शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

कोकणातील सागरी महामार्गाबाबत नितीन गडकरी उत्साही नाहीत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2023 13:16 IST

मुंबई- गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण कामाला अपेक्षेपेक्षा खूपच वेळ लागला

रत्नागिरी : नवी आव्हानात्मक कामे हाती घेऊन ती वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रसिद्ध असलेले केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी कोकणातील सागरी महामार्गाबाबत मात्र फारशी उत्सुकता दाखवलेली नाही. आधी सध्याचे (मुंबई- गोवा महामार्गाचे) काम होऊद्या, मग बघू, असे मोघम उत्तरच त्यांनी दिले.गुरुवारी रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या मंत्री गडकरी यांनी प्रसारमाध्यमांशी मोकळेपणाने गप्पा मारल्या. सागरी महामार्ग आणि राजकीय विषयांबाबत मात्र त्यांनी फारसे स्वारस्य दाखवले नाही. याआधी मुंबई- गोवा महामार्गावरील पुलांच्या कामांचा प्रारंभ करण्यासाठी ते रत्नागिरीत आले होते, तेव्हा सागरी महामार्गही केंद्र सरकार करेल, असे म्हटले होते. मात्र, यावेळी त्यांनी या महामार्गाबाबत फारशी उत्सुकता दाखवली नाही. राज्य सरकार आता हा महामार्ग करत आहे. सध्याचे काम संपल्यावर त्याकडे बघू, एवढेच त्यांनी सांगितले.मुंबई- गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण कामाला अपेक्षेपेक्षा खूपच वेळ लागला आहे. कामे वेळेत पूर्ण करण्याची ख्याती असलेल्या गडकरी यांनी या कामाला झालेल्या विलंबाबाबत दु:खही व्यक्त केले. भूसंपादनात येणाऱ्या अडचणी, न्यायालयीन दावे यामुळे या कामाला विलंब झाला. कदाचित हीच बाब सागरी महामार्गाच्या उर्वरित कामाबाबतही होऊ शकते, अशा शक्यतेने त्यांनी यामध्ये स्वारस्य दाखवले नसावे, अशी चर्चा सध्या अधिकारी वर्गामध्ये सुरू आहे.सद्य:स्थितीत रेवस ते रेड्डी या सागरी महामार्गाची जबाबदारी राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे सोपवली आहे. हा एकूण मार्ग ४९८ किलोमीटरचा असून, त्यासाठी अजून सुमारे ९,५०० कोटी खर्च अपेक्षित आहे. यावर्षीच्या अर्थसंकल्पात या महामार्गाचा उल्लेख असला तरी आर्थिक तरतुदीचा उल्लेख मात्र करण्यात आला नव्हता.

थोडे चौपदरीकरण

सागरी महामार्गावर १६५ कि.मी. रस्त्याचे चौपदरीकरण मंजूर आहे. त्यात रत्नागिरी ते पावस या २० कि.मी. रस्त्याचा, रायगडमधील ८०, तर सिंधुदुर्गातील ६५ कि.मी. रस्त्याचा यात समावेश आहे.

अनेक पूल बाकीसागरी महामार्गाचे बरेचसे काम पूर्ण झाले. मात्र, या मार्गावर अनेक ठिकाणी खाड्या असल्याने तेथील पुलांचे काम मात्र रखडलेलेच आहे. त्यामुळे हा महामार्ग आतापर्यंत पूर्ण होऊ शकला नाही.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSea Routeसागरी महामार्गNitin Gadkariनितीन गडकरी