शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

शिवतरच्या नशिबी दुर्लक्षच

By admin | Updated: October 13, 2015 00:12 IST

खेड तालुका : राज्य सरकारच्या पुढाकाराची गरज

श्रीकांत चाळके-- खेड--पहिल्या आणि दुसऱ्या महायुध्दामध्ये धारातिर्थी पडलेल्या शिवतर येथील २३४ जवानांच्या स्मरणाचा राज्य सरकारला विसर पडला आहे़ या गावातील धारातिर्थी पडलेल्या जवानांचे स्मरण व्हावे म्हणून इंग्रज सरकारने या गावामध्ये उभारलेला रणस्तंभ हाच या कर्तबगार जवांनाच्या शौर्याची साक्ष देत आहे़ शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दोन वर्षांपूर्वी दिलेल्या १५ लाख रूपये खर्चातून या रणस्तंभाची डागडुजी करण्यात आली. याकरिता रामदास कदम यांनीच विशेष प्रयत्न केले होते. दोन्ही युध्दामध्ये अतुल शौर्य दाखविणारा शिवतर गाव तसा विविध सुविधांपासून वंचितच राहिला आहे. या गावाला फौजी गावचा दर्जा मिळाल्यास हा गाव सुजलाम् सुफलाम् होणार आहे़ मात्र, याकामी आता राज्य सरकारनेच पुढाकार घेतल्यास दोन्ही युध्दामध्ये रक्त सांडलेल्या जवानांनी केलेल्या प्रयत्नांचे खऱ्या अर्थाने चीज होणार आहे़ या गावातील आजी आणि माजी जवानांनी शिवतर गावाला केंद्राकडून निधी प्राप्त होण्यासाठी वारंवार प्रयत्न केले आहेत़ मात्र, त्यामध्ये त्यांना यश आले नाही़ आतापर्यंतच्या सर्वच आमदार तसेच लोकप्रतिनिधींनी आणि समाजोपयोगी कामाचा टेंभा मिरवणाऱ्यांनी याकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येत आहे. येथील रणस्तंभ हाच येथील जवानांच्या पराक्रमाची साक्ष देत उभा आहे़ हा रणस्तंभदेखील दुर्लक्षित होता. मात्र, रामदास कदम यांनी दिवंगत सैनिकांच्या अतुल शौर्याला सलाम करीत मातृभूमीप्रती दाखवलेल्या औदार्याबद्दल येथील जवान कृतार्थ झाले आहेत. आता दुर्लक्षित राहिलेल्या शिवतर गावचे ‘फौजी शिवतर’ असे नामकरण करण्यासाठी प्रयत्न करावे, असे या जवानांना वाटते. राज्य सरकारने याकडे कटाक्षाने लक्ष घालावे, अशी मागणीदेखील यानिमित्ताने या जवानांनी केली आहे. शिवतर गाव हा संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यासह महाराष्ट्राची शान आहे. संपूर्ण भारतात शिवतर गावाची फौजी म्हणूनच स्वतंत्र ओळख आहे़ ब्रिटिशांच्या काळात याच गावातील शेकडो जवांनानी आपल्या मातृभूमीप्रती बलिदान दिले आहे. महाराष्टा्रतील एवढ्या मोठ्या प्रमाणात बलिदान दिलेल्या जवानांचे हे एकमेव गाव आहे. मात्र, या बदल्यात गावामध्ये माजी सैनिकांच्या तसेच त्यांच्या पाल्यांच्या कल्याणार्थ कोणतीही विकासकामे झाली नाहीत. जवानांसाठी आरोग्यदृष्ट्या कोणतीही सुविधा या सैनिकांच्या गावामध्ये उपलब्ध नाही. शिक्षण आणि सामाजिक बांधिलकीपासून हे गाव अद्याप कोसो अंतर दूर आहे. खेड शहरापासून १३ किलोमीटर अंतरावर असलेले हे गाव आजही अत्यावश्यक सुविधांच्या प्रतीक्षेत आहे़ याकरिता आता राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.मागणी : ‘फौजी शिवतर’चा प्रस्तावरायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील आंबवडे गावाचे नुकतेच ‘फौजी आंबवडे’ असे नामकरण करून भारत सरकारने येथील धारातिर्थी पडलेल्या जवानांना दोन वर्षांपूर्वी न्याय मिळवून दिला आहे़ याच धर्तीवर शिवतर गावाचे ‘‘फौजी शिवतर’’ असे नामकरण करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे़ अपुरी माहितीरणस्तंभावर २३४पैकी केवळ १८ जवानांची नावे आहेत़ उर्वरित जवानांची येथील सैनिकांच्या नातेवाईकांना अद्याप माहिती नाही.