शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

मनेसची शाखा तिथे नाका करा : राज ठाकरे

By अरुण आडिवरेकर | Updated: July 13, 2023 19:00 IST

लोकांशी संवाद ठेवाल तेव्हाच खऱ्या अर्थाने जिंकाल

चिपळूण : मला माणसं मोठी झालेली आवडतात. आपल्या पक्षाचा मंत्री झाला तर नक्कीच आवडेल. त्यासाठी एकमनाने व एका परिवाराने पक्ष संघटनेचे काम करा. मनसेची शाखा तिथे नाका करा. तिथेच तुम्हाला लोकं भेटतील त्यांचे प्रश्न सोडवा. लोकांशी संवाद ठेवाल तेव्हाच खऱ्या अर्थाने जिंकाल, हा बदल जबाबदारी असलेल्या पदाधिकाऱ्यांनी महिन्याभरात घडवून त्याचा रिझल्ट द्यावा, अशी तंबीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली.चिपळूण दौऱ्यावर आलेल्या राज ठाकरे यांच्या हस्ते चिपळूण शहरातील मार्कंडी येथील मनसेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन गुरूवारी (१३ जुलै) करण्यात आले. यानंतर अतिथी सभागृह येथे आयोजित केलेल्या जिल्ह्यातील कार्यकर्ता मेळाव्यात ठाकरे यांनी संघटनात्मक बांधणीवर मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, पदाने एकमेकांशी बोलण्यापेक्षा मनाने बोला. मी जुना, मी नवा, मी ज्येष्ठ आणि कोणी कनिष्ठ असा भेदभाव न होता, एकदिलाने पक्षाचे काम करा. तेव्हाच कुठे पक्षाचा विजय होईल. आजतागायत मी कधीही पक्षाच्या कार्यकर्त्याला कार्यकर्ता संबोधले नाही, तर त्याला सहकारी म्हणूनच ओळखतो. याच सहकाऱ्यामधून मनसेचा एखादा नगरसेवक, आमदार, खासदार होऊद्या. दिल्लीला महाराष्ट्र दाखविण्याची वेळ आली आहे. त्यादृष्टीने पदाधिकाऱ्यांनी काम करावे, असे त्यांनी सांगितले.यापुढे प्रत्येक पदाधिकाऱ्याचे काम तपासले जाईल. जे कोणी काम करणार नाही, त्यांना बदलून नव्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक केली जाईल. जिल्हाध्यक्षच नव्हे तर कोकणस्तरावरील नेत्यांमध्येही बदल घडवला जाईल, असा इशाराही ठाकरे यांनी दिला. यानिमित्त जिल्ह्यातील नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीChiplunचिपळुणRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसे