शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

इतिहास संशोधक अण्णा शिरगावकर यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2022 13:56 IST

नऊ ताम्रपट, विविध राजकीय काळातील असंख्य नाणी, मूर्ती, भांडी याचा मोठा संग्रह त्यांनी केला होता. त्यांच्या या संशोधनाचा हजारो अभ्यासकांना उपयोग झाला आहे आणि यापुढेही होत राहणार आहे.

चिपळूण/दापोली : इतिहासाचे नामवंत अभ्यासक आणि संशोधक, सामाजिक क्षेत्रात थोर कार्य केलेले अनंत उर्फ अण्णा शिरगावकर यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराने अपरांत हॉस्पिटलमध्ये निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात सून, मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.अण्णांचा जन्म ५ सप्टेंबर १९३० रोजी गुहागर तालुक्यातील विसापूर येथे झाला. त्यांनी दापोली तालुक्यातील दाभोळ येथे राहून सर्वाधिक कार्य केले. अण्णा जिल्हा परिषदेचे माजी सभापती होते. दाभोळ येथे मच्छीमार आणि भोई समाजातील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी  सागरपुत्र विद्यार्थी वसतिगृह सुरू केले होते. नऊ ताम्रपट, विविध राजकीय काळातील असंख्य नाणी, मूर्ती, भांडी याचा मोठा संग्रह त्यांनी केला होता. त्यांच्या या संशोधनाचा हजारो अभ्यासकांना उपयोग झाला आहे आणि यापुढेही होत राहणार आहे.अखेरच्या दिवसात एकांतातच राहण्याचा त्यांचा मानस असल्याने अलीकडे काही दिवस ते चिपळूण तालुक्यातील मालघर येथे राहत होते. मंगळवार, ११ ऑक्टोबर रोजी रात्री अपरांत हॉस्पिटलमध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांची देहदानाची इच्छा मंगळवारी पूर्ण करण्यात आली.संशोधन क्षेत्रात थोर कार्य करणाऱ्या अण्णा शिरगावकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी रविवार, १६ रोजी सायंकाळी ५:३० वाजता  ‘लोटिस्मा’च्या बाळशास्त्री जांभेकर सभागृहात शोकसभा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ‘लोटिस्मा’चे कार्यवाह विनायक ओक यांनी केले आहे.  

अण्णांच्या शब्दात- तसं पाहिलं तर ‘सब भूमी मेरी कर्मभूमी’ असं मला म्हणता येईल. संस्कृत भाषेतील ‘अपरान्त’ ह्या शब्दाचा अर्थ पश्चिम टोकाला असलेला भू-प्रदेश! ‘अपरान्त’ हे प्राचीन कोकणचे नाव आहे.- सुरतेपासून कारवारपर्यंत पसरलेल्या अणि लाखो वर्षांपूर्वीच्या प्रलयंकारी भूकंपात समुद्रातून वर आलेल्या या भूमीचे पुनर्वसन आणि समृद्धी भगवान परशुरामांनी घडवून आणली. म्हणून ही परशुराम भूमी!- अशा ह्या कोकणाला प्राचीन इतिहास आहे. मला त्याचे फार औत्सुक्य! गेली ४०-५० वर्षे त्याचा शोध घेण्याचा माझ्या अल्प कुवतीप्रमाणे प्रयत्न केला.- माझ्या आयुष्यभराच्या या पायपिटीतून, भ्रमंतीतून, धडपडीतून इसवी सनापूर्वीची नाणी, ९ ताम्रपट, काही शिलालेख, ताडपत्रे, हस्तलिखिते, सनदा, फर्माने, खलिते, मूर्ती, फॉसिल्स, गुहा, लेणी, खापरे, भांडी अशा अनेकानेक वस्तू मिळाल्या.- अनेक विद्वानांनी त्यावर संशोधन केले, शोधनिबंध लिहिले. या सर्वांतून माझ्या संशोधनावर प्रकाश पडला, याचे मला समाधान आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी