शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

Ratnagiri: रस्त्याला जागा दिली तरीही कुटुंब वाळीत!, अलोरे वरचीवाडी येथील चव्हाण कुटुंबाची कैफियत

By संदीप बांद्रे | Updated: December 5, 2023 16:59 IST

न्याय न मिळाल्यास पंचायत समिती समोर आत्मदहनाचा इशारा

चिपळूण : अलोरे वरचीवाडी येथे पायवाटेसाठी ६५ मिटर लांबीची ग्रामपंचायतीला तिन ते चार फुटांची जागा विना मोबदला दिली होती. मात्र कुटुंबातील सहहिस्सेदारांच्या सह्या न घेताच त्यांच्या खोट्या सह्या मारण्यात आल्या. शिवाय तिन चार फुटाची जागा दिली असताना १० फूट रस्ता केला जात आहे. वाढीव रस्त्याला आमचा विरोध असून रस्त्यासाठी जागा देत नसल्याने ग्रामस्थांनी आम्हाला वाळीत टाकल्याची कैफीयत अलोरे वरचीवाडी येथील अनंत शंकर चव्हाण दांम्पत्यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत माडंली.रस्त्याबाबत झालेल्या फसवणूकीबाबत माहिती देताना अनंत चव्हाण म्हणाले की, अलोरे वरचीवाडी येथे पाऊलवाटेसाठी ग्रामपंचायतीने केलेल्या मागणीनुसार तीन ते चार फुट रूंदीची ६५ मीटर लांब जागा विना मोबदला दिली होती. त्याकरिता आईने व मी कोऱ्या स्टॅंप पेपरवरती सह्या केल्या होत्या. मात्र याच जागेत सहहिस्सेदार असलेल्या बहिणींची संमत्ती घेतली नव्हती. कालांतराने ग्रामपंचायतीकडे असलेल्या रस्त्यांच्या नोंदीबाबत माहिती घेतली असता बहिणींच्या खोट्या सह्या मारून संमत्तीपत्र केल्याचे दिसून आले. तत्कालीन सदस्या व विद्यमान सरपंच अंजली अरूण मोहिते यांच्या समक्ष सह्या केल्याचे दाखवले आहे. जिल्हाधिकारी, तहसीलदार, तसेच गटविकास अधिकाऱ्यांनाही बहिणींच्या खऱ्या सह्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. त्याचबरोबर प्रत्यक्षात तीन ते चार फुट पाऊलवाटेसाठी तोंडी संमत्ती असताना ७ ते १० फुटाचा पक्का रस्ता तयार केला जात आहे. त्यासाठी शासनाने डोंगरी विकास निधीतून १० लाख रुपयांचा निधी या रस्त्यावर खर्च झाला आहे. सुरुवातीला दोघांच्या जागा घेण्याचे ठरले होते. मात्र आता लगतची जागा रस्त्यासाठी न घेता केवळ आपल्या जागेतून पाऊलवाटेचे वाढीव काम केले जात असल्याने जमिन शिल्लक राहत नाही. याबाबत गेली दोन वर्षे पंचायत समिती, तहसील स्तरावर सातत्याने पत्रव्यवहार केला जात आहे. उपोषणाची नोटीस दिली, तरी अद्याप त्यावर तोडगा निघालेला नाही. वाढीव रस्त्यासाठी जागा देत नसल्याने दोन्ही वाडीतील ग्रामस्थांनी आमच्या कुटुंबावर बहिष्कार टाकला आहे. वाडीतील कोणत्याही कार्यक्रमांचे निमंत्रण दिले जात नाही. लोकांचे पुर्वीसारखे घरी येणे जाणेही राहिलेले नाही. वाडीतील ग्रामस्थांना हाताशी धरून दडपशाहीची भूमिका केली जात आहे. रस्त्यासाठी बेकायदा केलेले नियमबाह्य असलेले संमत्तीपत्र रद्द करण्यात यावे. गटविकास अधिकाऱ्यांनी आठवड्यात  कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. यापुर्वीही पंचायत समितीने आश्वासने दिली होती. मात्र आता न्याय न मिळाल्यास पंचायत समिती समोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा अनंत चव्हाण यांनी दिला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीroad transportरस्ते वाहतूकChiplunचिपळुण