शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

रिफायनरीतील भूमाफियांच्या यादीत शासकीय अधिकाऱ्यांचा समावेश, विनायक राऊतांचा गौप्यस्फोट

By रहिम दलाल | Updated: April 29, 2023 15:42 IST

३०९ जणांची यादीच झळकवली

रत्नागिरी : महाराष्ट्र सरकारला रिफायनरीची चिंता नाही. त्यांना चिंता आहे ती ३०९ भूमाफियांची आणि या भूमाफियांच्या यादीमध्ये जास्तीत जास्त शासकीय अधिकाऱ्यांची नावे आहेत, असा खळबळजनक गौप्यस्फोट ठाकरे गटाचे सचिव व खासदार विनायक राऊत यांनी शनिवारी (२९ एप्रिल) रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत केला. त्यावेळी त्यांनी या ३०९ जणांची यादी पत्रकार परिषदेत झळकवली.यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख सुधीर मोरे, सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, प्रमोद शेरे, प्रदीप साळवी, प्रशांत साळुंखे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाठीमार झालेला नाही. जबरदस्ती तसेच छळ झालेला नसल्याचे जाहीर केले होते. त्यावर राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री शिंदे यांनी पदाला शोभणार नाही, असे वक्तव्य केले, हे योग्य नाही. कालच्या आंदोलनात भूमाफियांचे गुंड तिथे आले होते. दलालांचे प्रतिनिधी हातात दगड घेऊन आले होते. त्यांचा पण शोध घ्यावा, असे राऊत म्हणाले.मुख्यमंत्री, उद्योगमंत्री हे भूमाफियांचा मोबदला देणे हा उद्देश घेऊन हा प्रकल्प रेटू पाहत असाल तर जनता तुम्हाला कधीही माफ करणार नाही. आज जे काही होत आहे ते भूमाफियांचा मोबदला देण्यासाठी, असा गंभीर आरोप खासदार राऊत यांनी केला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीBarsu Refinery Projectबारसू रिफायनरी प्रकल्पVinayak Rautविनायक राऊत