शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

हिंदुत्त्वामुळे भारत अख्ख्या विश्वाला ध्येयाकडे नेईल : भैयाजी जोशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 17:09 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हिंदुत्त्व संकुचित नाही. ते सांप्रदायिक नाही. ते दुर्बलांना सबल करते. ते सर्वांना दृष्टी देणारे आहे. या हिंदुत्त्वामुळेच भारत अख्ख्या विश्वाला ध्येयाकडे घेऊन जाणारे नेतृत्त्व करेल, असे उद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी काढले.

ठळक मुद्देहिंदुत्त्वामुळे भारत अख्ख्या विश्वाला ध्येयाकडे नेईल : भैयाजी जोशीचिपळुणात आठवणींचे अमृतच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन

चिपळूण : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हिंदुत्त्व संकुचित नाही. ते सांप्रदायिक नाही. ते दुर्बलांना सबल करते. ते सर्वांना दृष्टी देणारे आहे. या हिंदुत्त्वामुळेच भारत अख्ख्या विश्वाला ध्येयाकडे घेऊन जाणारे नेतृत्त्व करेल, असे उद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी काढले.कै. पुरूषोत्तम नीलकंठ तथा अप्पासाहेब साठे यांच्या आठवणींचे अमृत या पुस्तकाच्या दितीय आवृत्तीच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते.

येथील दातार, बेहरे, जोशी महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमाच्या व्यासपीठावर लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नगराध्यक्ष सुरेखा खेराडे, विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड, माजी आमदार डॉ. विनय नातू, नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीधर भिडे, नियामक मंडळाचे अध्यक्ष मंगेश तांबे, प्रकाश देशपांडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.हिंदू संभ्रमित होता, अशा काळात ज्यांनी विश्वासाने हिंदुत्त्वासाठी काम केले, अशा पिढीतील कै. अप्पा साठे होते. त्यामुळे त्यांनी मांडलेले अनुभव प्रेरक आहेत, असे भैयाजी जोशी यांनी सांगितले. संघाचे हिंदुत्त्व संकुचित नाही. ज्यांचा एकच ग्रंथ आहे, ते संकुचित आहेत. हिंदूंमध्ये जो पूजा करतो तोही हिंदू आणि पूजा करत नाही, तोही हिंदूच. सत्य, सहकार, समन्वय आणि चारित्र्य ही जीवनमूल्ये घेऊन हिंदुत्त्व पुढे जाते, असेही ते म्हणाले.श्रीधर भिडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. नगराध्यक्ष खेराडे यांनी सर्वांचे स्वागत केले. त्यानंतर भैयाजी जोशी आणि अन्य मान्यवरांहस्ते पुस्तक प्रकाशन झाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात पुस्तकाचे समीक्षणच मांडले. कोकणी माणूस रसिक आणि कलावंत आहे. त्याला नाट्य, साहित्य, लेखन यात रूची आहे. त्यामुळेच या पुस्तकातून समकालीन परिस्थिती सर्वांसमोर येत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.आपले वडील कै. अप्पासाहेब साठे यांचे चिपळूणवर अधिक प्रेम असल्याने त्यांच्या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचा प्रकाशन कार्यक्रम चिपळुणात होत असल्याचे चिपळूणची माहेरवाशीण आणि लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी सांगितले. संघाने संस्कार केल्यावर व्यक्तिमत्त्व कसे घडते, हे सर्वांसमोर यावे, यासाठी द्वितीय आवृत्ती प्रकाशनाचा घाट घालण्यात आल्याचे त्या आवर्जून म्हणाल्या.मुख्यमंत्र्यांचे कौतुकसमयोचित भाषण करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे त्यांनी विशेष कौतुक केले. कुठे, काय आणि किती बोलायचे हे ज्याला नेमके कळते असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला असल्याचे सुमित्रा महाजन यांनी सांगितले. ज्याला बोलायचे कळते, त्याला वागायचे कसे हेही चांगले कळते. त्यामुळे असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला, हे महाराष्ट्राचे भाग्य असल्याचेही त्या म्हणाल्या.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघRatnagiriरत्नागिरी