शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

मनेसची शाखा तिथे नाका करा : राज ठाकरे

By अरुण आडिवरेकर | Updated: July 13, 2023 19:00 IST

लोकांशी संवाद ठेवाल तेव्हाच खऱ्या अर्थाने जिंकाल

चिपळूण : मला माणसं मोठी झालेली आवडतात. आपल्या पक्षाचा मंत्री झाला तर नक्कीच आवडेल. त्यासाठी एकमनाने व एका परिवाराने पक्ष संघटनेचे काम करा. मनसेची शाखा तिथे नाका करा. तिथेच तुम्हाला लोकं भेटतील त्यांचे प्रश्न सोडवा. लोकांशी संवाद ठेवाल तेव्हाच खऱ्या अर्थाने जिंकाल, हा बदल जबाबदारी असलेल्या पदाधिकाऱ्यांनी महिन्याभरात घडवून त्याचा रिझल्ट द्यावा, अशी तंबीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली.चिपळूण दौऱ्यावर आलेल्या राज ठाकरे यांच्या हस्ते चिपळूण शहरातील मार्कंडी येथील मनसेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन गुरूवारी (१३ जुलै) करण्यात आले. यानंतर अतिथी सभागृह येथे आयोजित केलेल्या जिल्ह्यातील कार्यकर्ता मेळाव्यात ठाकरे यांनी संघटनात्मक बांधणीवर मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, पदाने एकमेकांशी बोलण्यापेक्षा मनाने बोला. मी जुना, मी नवा, मी ज्येष्ठ आणि कोणी कनिष्ठ असा भेदभाव न होता, एकदिलाने पक्षाचे काम करा. तेव्हाच कुठे पक्षाचा विजय होईल. आजतागायत मी कधीही पक्षाच्या कार्यकर्त्याला कार्यकर्ता संबोधले नाही, तर त्याला सहकारी म्हणूनच ओळखतो. याच सहकाऱ्यामधून मनसेचा एखादा नगरसेवक, आमदार, खासदार होऊद्या. दिल्लीला महाराष्ट्र दाखविण्याची वेळ आली आहे. त्यादृष्टीने पदाधिकाऱ्यांनी काम करावे, असे त्यांनी सांगितले.यापुढे प्रत्येक पदाधिकाऱ्याचे काम तपासले जाईल. जे कोणी काम करणार नाही, त्यांना बदलून नव्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक केली जाईल. जिल्हाध्यक्षच नव्हे तर कोकणस्तरावरील नेत्यांमध्येही बदल घडवला जाईल, असा इशाराही ठाकरे यांनी दिला. यानिमित्त जिल्ह्यातील नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीChiplunचिपळुणRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसे