शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

मुंबई-गोवा महामार्गाच्या कामात आडवे आल्यास गय करणार नाही, मंत्री रवींद्र चव्हाण यांची तंबी

By अरुण आडिवरेकर | Updated: August 31, 2023 17:35 IST

रत्नागिरी : मुंबई - गाेवा महामार्गाचे काम कोणामुळे रखडले याचा आधी अभ्यास करावा. आपल्याला हे काम पूर्ण करायचे आहे. ...

रत्नागिरी : मुंबई - गाेवा महामार्गाचे काम कोणामुळे रखडले याचा आधी अभ्यास करावा. आपल्याला हे काम पूर्ण करायचे आहे. मात्र, रस्ते कामात अडथळा आणून आडवे येण्याचा प्रयत्न केल्यास गय केली जाणार नाही, अशी तंबी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.मुंबई-गोवामहामार्गाचे काम गेल्या १२ वर्षांपासून रखडले आहे. निधीची कमतरता नसतानाही तरीही काम का पूर्ण होत नाही, असे प्रश्न उपस्थित केले आहेत. या पार्श्वभूमीवर महामार्ग रखडण्यामागील कारणे, स्थानिकांचे प्रश्न व त्यावर उपाय या विषयी कोकणवासीयांबरोबर चर्चा करण्यासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री चव्हाण यांनी डोंबिवली जिमखाना-मुंबई येथे खुले चर्चासत्र आयोजित केले होते. कोकण विकास समितीने यासाठी पुढाकार घेतला होता. यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मनाेगत व्यक्त केले.मंत्री चव्हाण म्हणाले की, मुंबई-गोवा महामार्गाच्या १२ वर्षांपासून रखडलेल्या रस्ते कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आतापर्यंत ४ हजार ५०० कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे; मात्र तरीही निधी व अन्य काही कारणे देत महामार्गाच्या रस्त्याचे काम रखडले आहे. या कामाच्या या पूर्वीच्या सर्व खर्चाचे विशेष लेखापरीक्षण करण्यात येईल, अशी घोषणा सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी केली.मुंबई-गोवा महामार्गाचे काम येत्या डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण करून एक मार्गिका गणेशोत्सवापूर्वी खुली करण्याच्यादृष्टीने सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. महामार्गाच्या रस्तेकामाच्या पाहणीसाठी सातत्याने दौरे करत अधिकाऱ्यांना सूचना करत आहेत. मात्र, या मार्गावरुन सरकारवर निशाणा साधला जात असल्याने मंत्री चव्हाण यांनी त्याचाही समाचार घेतला.कोकण विभागातून आलेल्या नागरिकांनी रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले. सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी सर्व प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. महामार्गावरील एक मार्गिका गणेशोत्सवापूर्वी कोकणवासीयांना खुली केली जाईल, असा विश्वासही मंत्री चव्हाण यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीgoaगोवाMumbaiमुंबईhighwayमहामार्ग