शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

रत्नागिरीत ९ एप्रिल'ला निघणार हिंदू नववर्ष स्वागतयात्रा

By मेहरून नाकाडे | Updated: March 19, 2024 17:36 IST

गेल्या १९ वर्षांपासून शहरात गुढीपाडवा स्वागतयात्रा काढण्यात येते

रत्नागिरी : रत्नागिरी शहरात हिंदू नववर्ष स्वागतयात्रा यावर्षीही ९ एप्रिल रोजी काढण्यात येणार आहे. स्वागत यात्रेसाठी भैरी मंदिर ते पतितपावन मंदिर हा मार्ग निश्चित करण्यात आला आहे. यासंबंधीची पहिली बैठक रविवारी पतितपावन मंदिरात झाली. यावेळी देवस्थान समिती, विविध ज्ञाती संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यंदा प्रथमच व्यवस्थापन समिती तयार करण्यात येणार आहे. गेल्या १९ वर्षांपासून शहरात गुढीपाडवा स्वागतयात्रा काढण्यात येत आहे.सभेच्या सुरूवातीला हिंदू समाजातील दिवंगत व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर हिंदू गीताचे सामूहिक गायन करण्यात आले. हिंदू नववर्ष स्वागतयात्रेत हिंदू धर्मातील सर्व पंथातील मंडळी मोठ्या संख्येने पारंपरिक वेशभूषेत सहभागी होणार आहे. १३० मंदिर संस्था, ज्ञाती संस्था, नवरात्रोत्सव मंडळांचे चित्ररथ सहभागी होणार आहेत. यावर्षी अधिकाधिक ज्ञातीसंस्था, आबालवृद्धांनी आवर्जून सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.पुढील बैठक दि.३१ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता पतितपावन मंदिरात होणार आहे. तसेच दि.७ एप्रिल रोजी सायंकाळी दुचाकी फेरी काढण्यात येणार आहे. स्वागतयात्रेत रत्नागिरी शहरासह कुवारबाव, नाचणे, मिरजोळे, भाट्ये, फणसोप, मिऱ्या, शिरगाव, कर्ला, जुवे, आंबेशेत अशा जवळच्या विविध गावांतील हिंदू बंधू-भगिनी सहभागी होणार आहेत.श्री भैरी मंदिरात गुढी उभी केल्यानंतर सकाळी ९ वाजता स्वागयात्रेला सुरूवात होणार आहे. त्याचवेळी मारुती मंदिर येथून वरील भागातील रथांची स्वागतयात्रा निघणार आहे. त्यानंतर जयस्तंभ येथे दोन्ही यात्रांचे एकत्रीकरण होणार असून तिथून पुढे पतितपावन मंदिरात यात्रा पोहोचणार आहे. झाडगाव येथील भैरी मंदिर येथून प्रारंभ झाल्यानंतर स्वागतयात्रा, कॉंग्रेसभवन, गोखले नाकामार्गे जयस्तंभ येथे येईल. येथे ही यात्रा आणि मारुती मंदिरपासून निघालेली स्वागतयात्रा एकत्र होऊन राम आळी मार्गे, गाडीतळ मार्गे पतितपावन मंदिरात पोहोचणार आहे. या मंदिरात हिंदु धर्माची शपथ घेऊन यात्रेची सांगता करण्यात येणार आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी