शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

पाण्यात पक्षपाती केल्यास नगर परिषदेला टाळे ठोकणार, रत्नागिरीत शिवसेना ठाकरे पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

By मेहरून नाकाडे | Updated: September 27, 2023 18:46 IST

रत्नागिरी : शीळ धरणावरील नवीन जॅकवेल दीड महिन्यापूर्वी झाले असताना पाणी पुरवठा सुरू का केला नाही? नियोजनशुन्य कारभारामुळे शहरावर ...

रत्नागिरी : शीळ धरणावरील नवीन जॅकवेल दीड महिन्यापूर्वी झाले असताना पाणी पुरवठा सुरू का केला नाही? नियोजनशुन्य कारभारामुळे शहरावर पाणी संकट असून जो पाणी पुरवठा होतो त्यामध्ये पक्षीय राजकारण सुरू आहे. पाण्यात पक्षपातीपणा केला, तर नगर परिषदेला टाळे ठोकण्याचा इशारा ठाकरे शिवसेनेने नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासन अधिकारी आणि पाणी अभियंत्यांना दिला आहे.शहरातील पाणी प्रश्न गंभीर असून अनेक भागात चार-चार दिवस पाणी पुरवठा झालेला नाही. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारींचा विचार करून ठाकरे शिवसेनेने नगर परिषदेवर बुधवारी मोर्चा काढण्याचे जाहीर केले होते. परंतु प्रत्यक्ष मोर्चा दिसला नाही. काही ठराविक पदाधिकारी थेट वाहनांवरून नगर परिषदेवर धडकले. तालुकाप्रमुख बंड्या साळवी, शहर प्रमुख प्रशांत साळुंखे, महिला पदाधिकाऱ्यांनी नेतृत्व केले. नगर परिषदेत आलेनंतर मुख्याधिकारी तुषार बाबर दालनात नसल्याने त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. काही वेळात मुख्याधिकारी आल्यानंतर सर्व पदाधिकारी त्यांच्या दालनात गेले. यावेळी पाणी अभियंता अविनाश भोईर व अन्य कर्मचाऱी समवेत होते. यावेळी पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांवर प्रश्नाची सरबत्ती सुरू केली. शहरात गेल्या काही दिवसांपासून पिण्याचा पाण्याचा गंभीर प्रश्न आहे. यावर नगर परिषदेने काय नियोजन केले? ठेकेदाराने यात दिरंगाई केली असेल तर त्यांच्यावर फाैजदारी दाखल करा. परंतु जनतेला पाण्यापासून वंचित ठेऊ नका. पाण्याच्या नियोजनासाठी इतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून बैठक घेतली. आम्हाला का नाही बोलावले?

आजपासून प्रत्येक प्रभागात १ अशा १६ टॅंकरचे नियोजन करा. त्याची पुर्ण माहिती शहर प्रमुख प्रशांत साळुंखे यांना द्यावी. यावर मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी आम्ही तसे नियोजन करून तुम्हाला माहिती देतो, असे सांगितले. मात्र जर तसे झाले नाही, तर नगरपरिषदेला कुलुप ठोकू, या राजकारणाला तुम्ही बळी पडू नका, असा इशारा यावेळी शिवसेनेने दिला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीShiv SenaशिवसेनाWaterपाणी