शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
6
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
7
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
8
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
9
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
10
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
11
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
12
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
13
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
15
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
16
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
17
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
18
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
19
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
20
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण

खेडमध्ये निराधार योजनाच ‘निराधार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2015 00:30 IST

लाभार्थीच नाहीत : योजनांच्या अंमलबजावणीसाठी पुढाकार घेण्याची गरज...

खेड : निराधार व्यक्तींना आधारभूत अर्थसहाय करणाऱ्या शासनाच्या विषेश योजना निराधारांना सहायभूत ठरत आहेत. निराधारांचे आणि विधवांचे जीवनमान उंचावे, याकरिता राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजना सध्या कार्यरत आहेत़ २०१४ - २०१५ या आर्थिक वर्षात राष्ट्रीय कुटुंबकल्याण योजनेने जिल्ह्यातील ७९३ कुटुंबांना न्याय मिळवून दिला. खेडमध्ये केवळ ६ लाभार्थी असून, सर्वाधिक ३० लाभार्थी संगमेश्वरमध्ये आहेत. जिल्हा कार्यालयाकडून तब्बल ६७६ कुटुंबांना या योजनेअंतर्गत अर्थिक मदत मिळवून देण्यात आली. ही आकडेवारी समाधाकारक नाही. याकरिता शासन व सामाजिक स्तरावर अधिक प्रयत्न होणे गरजेचे आहे.निराधार घटकांसाठी शासनाच्या संजय गांधी निराधार योेजना विभागाच्या वतीने मासिक लाभाच्या विषेश योजना राबविण्यात येतात. त्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना या दोन राज्य सरकारच्या, तर इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तिवेतन योजना आणि राष्ट्रीय कृटुंब लाभ योजना या केंद्र सरकारतर्फे राबविण्यात येतात. यापैकी राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला किंवा त्याच्या वारसाला २० हजार रूपये अर्थसहाय देण्यात येते. या ६ योजनांचा लाभ जिल्ह्यातील अनेक निराधारांना मिळत आहे़ प्रशासनाच्या विशेष प्रयत्नांमुळे २०१४ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील ७९३ निराधार कुटुंबांना या योजनेचा आधार मिळाला. या विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी चांगले प्रयत्न झाल्यास याचा लाभ सर्वसामान्याना होणार आहे. अर्थात यासाठी ग्रामीण स्तरावरून विषेश प्रयत्न होणे अपेक्षित आहे. (प्रतिनिधी)