शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
2
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
3
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
4
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
5
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
6
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
7
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
8
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
9
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
10
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
11
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
12
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
13
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
14
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
15
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
16
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
17
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
18
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
19
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
20
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?

शिक्षण कसे कळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:28 IST

आपण शाळेत जायला लागल्यापासून अगदी पहिल्या वर्षापासून परीक्षा सुरू होतात, त्या याच कारणाने की आपण वर्षभर केलेल्या शैक्षणिक कामकाजाचे ...

आपण शाळेत जायला लागल्यापासून अगदी पहिल्या वर्षापासून परीक्षा सुरू होतात, त्या याच कारणाने की आपण वर्षभर केलेल्या शैक्षणिक कामकाजाचे मूल्यमापन व्हावे आणि आपण पुढच्या वर्गात बसण्यासाठी पात्र आहोत की नाही, जे वर्षभर शिक्षण मनापासून घेतात, नियमित अभ्यास करतात, तेच या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होतात. अन्यथा अभ्यासाबाबत टाळाटाळ करणारे अनुत्तीर्ण होवून त्याच वर्गात बसतात. म्हणजेच परीक्षा या प्रत्येक वर्गासाठी पात्र - अपात्र निकषाच्या मर्यादा आहेत. म्हणूनच दरवर्षी या परीक्षा होणे तेवढेच गरजेचे आहे.

मात्र, गेल्या वर्षापासून जागतिक स्तरावर कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रावरही त्याचे अनिष्ट सावट आहे. म्हणूनच गेल्या वर्षापासून केजी ते अगदी पीजीपर्यंतचे विद्यार्थी वर्षभर घरात आहेत. या कालावधीत शाळा - महाविद्यालयांनी ऑनलाइन वर्ग सुरू केले; मात्र प्रत्येक विद्यार्थ्याची अध्ययनक्षमता सारखी असते असे नाही, त्यामुळे प्रत्यक्ष शिकवूनही ज्या विद्यार्थ्यांना अभ्यास कळणे अवघड होते, अशा विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्गातूनही कळणे अवघड झालेले आहे. त्यामुळे या वर्षभरात विद्यार्थ्यांचा प्रत्यक्षात अभ्यास किती झाला, हे प्रश्नचिन्ह आहेच. त्यामुळे त्याचे मूल्यमापन परीक्षेच्या माध्यमातूनच होणे शक्य आहे.

मात्र, कोरोनाच्या सद्यस्थितीत मुलांच्या एकत्रित परीक्षा घेणे हे तितकेच अवघड आहे; मात्र पहिल्या वर्षीचे मूल्यमापन न होताच मुलांना पुढच्या वर्गात ढकलणे, यातही तेवढाच धोका आहे, हेही सरकारने लक्षात घ्यायला हवे. परीक्षा रद्द करण्याऐवजी त्याबाबत कोणता निर्णय घ्यायला हवा, याबाबत शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे.

परीक्षांवर त्या विद्यार्थ्याच्या भवितव्याच्या दृष्टीने पुढील निर्णय अवलंबून असतात. त्यामुळे गेल्या वर्षभरात मुलांचा त्या इयत्तेचा अभ्यास नियमित वर्गाच्या तुलनेने परिपूर्ण झालेला नाही. त्यामुळे ही मुले आता पुढच्या वर्गात बसल्यास त्यांचा मागील अभ्यास झाला किंवा नाही, हे कळणे फार अवघड आहे. त्यामुळे किमान या मुलांच्या चाचपणीसाठी त्यांच्या परीक्षांच्या बाबतीतही योग्य तो मध्य साधून उचित निर्णय होणे गरजेचे होते. जी मुले लहान आहेत, त्यांच्या परीक्षा इतक्या महत्त्वपूर्ण नसल्या तरी वरच्या वर्गांसाठी विशेषत: नववीसाठी परीक्षा महत्त्वाच्याच आहेत. कारण नववी इयत्ता हा दहावीचा पाया समजला जातो. तो परिपूर्ण हवा. मुलांना शिक्षणाचे महत्त्व परीक्षांमुळेच कळते. म्हणूनच परीक्षांबाबत योग्य निर्णय हवा.