शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

लांब पल्ल्यासह शहरी, ग्रामीण मार्गावरील फेऱ्यांमध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:20 IST

मेहरून नाकाडे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोना काळात अत्यावश्यक सेवेंतर्गत एस.टी. सेवा सुरू होती. मात्र, अनलाॅकनंतर एस.टी.ची वाहतूक ...

मेहरून नाकाडे

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोना काळात अत्यावश्यक सेवेंतर्गत एस.टी. सेवा सुरू होती. मात्र, अनलाॅकनंतर एस.टी.ची वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे. कोरोनामुळे चाैथ्या टप्प्यातील शासकीय निर्बंध लागू असल्याने प्रवासी भारमानावर परिणाम झाला आहे. मात्र, प्रवासी प्रतिसादानंतर ग्रामीण, शहरी, लांब पल्याच्या मार्गावरील फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत.

अनलाॅकनंतर दि. १४ जूनपासून आंतरजिल्हा, ग्रामीण, शहरी मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली आहे. लाॅकडाऊनपूर्वी २५ रातराणी गाड्या सुरू होत्या. मात्र, अल्प प्रवासी प्रतिसादामुळे अवघ्या सात रातराणी बसेस सुरू आहेत. आंतरराज्य मार्गावर दररोज ११ फेऱ्या सोडण्यात येत असत. मात्र, सध्या पाच फेऱ्याच रत्नागिरी वगळता अन्य मार्गावरून सुरू आहेत. सिंदगी, बिजापूर आगारातून रत्नागिरीत दोन बसेस रोज येत आहेत.

अनलाॅकनंतर शहरी मार्गावर १८ फेऱ्या सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादामुळे ३० गाड्यांद्वारे ७४ फेऱ्या सोडण्यात येत आहेत. त्यामुळे ग्रामीण, लांब, मध्यम पल्ल्याच्या मार्गावर सध्या १२९९ फेऱ्या सुरू झाल्या आहेत.

खेडेगावात जाण्यासाठी ‘वडाप’चा पर्याय

तालुक्यापासून ग्रामीण भागात जाण्यासाठी गाड्या सुरू करण्यात आल्या असल्या, तरी मोजक्याच गाड्या सुरू आहेत. त्यामुळे काही गावांत जाण्यासाठी रिक्षा, सीटर रिक्षा, टमटम यासारख्या ‘वडाप’चा आधार घ्यावा लागत आहे. रत्नागिरी तालुक्यातील खंडाळा, सैतवडे, जयगड, चिपळुणातील पोफळी, तर दापोलीतील हर्णै व अन्य गावांत जाण्यासाठी मोजक्याच गाड्या असल्याने मध्यवर्ती ठिकाणापासून वडापचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र, रत्नागिरीतून खंडाळा, चिपळूण, लांजा-राजापूर मार्गावर सुरू असलेली खासगी वाहतूक बंद करण्यात आली आहे. एस.टी.साठी प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत असून, मोजक्या फेऱ्यांमुळे तासन् तास थांबण्यापेक्षा ‘वडाप’चा आधार घेतला जातो.

जनजीवन पूर्वपदावर

कोरोनामुळे विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर हळूहळू येऊ लागले असून, प्रवासी प्रतिसादामुळेच शहरी मार्गावरील फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. अनलाॅकनंतर अवघ्या १८ मार्गांवर शहरी बसेस सुरू केल्या होत्या.

तब्बल एक महिन्यानंतर ३० मार्गावर ७४ फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. ग्रामीण असो वा शहरी मार्गावर प्रवासी प्रतिसादात वाढ झाली असल्यानेच फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत.

ग्रामीणसह आंतरजिल्हा प्रवासांतर्गत कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, लांब पल्ल्याच्या मुंबई, बाेरीवली, पुणे, स्वारगेट मार्गावर गाड्या सुरू केल्या आहेत.

ग्रामीण असो वा शहरी, लांब पल्ला किंवा आंतर जिल्हा वाहतूक सुरू करताना प्रवासी प्रतिसादाचा अंदाज घेऊनच फेऱ्या सुरू करण्यात येत आहेत. गणेशोत्सवापर्यंत बहुतांश गाड्या सुरू करण्यात येणार आहेत. आंतरराज्यांतर्गत विजापूर, सिंदगी येथून दोन गाड्या येत असल्या तरी आपल्याकडून जाणाऱ्या गाड्या सुरू करण्यात आलेल्या नाहीत.

- सुनील भोकरे, विभाग नियंत्रक.

खंडाळा, जयगड, सैतवडे मार्गावर ठरावीक एस.टी. फेऱ्या सुरू आहेत. ठरावीक फेऱ्यांमुळे अंतर्गत गावातून जाण्यासाठी सुविधा उपलब्ध नसल्याने वडापसारख्या खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे या मार्गावरील फेऱ्यांची संख्या वाढविण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून प्रवाशांची गैरसोय दूर होईल.

- सुधीर पाध्ये, संदखोल

तालुक्याच्या ठिकाणाहून गावाकडे जाणाऱ्या ठरावीकच गाड्या आहेत. एक गाडी चुकली की, दोन ते अडीच तासांनी दुसरी गाडी आहे. त्यामुळे प्रवाशांचा अर्धा ते पूर्ण दिवस वाया जातो. त्यापेक्षा रत्नागिरी आगारातून एस.टी. फेऱ्यांची संख्या वाढविण्यात यावी, जेणेकरून वडापकडे वळलेला प्रवासी एस.टी.कडे परतेल.

- रोशनी चिपळूणकर, चिपळूण