शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
3
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
4
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
5
लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
7
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
8
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
9
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
10
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
11
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
12
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
13
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
15
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
16
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
17
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
18
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
19
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
20
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा

बाप्पा, पुढच्या वर्षी लवकर या!, रत्नागिरी जिल्ह्यातील एक लाख १४ हजार गणेशमूर्तींचे विसर्जन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2022 12:48 IST

भाविकांना विसर्जन करण्यासाठी नगर परिषदेतर्फे खास कर्मचारी उपलब्ध केले होते. भाविकांनी गर्दीत जाण्याऐवजी जवळच्या कुत्रिम तलावात गणेश मूर्तींचे विसर्जन केले.

रत्नागिरी : गेले सहा दिवस उत्साहात सुरू असलेल्या गणेशोत्सवाची सांगता बाप्पाच्या विसर्जनाने झाली. मिरवणूका, वाद्यवृंदाना परवानगी असल्याने यावर्षी भाविकांचा जल्लोष अधिक होता. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ च्या जयजयकारात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. जिल्ह्यातील एक लाख १४ हजार ९६५ गणेशमूर्तींचे गौरींसह विसर्जन करण्यात आले.भाद्रपद चतुर्थीला १ लाख ६५ हजार गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. गेले सहा दिवस गणरायाची मनोभावे सेवा केल्यानंतर सोमवारी जिल्ह्यातील एक लाख १४ हजार ९६५ गणेशमूर्तींचे विसर्जन होणार असल्याने शहरातील मांडवीसह जिल्ह्यातील प्रमुख विसर्जनस्थळांवर पोलीस यंत्रणेकडून बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दुपारी आरतीनंतर अनेक भाविकांनी गणेशमूर्ती मखरातून बाहेर काढल्या होत्या. सकाळी पावसाची सर बरसली मात्र दिवसभर विश्रांती घेतल्याने यावर्षी भाविकांनी गणेश विसर्जन मिरवणूका काढल्या. गुलालाची उधळण करीत बेंजो, ढोल ताशा पथक, लेझीम पथकासह मिरवणूका काढण्यात आल्या.आबालवृध्दांनी वाद्यवृंदाच्या तालावर थिरकण्याचा आनंद घेतला. रिक्षा, कार, बोलेरो आदि वाहनातून गणेशमूर्ती विसर्जनासाठी नेण्यात येत होत्या. काही भाविक निरोपाची आरती घरून करून आले होते तर काही भाविकांनी विसर्जन घाटावर आरती केली. शहरातील मांडवी किनाऱ्यावर विसर्जनासाठी भाविकांची दुपारपासूनच ये-जा सुरू होती. विसर्जनस्थळी गर्दी होऊ नये यासाठी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. आरती झालेनंतर मूर्ती विसर्जन करणाऱ्या मंडळीकडे सुपूर्द करण्यात येत होती. निर्माल्य संकलनासाठी खास व्यवस्था करण्यात आली होती. नगर परिषदेकडून मांडवी किनाऱ्यावर कलशकुंड ठेवले होते. शिवाय गाड्याही तैनात ठेवल्या होत्या.

विसर्जनासाठी कुत्रिम तलावाची उपलब्धता

माझी वसुंधरा स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत जिल्ह्यात चार नगर परिषद व पाच नगर पंचायतीतर्फे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. गणेशोत्सवानिमित्त पर्यावरण संरक्षणासाठी विसर्जनासाठी कुत्रिम तलावाची व्यवस्था ठिकठिकाणी करण्यात आली होती. रत्नागिरी नगरपरिषदेतर्फेही शहरात विसर्जनासाठी सुविधा उपलब्ध करून दिली होती. माळनाका व्यायामशाळा, लक्ष्मीचौक उद्यान गाडीतळ, अनंत कान्हेरे उद्यान जयस्तंभ, विश्वनगर उद्यान याठिकाणी कृत्रिम तलाव तयार करण्यात आले होते. भाविकांना विसर्जन करण्यासाठी नगर परिषदेतर्फे खास कर्मचारी उपलब्ध केले होते. भाविकांनी गर्दीत जाण्याऐवजी जवळच्या कुत्रिम तलावात गणेश मूर्तींचे विसर्जन केले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीGanesh Mahotsavगणेशोत्सव