शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
2
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
3
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
4
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
5
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
6
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
7
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
8
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
9
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
10
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
11
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
12
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
13
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
14
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
15
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
16
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
17
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
18
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
20
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'

शिवतरच्या नशिबी दुर्लक्षच

By admin | Updated: October 13, 2015 00:12 IST

खेड तालुका : राज्य सरकारच्या पुढाकाराची गरज

श्रीकांत चाळके-- खेड--पहिल्या आणि दुसऱ्या महायुध्दामध्ये धारातिर्थी पडलेल्या शिवतर येथील २३४ जवानांच्या स्मरणाचा राज्य सरकारला विसर पडला आहे़ या गावातील धारातिर्थी पडलेल्या जवानांचे स्मरण व्हावे म्हणून इंग्रज सरकारने या गावामध्ये उभारलेला रणस्तंभ हाच या कर्तबगार जवांनाच्या शौर्याची साक्ष देत आहे़ शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दोन वर्षांपूर्वी दिलेल्या १५ लाख रूपये खर्चातून या रणस्तंभाची डागडुजी करण्यात आली. याकरिता रामदास कदम यांनीच विशेष प्रयत्न केले होते. दोन्ही युध्दामध्ये अतुल शौर्य दाखविणारा शिवतर गाव तसा विविध सुविधांपासून वंचितच राहिला आहे. या गावाला फौजी गावचा दर्जा मिळाल्यास हा गाव सुजलाम् सुफलाम् होणार आहे़ मात्र, याकामी आता राज्य सरकारनेच पुढाकार घेतल्यास दोन्ही युध्दामध्ये रक्त सांडलेल्या जवानांनी केलेल्या प्रयत्नांचे खऱ्या अर्थाने चीज होणार आहे़ या गावातील आजी आणि माजी जवानांनी शिवतर गावाला केंद्राकडून निधी प्राप्त होण्यासाठी वारंवार प्रयत्न केले आहेत़ मात्र, त्यामध्ये त्यांना यश आले नाही़ आतापर्यंतच्या सर्वच आमदार तसेच लोकप्रतिनिधींनी आणि समाजोपयोगी कामाचा टेंभा मिरवणाऱ्यांनी याकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येत आहे. येथील रणस्तंभ हाच येथील जवानांच्या पराक्रमाची साक्ष देत उभा आहे़ हा रणस्तंभदेखील दुर्लक्षित होता. मात्र, रामदास कदम यांनी दिवंगत सैनिकांच्या अतुल शौर्याला सलाम करीत मातृभूमीप्रती दाखवलेल्या औदार्याबद्दल येथील जवान कृतार्थ झाले आहेत. आता दुर्लक्षित राहिलेल्या शिवतर गावचे ‘फौजी शिवतर’ असे नामकरण करण्यासाठी प्रयत्न करावे, असे या जवानांना वाटते. राज्य सरकारने याकडे कटाक्षाने लक्ष घालावे, अशी मागणीदेखील यानिमित्ताने या जवानांनी केली आहे. शिवतर गाव हा संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यासह महाराष्ट्राची शान आहे. संपूर्ण भारतात शिवतर गावाची फौजी म्हणूनच स्वतंत्र ओळख आहे़ ब्रिटिशांच्या काळात याच गावातील शेकडो जवांनानी आपल्या मातृभूमीप्रती बलिदान दिले आहे. महाराष्टा्रतील एवढ्या मोठ्या प्रमाणात बलिदान दिलेल्या जवानांचे हे एकमेव गाव आहे. मात्र, या बदल्यात गावामध्ये माजी सैनिकांच्या तसेच त्यांच्या पाल्यांच्या कल्याणार्थ कोणतीही विकासकामे झाली नाहीत. जवानांसाठी आरोग्यदृष्ट्या कोणतीही सुविधा या सैनिकांच्या गावामध्ये उपलब्ध नाही. शिक्षण आणि सामाजिक बांधिलकीपासून हे गाव अद्याप कोसो अंतर दूर आहे. खेड शहरापासून १३ किलोमीटर अंतरावर असलेले हे गाव आजही अत्यावश्यक सुविधांच्या प्रतीक्षेत आहे़ याकरिता आता राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.मागणी : ‘फौजी शिवतर’चा प्रस्तावरायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील आंबवडे गावाचे नुकतेच ‘फौजी आंबवडे’ असे नामकरण करून भारत सरकारने येथील धारातिर्थी पडलेल्या जवानांना दोन वर्षांपूर्वी न्याय मिळवून दिला आहे़ याच धर्तीवर शिवतर गावाचे ‘‘फौजी शिवतर’’ असे नामकरण करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे़ अपुरी माहितीरणस्तंभावर २३४पैकी केवळ १८ जवानांची नावे आहेत़ उर्वरित जवानांची येथील सैनिकांच्या नातेवाईकांना अद्याप माहिती नाही.