शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायावळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
2
Rinku Singh: क्रिकेटविश्व हादरलं! क्रिकेटपटू रिंकू सिंहला दाऊद गँगची धमकी, १० कोटींची खंडणी मागितली
3
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
4
कोकणवासीयांच्या मदतीला शरद पवार सरसावले, ३२ ट्रेनची यादीच दिली; म्हणाले, ‘या’ ठिकाणी थांबवा!
5
AI मुळे आयटी क्षेत्रात मोठी उलथापालथ! TCS, विप्रो, मायक्रोसॉफ्टसह जगभरात हजारो कर्मचाऱ्यांची नोकरकपात
6
अफगाणी परराष्ट्रमंत्री आजपासून 8 दिवसांच्या भारत दौऱ्यावर; कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार? जाणून घ्या...
7
Tata Capital IPO Allotment: टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
8
"बस्तर बदलतंय... बंदूक, दारुगोळ्याचा धूर नाही तर वाहताहेत विकासाचे आणि विश्वासाचे वारे"
9
अशांत, अस्वस्थ, सैरभैर वाटत असेल तर संकष्टीपासून सुरू करा 'हा' छोटासा पण प्रभावी उपाय!
10
रोहित शर्माने विकत घेतली नवीन आलिशान Tesla Model Y कार, त्याची खासियत काय आणि किंमत किती?
11
श्रीमंतांच्या यादीत मोठी उलथापालथ! एअरटेलचे मित्तल यांची मोठी झेप, शिव नादरांची घसरण, पहिलं कोण?
12
Saif Ali Khan : "चाकू हल्ल्यात जेह झालेला जखमी..."; ८ महिन्यांनी सैफने सांगितलं 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
13
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
14
“योगेश कदमांनी अधिकाराचा गैरवापर करत गुंडाला अभय दिले, राजीनामा द्यावा”; ठाकरे गटाची मागणी
15
“शेतकऱ्यांना भरीव मदतीची दानत नाही, तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे”; शरद पवार गटाची मागणी
16
या एका कारणामुळे 'कांतारा चॅप्टर १' बनला ब्लॉकबस्टर; ऋषभ शेट्टीने सांगितलं सिनेमाच्या यशामागचं सीक्रेट
17
इराण युद्ध अमेरिकाच नाही, तर 'या' देशानेही इस्रायलला दिला होता मोठा पाठिंबा!४ महिन्यांनंतर झाला खुलासा
18
संकष्ट चतुर्थी: भारतातील एकमेव १८ हातांच्या गणपतीचे मंदिर पाहिले का? आपल्या महाराष्ट्रातच आहे!
19
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?
20
Cough Syrup : "पप्पा, मला मोबाईल द्या ना...", वेदांशचे शेवटचे शब्द; १२ लाख खर्च करूनही वाचला नाही जीव

विमानसेवा बंद असल्यामुळे आंबा निर्यातीवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : आंबा उत्पादन कमी असतानाही परदेशातून आंब्याला चांगली मागणी होत असताना कोरोनामुळे दि. ३० ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : आंबा उत्पादन कमी असतानाही परदेशातून आंब्याला चांगली मागणी होत असताना कोरोनामुळे दि. ३० एप्रिलपर्यंत विमान वाहतूक सेवा बंद करण्यात आली असल्याने निर्यातीलाही ब्रेक लागले आहेत. मात्र दिल्लीतून आंब्याला चांगली मागणी होत आहे. नुकताच १८०० डझन आंबा दिल्लीत पाठविण्यात आला आहे. आतापर्यंत रत्नागिरीतून दिल्लीमध्ये सात हजार दोनशे डझन आंबा पाठविण्यात आला आहे.

आंबा उत्पादन कमी असल्याने निर्यातीवर परिणाम झाला असतानाच आता विमानसेवा बंद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांकडील दुसऱ्या टप्प्यातील आंबा सुरू झाला आहे. परदेशांतून मागणी चांगली होती. आतापर्यंत कॅनडासाठी ४५० डझन, लंडनसाठी ७८८ डझन, तर कतारसाठी ४२६ डझन आंबा निर्यात झाला आहे. दिल्लीसाठी एकूण सात हजार २०० डझन आंबा पाठविण्यात आला आहे.

पणन विभागाच्या माध्यमातून सद्गुरू एंटरप्रायझेसतर्फे शेतकऱ्यांशी संपर्क साधण्यात येऊन रत्नागिरीतून थेट निर्यात करण्यात येत होती. त्यासाठी चांगला प्रतिसाद लाभत होता; मात्र कोरोनामुळे परदेशातील विमानसेवा दि. ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे थेट निर्यात बंद ठेवण्यात आली आहे.

....................

अपेडाच्या मान्यतेने सद्गुरू एंटरप्रायझेसतर्फे येथील शेतकऱ्यांना जाग्यावरच चांगला दर प्राप्त व्हावा, यासाठी जगातील विविध देशांपर्यंत आंबा पोहोचावा, यासाठी थेट निर्यातीवर भर देण्यात आला होता. सध्या विमानसेवेमुळे निर्यात बंद असली तरी दिल्लीसह मुंबई व अन्य राज्यांत आंबा विक्रीसाठी सद्गुरू एंटरप्रायझेसचे प्रयत्न सुरू आहेत.

- प्रांजली प्रशांत नारकर, संचालिका, सद‌्गुरू एंटरप्रायझेस