शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गाची दुरुस्ती न झाल्यास सत्याग्रह करणार : हुसेन दलवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 10:48 IST

मुंबई-गोवा महामार्गाची एवढी वाईट परिस्थिती कधीही नव्हती. महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी निधी दिला म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ओरडून सांगत आहेत. मात्र सध्या साधी दुरुस्तीही होत नाही. महिनाभरात जर रस्त्यांची दुरुस्ती झाली नाही तर पनवेल ते सावंतवाडीपर्यंत काँग्रेस सत्याग्रह करणार असल्याचा इशारा खासदार हुसेन दलवाई यांनी दिला.

ठळक मुद्देपनवेल ते सावंतवाडीपर्यंत काँग्रेस सत्याग्रह करणार माजी आमदार रमेश कदम यांच्यासाठी काँग्रेसचे दरवाजे उघडे

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गाची एवढी वाईट परिस्थिती कधीही नव्हती. महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी निधी दिला म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ओरडून सांगत आहेत. मात्र सध्या साधी दुरुस्तीही होत नाही. महिनाभरात जर रस्त्यांची दुरुस्ती झाली नाही तर पनवेल ते सावंतवाडीपर्यंत काँग्रेस सत्याग्रह करणार असल्याचा इशारा खासदार हुसेन दलवाई यांनी दिला.

कोकणातील रस्त्यांच्या एकंदर परिस्थितीबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. खासदार दलवाई चिपळूण येथे आले असता शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मंत्री गडकरी यांच्याकडून निधी दिल्याच्या फसव्या घोषणा केल्या जात आहेत. आश्वासनांची खैरात होत आहे. पण निधी नसल्याने चौपदरीकरणातील पुलांची कामे बंद पडली आहेत.

रस्त्याची कंत्राटे ज्या कंपन्याना दिली गेली आहेत त्यांनाच दुरुस्ती करण्यास सांगितली आहेत. मात्र एकाही कंपनीने दुरुस्तीचे काम सुरु केलेले नाही. गणपतीपासून लोकप्रतिनिधी ओरड करीत आहेत. मात्र त्याचा काहीच परिणाम सत्ताधाºयांवर होताना दिसत नाही. जीएसटीमुळे कंत्राटदार कंपनी हैराण आहे.

सिंधुदुर्गमध्ये यापूर्वी रस्त्याची एवढी वाईट परिस्थिती नव्हती. पण तेथीलही रस्ते आता खराब झाले आहेत. महिनाभरात रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास पनवेलपासून सावंतवाडीपर्यंत महामार्गावरील प्रमुख शहरांमध्ये सत्याग्रह करण्याचा इशारा खासदार दलवाई यांनी दिला आहे. नारायण राणे यांच्याशी आपले चांगले संबंध आहेत. त्यांच्याशी आपला विचारांचा लढा असल्याने तो विचारानेच लढायला हवा.

सध्या सोशल मिडियावर मोदी विरोधी पोस्ट येत आहेत. त्या काँग्रेसवाल्यानी टाकलेल्या नाहीत तर जनतेमधील उद्रेक समोर येत आहे. नांदेड पालिकेच्या निकालाचा चांगला परिणाम भविष्यात दिसून येईल. गुजरातमध्ये काँग्रेसची स्थिती चांगली आहे. तेथे राहुल गांधींच्या लाखोंच्या सभा होत आहेत. राहूल जिथे जातात तेथे पंतप्रधान मोदी जातात. यावरुन तेथे काँग्रेसची सत्ता येईल असे वाटते असेही खासदार दलवाई यांनी सांगितले.चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम काँग्रेसमध्ये आल्यास त्यांचे केवळ स्वागत नाही तर हार्दिक स्वागत केले जाईल. त्यांच्यासाठी काँग्रेसचे दरवाजे उघडे आहेत. योग्यवेळी आम्ही त्यांचे स्वागत करु. तूर्त आम्ही त्याबाबत काही बोलणार नाही. त्यांनीच त्याबाबत निर्णय घ्यायचा आहे असे खासदार हुसेन दलवाई यांनी सांगितले. 

टॅग्स :konkanकोकणHussein Dalwaiहुसेन दलवाई