शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: रस्त्याला जागा दिली तरीही कुटुंब वाळीत!, अलोरे वरचीवाडी येथील चव्हाण कुटुंबाची कैफियत

By संदीप बांद्रे | Updated: December 5, 2023 16:59 IST

न्याय न मिळाल्यास पंचायत समिती समोर आत्मदहनाचा इशारा

चिपळूण : अलोरे वरचीवाडी येथे पायवाटेसाठी ६५ मिटर लांबीची ग्रामपंचायतीला तिन ते चार फुटांची जागा विना मोबदला दिली होती. मात्र कुटुंबातील सहहिस्सेदारांच्या सह्या न घेताच त्यांच्या खोट्या सह्या मारण्यात आल्या. शिवाय तिन चार फुटाची जागा दिली असताना १० फूट रस्ता केला जात आहे. वाढीव रस्त्याला आमचा विरोध असून रस्त्यासाठी जागा देत नसल्याने ग्रामस्थांनी आम्हाला वाळीत टाकल्याची कैफीयत अलोरे वरचीवाडी येथील अनंत शंकर चव्हाण दांम्पत्यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत माडंली.रस्त्याबाबत झालेल्या फसवणूकीबाबत माहिती देताना अनंत चव्हाण म्हणाले की, अलोरे वरचीवाडी येथे पाऊलवाटेसाठी ग्रामपंचायतीने केलेल्या मागणीनुसार तीन ते चार फुट रूंदीची ६५ मीटर लांब जागा विना मोबदला दिली होती. त्याकरिता आईने व मी कोऱ्या स्टॅंप पेपरवरती सह्या केल्या होत्या. मात्र याच जागेत सहहिस्सेदार असलेल्या बहिणींची संमत्ती घेतली नव्हती. कालांतराने ग्रामपंचायतीकडे असलेल्या रस्त्यांच्या नोंदीबाबत माहिती घेतली असता बहिणींच्या खोट्या सह्या मारून संमत्तीपत्र केल्याचे दिसून आले. तत्कालीन सदस्या व विद्यमान सरपंच अंजली अरूण मोहिते यांच्या समक्ष सह्या केल्याचे दाखवले आहे. जिल्हाधिकारी, तहसीलदार, तसेच गटविकास अधिकाऱ्यांनाही बहिणींच्या खऱ्या सह्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. त्याचबरोबर प्रत्यक्षात तीन ते चार फुट पाऊलवाटेसाठी तोंडी संमत्ती असताना ७ ते १० फुटाचा पक्का रस्ता तयार केला जात आहे. त्यासाठी शासनाने डोंगरी विकास निधीतून १० लाख रुपयांचा निधी या रस्त्यावर खर्च झाला आहे. सुरुवातीला दोघांच्या जागा घेण्याचे ठरले होते. मात्र आता लगतची जागा रस्त्यासाठी न घेता केवळ आपल्या जागेतून पाऊलवाटेचे वाढीव काम केले जात असल्याने जमिन शिल्लक राहत नाही. याबाबत गेली दोन वर्षे पंचायत समिती, तहसील स्तरावर सातत्याने पत्रव्यवहार केला जात आहे. उपोषणाची नोटीस दिली, तरी अद्याप त्यावर तोडगा निघालेला नाही. वाढीव रस्त्यासाठी जागा देत नसल्याने दोन्ही वाडीतील ग्रामस्थांनी आमच्या कुटुंबावर बहिष्कार टाकला आहे. वाडीतील कोणत्याही कार्यक्रमांचे निमंत्रण दिले जात नाही. लोकांचे पुर्वीसारखे घरी येणे जाणेही राहिलेले नाही. वाडीतील ग्रामस्थांना हाताशी धरून दडपशाहीची भूमिका केली जात आहे. रस्त्यासाठी बेकायदा केलेले नियमबाह्य असलेले संमत्तीपत्र रद्द करण्यात यावे. गटविकास अधिकाऱ्यांनी आठवड्यात  कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. यापुर्वीही पंचायत समितीने आश्वासने दिली होती. मात्र आता न्याय न मिळाल्यास पंचायत समिती समोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा अनंत चव्हाण यांनी दिला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीroad transportरस्ते वाहतूकChiplunचिपळुण