शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राजकीय शक्ती प्रदर्शनासाठी महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळा - दलवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2023 18:48 IST

राजकीय शक्ती प्रदर्शनासाठी महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळा झाला असल्याची टीका हुसेन दलवाई यांनी केली आहे. 

मेहरून नाकाडे

रत्नागिरी : आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याच्या नावाखाली राज्य सरकारने राजकीय शक्ती प्रदर्शन करण्यासाठी या सोहळ्याचा वापर केला. त्यामुळेच वीस पेक्षा अधिक श्री सदस्यांना आपले प्राण गमवावे लागले. या सरकारमधील एकही मंत्री मृत श्री सदस्यांच्या नातेवाईकांचे सांत्वन करण्यासाठी केला नाही. या संपूर्ण घटनेची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करावी, अशी मागणी माजी खासदार तथा प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष हुसेन दलवाई यांनी पत्रकार परिषदेत केली. 

आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या बद्दल मला नितांत आदर आहे, मात्र खारघर येथे आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यासाठी भर दुपारी खुल्या मैदानात राज्य सरकारने सोहळा आयोजित केला गेला. या सोहळ्याला उपस्थित तीनशेपेक्षा अधिक श्री सदस्यांना उन्हाचा त्रास होऊन वीसपेक्षा अधिक श्री सदस्यांचा नाहक बळी गेला. हवामान खात्याने तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असतानाही भर दुपारी सोहळा आयोजित करून राज्य सरकारने श्री सदस्यांचे प्राण घेतले आहेत. कोटयावधी रुपये खर्च पुरस्कार वितरणासाठी करण्यात आला, तर मग मंडप का उभारला नाही? मोठ्या प्रमाणात श्री सदस्यांचे मृत्यू होणे ही गंभीर बाब असून घटनेस कोण जबाबदार आहेत त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी  दलवाई यांनी केली.

वाशिष्टी नदीतील गाळ काढण्याचे कामाची गती आता मंदावली आहे. निधी संपला असून गाळ पूर्णतः काढण्यात यश आलेले नाही. तर जगबुडी खाडीतील गाळ तसेच कोयनानगर धरणातील गाळ काढण्याची मागणी दलवाई यांनी केली. चिपळूण कराड रेल्वे मार्ग सुरू करण्यासाठी सरकारने योग्य भूमिका घ्यावी. मुंबई-गोवा महामार्गाचे काम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी त्यांनी केली. परशुराम घाटातील खोद कामामुळे भविष्यात मंदिराला धोका असल्याचे अभियंत्यांनी मान्य केले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने लक्ष देत मार्ग काढावा अशी सूचना केली. तर आंबा बागायतदारांना झाडामागे नुकसान भरपाई देत काजूला १६० रुपये हमीभाव देण्याची मागणी दलवाई यांनी केली. यावेळी महिला प्रदेशच्या सरचिटणीस रूपाली सावंत, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष हरिष शेकासन, शहराध्यक्ष रमेश शहा, भरत लब्धे , सुरेश पाथरे उपस्थित होते.

  

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीcongressकाँग्रेस