शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

हिंदुत्त्वामुळे भारत अख्ख्या विश्वाला ध्येयाकडे नेईल : भैयाजी जोशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 17:09 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हिंदुत्त्व संकुचित नाही. ते सांप्रदायिक नाही. ते दुर्बलांना सबल करते. ते सर्वांना दृष्टी देणारे आहे. या हिंदुत्त्वामुळेच भारत अख्ख्या विश्वाला ध्येयाकडे घेऊन जाणारे नेतृत्त्व करेल, असे उद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी काढले.

ठळक मुद्देहिंदुत्त्वामुळे भारत अख्ख्या विश्वाला ध्येयाकडे नेईल : भैयाजी जोशीचिपळुणात आठवणींचे अमृतच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन

चिपळूण : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हिंदुत्त्व संकुचित नाही. ते सांप्रदायिक नाही. ते दुर्बलांना सबल करते. ते सर्वांना दृष्टी देणारे आहे. या हिंदुत्त्वामुळेच भारत अख्ख्या विश्वाला ध्येयाकडे घेऊन जाणारे नेतृत्त्व करेल, असे उद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी काढले.कै. पुरूषोत्तम नीलकंठ तथा अप्पासाहेब साठे यांच्या आठवणींचे अमृत या पुस्तकाच्या दितीय आवृत्तीच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते.

येथील दातार, बेहरे, जोशी महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमाच्या व्यासपीठावर लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नगराध्यक्ष सुरेखा खेराडे, विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड, माजी आमदार डॉ. विनय नातू, नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीधर भिडे, नियामक मंडळाचे अध्यक्ष मंगेश तांबे, प्रकाश देशपांडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.हिंदू संभ्रमित होता, अशा काळात ज्यांनी विश्वासाने हिंदुत्त्वासाठी काम केले, अशा पिढीतील कै. अप्पा साठे होते. त्यामुळे त्यांनी मांडलेले अनुभव प्रेरक आहेत, असे भैयाजी जोशी यांनी सांगितले. संघाचे हिंदुत्त्व संकुचित नाही. ज्यांचा एकच ग्रंथ आहे, ते संकुचित आहेत. हिंदूंमध्ये जो पूजा करतो तोही हिंदू आणि पूजा करत नाही, तोही हिंदूच. सत्य, सहकार, समन्वय आणि चारित्र्य ही जीवनमूल्ये घेऊन हिंदुत्त्व पुढे जाते, असेही ते म्हणाले.श्रीधर भिडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. नगराध्यक्ष खेराडे यांनी सर्वांचे स्वागत केले. त्यानंतर भैयाजी जोशी आणि अन्य मान्यवरांहस्ते पुस्तक प्रकाशन झाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात पुस्तकाचे समीक्षणच मांडले. कोकणी माणूस रसिक आणि कलावंत आहे. त्याला नाट्य, साहित्य, लेखन यात रूची आहे. त्यामुळेच या पुस्तकातून समकालीन परिस्थिती सर्वांसमोर येत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.आपले वडील कै. अप्पासाहेब साठे यांचे चिपळूणवर अधिक प्रेम असल्याने त्यांच्या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचा प्रकाशन कार्यक्रम चिपळुणात होत असल्याचे चिपळूणची माहेरवाशीण आणि लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी सांगितले. संघाने संस्कार केल्यावर व्यक्तिमत्त्व कसे घडते, हे सर्वांसमोर यावे, यासाठी द्वितीय आवृत्ती प्रकाशनाचा घाट घालण्यात आल्याचे त्या आवर्जून म्हणाल्या.मुख्यमंत्र्यांचे कौतुकसमयोचित भाषण करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे त्यांनी विशेष कौतुक केले. कुठे, काय आणि किती बोलायचे हे ज्याला नेमके कळते असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला असल्याचे सुमित्रा महाजन यांनी सांगितले. ज्याला बोलायचे कळते, त्याला वागायचे कसे हेही चांगले कळते. त्यामुळे असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला, हे महाराष्ट्राचे भाग्य असल्याचेही त्या म्हणाल्या.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघRatnagiriरत्नागिरी