शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

शिवतरच्या नशिबी दुर्लक्षच

By admin | Updated: October 13, 2015 00:12 IST

खेड तालुका : राज्य सरकारच्या पुढाकाराची गरज

श्रीकांत चाळके-- खेड--पहिल्या आणि दुसऱ्या महायुध्दामध्ये धारातिर्थी पडलेल्या शिवतर येथील २३४ जवानांच्या स्मरणाचा राज्य सरकारला विसर पडला आहे़ या गावातील धारातिर्थी पडलेल्या जवानांचे स्मरण व्हावे म्हणून इंग्रज सरकारने या गावामध्ये उभारलेला रणस्तंभ हाच या कर्तबगार जवांनाच्या शौर्याची साक्ष देत आहे़ शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दोन वर्षांपूर्वी दिलेल्या १५ लाख रूपये खर्चातून या रणस्तंभाची डागडुजी करण्यात आली. याकरिता रामदास कदम यांनीच विशेष प्रयत्न केले होते. दोन्ही युध्दामध्ये अतुल शौर्य दाखविणारा शिवतर गाव तसा विविध सुविधांपासून वंचितच राहिला आहे. या गावाला फौजी गावचा दर्जा मिळाल्यास हा गाव सुजलाम् सुफलाम् होणार आहे़ मात्र, याकामी आता राज्य सरकारनेच पुढाकार घेतल्यास दोन्ही युध्दामध्ये रक्त सांडलेल्या जवानांनी केलेल्या प्रयत्नांचे खऱ्या अर्थाने चीज होणार आहे़ या गावातील आजी आणि माजी जवानांनी शिवतर गावाला केंद्राकडून निधी प्राप्त होण्यासाठी वारंवार प्रयत्न केले आहेत़ मात्र, त्यामध्ये त्यांना यश आले नाही़ आतापर्यंतच्या सर्वच आमदार तसेच लोकप्रतिनिधींनी आणि समाजोपयोगी कामाचा टेंभा मिरवणाऱ्यांनी याकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येत आहे. येथील रणस्तंभ हाच येथील जवानांच्या पराक्रमाची साक्ष देत उभा आहे़ हा रणस्तंभदेखील दुर्लक्षित होता. मात्र, रामदास कदम यांनी दिवंगत सैनिकांच्या अतुल शौर्याला सलाम करीत मातृभूमीप्रती दाखवलेल्या औदार्याबद्दल येथील जवान कृतार्थ झाले आहेत. आता दुर्लक्षित राहिलेल्या शिवतर गावचे ‘फौजी शिवतर’ असे नामकरण करण्यासाठी प्रयत्न करावे, असे या जवानांना वाटते. राज्य सरकारने याकडे कटाक्षाने लक्ष घालावे, अशी मागणीदेखील यानिमित्ताने या जवानांनी केली आहे. शिवतर गाव हा संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यासह महाराष्ट्राची शान आहे. संपूर्ण भारतात शिवतर गावाची फौजी म्हणूनच स्वतंत्र ओळख आहे़ ब्रिटिशांच्या काळात याच गावातील शेकडो जवांनानी आपल्या मातृभूमीप्रती बलिदान दिले आहे. महाराष्टा्रतील एवढ्या मोठ्या प्रमाणात बलिदान दिलेल्या जवानांचे हे एकमेव गाव आहे. मात्र, या बदल्यात गावामध्ये माजी सैनिकांच्या तसेच त्यांच्या पाल्यांच्या कल्याणार्थ कोणतीही विकासकामे झाली नाहीत. जवानांसाठी आरोग्यदृष्ट्या कोणतीही सुविधा या सैनिकांच्या गावामध्ये उपलब्ध नाही. शिक्षण आणि सामाजिक बांधिलकीपासून हे गाव अद्याप कोसो अंतर दूर आहे. खेड शहरापासून १३ किलोमीटर अंतरावर असलेले हे गाव आजही अत्यावश्यक सुविधांच्या प्रतीक्षेत आहे़ याकरिता आता राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.मागणी : ‘फौजी शिवतर’चा प्रस्तावरायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील आंबवडे गावाचे नुकतेच ‘फौजी आंबवडे’ असे नामकरण करून भारत सरकारने येथील धारातिर्थी पडलेल्या जवानांना दोन वर्षांपूर्वी न्याय मिळवून दिला आहे़ याच धर्तीवर शिवतर गावाचे ‘‘फौजी शिवतर’’ असे नामकरण करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे़ अपुरी माहितीरणस्तंभावर २३४पैकी केवळ १८ जवानांची नावे आहेत़ उर्वरित जवानांची येथील सैनिकांच्या नातेवाईकांना अद्याप माहिती नाही.