शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी वाढल्या मंदिरातील फेऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 14:14 IST

रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम जोरात सुरू झाली आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत विरोधी उमदेवारांची मनधरणी करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. कबुली देण्यासाठी थेट ग्रामदैवताच्या मंदिरात येण्यास सांगितले जात आहे.

ठळक मुद्देउमेदवारांची मनधरणी रत्नागिरीत निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी

अरुण आडिवरेकररत्नागिरी : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम जोरात सुरू झाली आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत विरोधी उमदेवारांची मनधरणी करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्याचवेळी झालं गेलं सारे विसरून तू मला मदत कर अशी विनंतीही केली जात आहे. त्याला विरोधी उमेदवाराने समर्थन देताच त्याला कबुली देण्यासाठी थेट ग्रामदैवताच्या मंदिरात येण्यास सांगितले जात आहे. त्यामुळे सध्या निवडणुकीच्या काळात मंदिराच्या फेऱ्या करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.रत्नागिरी जिल्ह्यात ४७९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. अर्ज छाननीनंतर प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असणाऱ्या उमेदवारांची निश्चिती झाली आहे. निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असणाऱ्या प्रतिस्पर्धी उमेदवारांनी अर्ज मागे घेण्यासाठी अनेक ठिकाणी जोरदार प्रयत्न करण्यात आले. मात्र, सारे प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर आता प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या सहकार्याची अपेक्षा केली जात आहे.रत्नागिरी तालुक्यात शिवसेनेने सर्वाधिक ग्रामपंचायती ताब्यात घेण्याचा विडा उचलला आहे. हक्काच्या ग्रामपंचायतींमध्ये शिवसेनेने ह्यसाम, दाम, दंडह्ण पणाला लावण्याची तयारी ठेवली आहे. निवडणुकीत त्याच-त्याच उमेदवारांना पक्षाकडून उमेदवारी दिली जात असल्याने नाराजीचा सूर आळवला जात आहे. त्याचाच फायदा उचलण्यासाठी अन्य पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिवसेनेने काही ठिकाणी विद्यमान सदस्यांना उमेदवारी न दिल्याने बंडखोरीची शक्यता अधिक आहे.शिवसेनेच्या काही सदस्यांनी विरोधी उमेदवारांची मनधरणी करण्यासही सुरुवात केल्याची चर्चा आहे. ह्यझालं गेलं सारे विसरून जा आणि मला मदत करह्ण, अशी विनवणीच उमेदवारांकडून करण्यात येत आहे. विरोधी उमेदवारानेही होला हो देताच ह्यचल मग मंदिरात जाऊन मी तुला साथ देतोय असे सांगह्ण, असा हट्टच धरला जात आहे. उमेदवारांना मंदिरात नेऊन तेथे कबुलीजबाब देण्याची गळ घातली जात आहे. त्यामुळे सध्या मंदिरात जाणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे.सरपंचपदाची आखणीसरपंचपदाचे आरक्षण काय पडणार, याची उत्सुकता अनेकांना आहे. आरक्षणाचा पत्ता नसला तरी काहीजण गुडघ्याला बाशिंग बांधूनच तयार आहेत. त्यांनी बेरजेचे गणित करत सदस्यांची जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी विरोधी गटातील उमेदवारांनाही गळ घातली जात आहे.पार्ट्या झडू लागल्यामतदानाची तारीख जसजशी जवळ येऊ लागली आहे, तसा रात्रीचा प्रचार करण्यावर जोर दिला जात आहे. अनेक ठिकाणी रात्रीच्या पार्ट्या करून मतदारांना खूश केले जात आहे. यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माजी सदस्यांनी पुढाकार घेतल्याचीही चर्चा रंगत आहे.छुपा प्रचारशिवसेनेने काहींचे पत्ते कापल्यानंतर त्यांनी विरोधी गटात शिरून प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. पक्षाला उघडउघड विरोध न करता छुपेपणे प्रचार करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे त्याचा फटकाही शिवसेनेला बसण्याची शक्यता अधिक आहे. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतRatnagiriरत्नागिरीElectionनिवडणूक