शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
2
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
3
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
4
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
5
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
6
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
7
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
8
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
9
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
10
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
11
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
12
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
13
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
14
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
15
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
16
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
17
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
18
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
19
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
20
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...

शिक्षण कसे कळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:28 IST

आपण शाळेत जायला लागल्यापासून अगदी पहिल्या वर्षापासून परीक्षा सुरू होतात, त्या याच कारणाने की आपण वर्षभर केलेल्या शैक्षणिक कामकाजाचे ...

आपण शाळेत जायला लागल्यापासून अगदी पहिल्या वर्षापासून परीक्षा सुरू होतात, त्या याच कारणाने की आपण वर्षभर केलेल्या शैक्षणिक कामकाजाचे मूल्यमापन व्हावे आणि आपण पुढच्या वर्गात बसण्यासाठी पात्र आहोत की नाही, जे वर्षभर शिक्षण मनापासून घेतात, नियमित अभ्यास करतात, तेच या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होतात. अन्यथा अभ्यासाबाबत टाळाटाळ करणारे अनुत्तीर्ण होवून त्याच वर्गात बसतात. म्हणजेच परीक्षा या प्रत्येक वर्गासाठी पात्र - अपात्र निकषाच्या मर्यादा आहेत. म्हणूनच दरवर्षी या परीक्षा होणे तेवढेच गरजेचे आहे.

मात्र, गेल्या वर्षापासून जागतिक स्तरावर कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रावरही त्याचे अनिष्ट सावट आहे. म्हणूनच गेल्या वर्षापासून केजी ते अगदी पीजीपर्यंतचे विद्यार्थी वर्षभर घरात आहेत. या कालावधीत शाळा - महाविद्यालयांनी ऑनलाइन वर्ग सुरू केले; मात्र प्रत्येक विद्यार्थ्याची अध्ययनक्षमता सारखी असते असे नाही, त्यामुळे प्रत्यक्ष शिकवूनही ज्या विद्यार्थ्यांना अभ्यास कळणे अवघड होते, अशा विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्गातूनही कळणे अवघड झालेले आहे. त्यामुळे या वर्षभरात विद्यार्थ्यांचा प्रत्यक्षात अभ्यास किती झाला, हे प्रश्नचिन्ह आहेच. त्यामुळे त्याचे मूल्यमापन परीक्षेच्या माध्यमातूनच होणे शक्य आहे.

मात्र, कोरोनाच्या सद्यस्थितीत मुलांच्या एकत्रित परीक्षा घेणे हे तितकेच अवघड आहे; मात्र पहिल्या वर्षीचे मूल्यमापन न होताच मुलांना पुढच्या वर्गात ढकलणे, यातही तेवढाच धोका आहे, हेही सरकारने लक्षात घ्यायला हवे. परीक्षा रद्द करण्याऐवजी त्याबाबत कोणता निर्णय घ्यायला हवा, याबाबत शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे.

परीक्षांवर त्या विद्यार्थ्याच्या भवितव्याच्या दृष्टीने पुढील निर्णय अवलंबून असतात. त्यामुळे गेल्या वर्षभरात मुलांचा त्या इयत्तेचा अभ्यास नियमित वर्गाच्या तुलनेने परिपूर्ण झालेला नाही. त्यामुळे ही मुले आता पुढच्या वर्गात बसल्यास त्यांचा मागील अभ्यास झाला किंवा नाही, हे कळणे फार अवघड आहे. त्यामुळे किमान या मुलांच्या चाचपणीसाठी त्यांच्या परीक्षांच्या बाबतीतही योग्य तो मध्य साधून उचित निर्णय होणे गरजेचे होते. जी मुले लहान आहेत, त्यांच्या परीक्षा इतक्या महत्त्वपूर्ण नसल्या तरी वरच्या वर्गांसाठी विशेषत: नववीसाठी परीक्षा महत्त्वाच्याच आहेत. कारण नववी इयत्ता हा दहावीचा पाया समजला जातो. तो परिपूर्ण हवा. मुलांना शिक्षणाचे महत्त्व परीक्षांमुळेच कळते. म्हणूनच परीक्षांबाबत योग्य निर्णय हवा.