शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

मुंबई-गोवा महामार्गाच्या कामात आडवे आल्यास गय करणार नाही, मंत्री रवींद्र चव्हाण यांची तंबी

By अरुण आडिवरेकर | Updated: August 31, 2023 17:35 IST

रत्नागिरी : मुंबई - गाेवा महामार्गाचे काम कोणामुळे रखडले याचा आधी अभ्यास करावा. आपल्याला हे काम पूर्ण करायचे आहे. ...

रत्नागिरी : मुंबई - गाेवा महामार्गाचे काम कोणामुळे रखडले याचा आधी अभ्यास करावा. आपल्याला हे काम पूर्ण करायचे आहे. मात्र, रस्ते कामात अडथळा आणून आडवे येण्याचा प्रयत्न केल्यास गय केली जाणार नाही, अशी तंबी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.मुंबई-गोवामहामार्गाचे काम गेल्या १२ वर्षांपासून रखडले आहे. निधीची कमतरता नसतानाही तरीही काम का पूर्ण होत नाही, असे प्रश्न उपस्थित केले आहेत. या पार्श्वभूमीवर महामार्ग रखडण्यामागील कारणे, स्थानिकांचे प्रश्न व त्यावर उपाय या विषयी कोकणवासीयांबरोबर चर्चा करण्यासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री चव्हाण यांनी डोंबिवली जिमखाना-मुंबई येथे खुले चर्चासत्र आयोजित केले होते. कोकण विकास समितीने यासाठी पुढाकार घेतला होता. यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मनाेगत व्यक्त केले.मंत्री चव्हाण म्हणाले की, मुंबई-गोवा महामार्गाच्या १२ वर्षांपासून रखडलेल्या रस्ते कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आतापर्यंत ४ हजार ५०० कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे; मात्र तरीही निधी व अन्य काही कारणे देत महामार्गाच्या रस्त्याचे काम रखडले आहे. या कामाच्या या पूर्वीच्या सर्व खर्चाचे विशेष लेखापरीक्षण करण्यात येईल, अशी घोषणा सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी केली.मुंबई-गोवा महामार्गाचे काम येत्या डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण करून एक मार्गिका गणेशोत्सवापूर्वी खुली करण्याच्यादृष्टीने सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. महामार्गाच्या रस्तेकामाच्या पाहणीसाठी सातत्याने दौरे करत अधिकाऱ्यांना सूचना करत आहेत. मात्र, या मार्गावरुन सरकारवर निशाणा साधला जात असल्याने मंत्री चव्हाण यांनी त्याचाही समाचार घेतला.कोकण विभागातून आलेल्या नागरिकांनी रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले. सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी सर्व प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. महामार्गावरील एक मार्गिका गणेशोत्सवापूर्वी कोकणवासीयांना खुली केली जाईल, असा विश्वासही मंत्री चव्हाण यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीgoaगोवाMumbaiमुंबईhighwayमहामार्ग