शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

राजकीय शक्ती प्रदर्शनासाठी महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळा - दलवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2023 18:48 IST

राजकीय शक्ती प्रदर्शनासाठी महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळा झाला असल्याची टीका हुसेन दलवाई यांनी केली आहे. 

मेहरून नाकाडे

रत्नागिरी : आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याच्या नावाखाली राज्य सरकारने राजकीय शक्ती प्रदर्शन करण्यासाठी या सोहळ्याचा वापर केला. त्यामुळेच वीस पेक्षा अधिक श्री सदस्यांना आपले प्राण गमवावे लागले. या सरकारमधील एकही मंत्री मृत श्री सदस्यांच्या नातेवाईकांचे सांत्वन करण्यासाठी केला नाही. या संपूर्ण घटनेची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करावी, अशी मागणी माजी खासदार तथा प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष हुसेन दलवाई यांनी पत्रकार परिषदेत केली. 

आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या बद्दल मला नितांत आदर आहे, मात्र खारघर येथे आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यासाठी भर दुपारी खुल्या मैदानात राज्य सरकारने सोहळा आयोजित केला गेला. या सोहळ्याला उपस्थित तीनशेपेक्षा अधिक श्री सदस्यांना उन्हाचा त्रास होऊन वीसपेक्षा अधिक श्री सदस्यांचा नाहक बळी गेला. हवामान खात्याने तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असतानाही भर दुपारी सोहळा आयोजित करून राज्य सरकारने श्री सदस्यांचे प्राण घेतले आहेत. कोटयावधी रुपये खर्च पुरस्कार वितरणासाठी करण्यात आला, तर मग मंडप का उभारला नाही? मोठ्या प्रमाणात श्री सदस्यांचे मृत्यू होणे ही गंभीर बाब असून घटनेस कोण जबाबदार आहेत त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी  दलवाई यांनी केली.

वाशिष्टी नदीतील गाळ काढण्याचे कामाची गती आता मंदावली आहे. निधी संपला असून गाळ पूर्णतः काढण्यात यश आलेले नाही. तर जगबुडी खाडीतील गाळ तसेच कोयनानगर धरणातील गाळ काढण्याची मागणी दलवाई यांनी केली. चिपळूण कराड रेल्वे मार्ग सुरू करण्यासाठी सरकारने योग्य भूमिका घ्यावी. मुंबई-गोवा महामार्गाचे काम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी त्यांनी केली. परशुराम घाटातील खोद कामामुळे भविष्यात मंदिराला धोका असल्याचे अभियंत्यांनी मान्य केले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने लक्ष देत मार्ग काढावा अशी सूचना केली. तर आंबा बागायतदारांना झाडामागे नुकसान भरपाई देत काजूला १६० रुपये हमीभाव देण्याची मागणी दलवाई यांनी केली. यावेळी महिला प्रदेशच्या सरचिटणीस रूपाली सावंत, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष हरिष शेकासन, शहराध्यक्ष रमेश शहा, भरत लब्धे , सुरेश पाथरे उपस्थित होते.

  

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीcongressकाँग्रेस