम
7
'दीपक केसरकरांनी अन्याय केला'; आम्ही फेक सीन करत होतो, तो मात्र ते वास्तवात आणत होता...
8
तिसरे अपत्य लपविणाऱ्यास निवडणुकीत बसणार चाप! सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेले तिसरे अपत्य ठरवेल उमेदवाराला अपात्र
9
अडीच लाख अन् महिन्याच्या रेशनसाठी चिमुकलीचे शोषण; आईच तिला रोज रात्री नराधमाकडे सोपवायची
10
रोहित आर्याने पोलिसांवर गोळी झाडलीच नाही...; गुन्हे शाखेकडून तपास सुरू, अपघाती मृत्यू म्हणून नोंद
11
लोकल प्रवाशांचा उद्या तिन्ही मार्गावर होणार खोळंबा; देखभालीसाठी मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
12
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
13
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
14
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
15
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
16
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
17
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
18
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
19
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
20
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश

रत्नागिरीत भारतीय संविधान दिन, देवरे म्हणाले, वादात संविधान संपणार नाही; याची काळजी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 13:03 IST

भारतीय संविधानाला वाचवण्यासाठी बामसेफ/भारत मुक्ती मोर्चाची चळवळ सुरू आहे. त्यामुळे आपापसाच्या वादात संविधान संपणार नाही, याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन भारत मुक्ती मोर्चा व बामसेफचे राष्ट्रीय प्रचारक तसेच भारत मुक्ती मोर्चा, रायगडचे अध्यक्ष प्रा. सुनील देवरे यांनी रत्नागिरीत केले.

ठळक मुद्देसुनील देवरे यांचे रत्नागिरीत प्रतिपादनभारतीय संविधान दिनानिमित्त संविधान हक्क आणि स्थिती विषयावर व्याख्यान

रत्नागिरी : भारतीय संविधानाला वाचवण्यासाठी बामसेफ/भारत मुक्ती मोर्चाची चळवळ सुरू आहे. त्यामुळे आपापसाच्या वादात संविधान संपणार नाही, याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन भारत मुक्ती मोर्चा व बामसेफचे राष्ट्रीय प्रचारक तसेच भारत मुक्ती मोर्चा, रायगडचे अध्यक्ष प्रा. सुनील देवरे यांनी रत्नागिरीत  केले.बौध्दजन पंचायत समिती, रत्नागिरी तालुका व बौध्द महासभा, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने ६८व्या भारतीय संविधान दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संविधान हक्क आणि स्थिती या विषयावर प्रा. देवरे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विजय आयरे, बौध्दजन पंचायत समितीचे अध्यक्ष प्रकाश पवार, बौध्द महासभा, रत्नागिरीचे अध्यक्ष रत्नदीप कांबळे उपस्थित होते.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मूलभूत तत्त्वांना अंतर्भूत करून संपूर्ण राज्य घटना लिहिली. संविधानाचा १०० टक्के वापर ज्यावेळी होईल, त्यावेळी भारत जागतिक महासत्ता बनेल. बाबासाहेब सर्वांना त्यांचे हक्क देऊ इच्छितात. परंतु संविधान राबवणाऱ्यांनी ते असफल बनवलं आहे. 

कलम ४५ मध्ये शिक्षणाचा अधिकार असताना पहिल्या दशकात पहिली ते आठवीपर्यंत मोफत शिक्षण दर दहा वर्षानी शिक्षणाची आवश्यकता ओळखून मोफत करावे, असे नमूद असताना सन २००८मध्ये मोफत व सक्तीचे शिक्षण म्हणवताना आठवीपर्यंत परीक्षाच बंद केली. शिक्षणातून बुध्दी, सद्सद्विवेकबुध्दी, चिंतन, निष्कर्ष काढण्याची क्षमता, नेतृत्व येते. मात्र, शासनाने नेमके तेच बंद केले असल्याची खंत व्यक्त केली.कलम १९मध्ये मत मांडण्याचे स्वातंत्र्य दिले आहे.परंतु प्रस्थापित सरकार नेमकं भारतीय संविधान हळूहळू संपवण्याच्या प्रयत्नात असल्याचे सांगितले. कलम १३चे उपकलम एकमध्ये संविधान लागू होण्याच्या तारखेपासून आधीचे कायदे शून्यवत करण्यात येत आहेत. यापुढे एकच कायदा राहील, असे म्हटले आहे.

कलम १३च्या उपकलम २मध्ये संसद, विधानसभेने घटनाबाह्य कायदा संमत केला व जो फंडामेंटल कायद्याचे उल्लंघन करीत असेल तर तो रद्द केला जाईल, असेही म्हटले आहे. परंतु संविधान संपवण्याचा घाट घालण्यात येत आहे, असे ते म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीIndiaभारत