शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

महामार्ग चौपदरीकरण : रत्नागिरीतील दोन टप्प्यांचे काम खूपच पिछाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 16:27 IST

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काम आतापर्यंत ५० ते ६० टक्के एवढेच झाले आहे. खेड, चिपळूण विभाग तसेच राजापूर ते सावंतवाडीपर्यंतच्या विभागामध्ये चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. संगमेश्वर तालुक्यातील आरवली ते तळेकांटे व तळेकांटे ते वाकेड (लांजा) या दोन टप्प्यांमधील काम मात्र सर्वात पिछाडीवर आहे. या दोन टप्प्यांमध्ये केवळ ८ ते १० टक्केच काम झाले असून, हे काम लवकर पूर्ण न झाल्यास चौपदरीकरणाच्या उद्घाटनाचा २०२० मधील मुहुर्तही पुढे जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देमहामार्ग चौपदरीकरण, काम ६० टक्केच?, सिंधुदूर्ग आघाडीवररत्नागिरीतील दोन टप्प्यांचे काम खूपच पिछाडीवर

प्रकाश वराडकर 

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काम आतापर्यंत ५० ते ६० टक्के एवढेच झाले आहे. खेड, चिपळूण विभाग तसेच राजापूर ते सावंतवाडीपर्यंतच्या विभागामध्ये चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. संगमेश्वर तालुक्यातील आरवली ते तळेकांटे व तळेकांटे ते वाकेड (लांजा) या दोन टप्प्यांमधील काम मात्र सर्वात पिछाडीवर आहे. या दोन टप्प्यांमध्ये केवळ ८ ते १० टक्केच काम झाले असून, हे काम लवकर पूर्ण न झाल्यास चौपदरीकरणाच्या उद्घाटनाचा २०२० मधील मुहुर्तही पुढे जाण्याची भीती व्यक्त होत आहे.रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई-गोवा महामार्गाची लांबी कशेडी ते खारेपाटणपर्यंत १७२ किलोमीटर आहे तर खारेपाटणपासून झारापपर्यंत महामार्गाची लांबी ही १२० किलोमीटर आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यात मिळून २९२ किलोमीटर लांबीच्या महामार्गाचे काम रत्नागिरीचा अपवादवगळता वेगात सुरू आहे.

दोन्ही जिल्ह्यात सुमारे ५० ते ६० टक्के काम पूर्णत्त्वाच्या मार्गावर आहे. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तळेकांटे ते लांजा तालुक्यातील वाकेडपर्यंतचे सुमारे ७० किलोमीटरचे चौपदरीकरण रखडले असून, ते ८ ते १० टक्केच झाले आहे. त्यामुळे महामार्गाचे कॉँक्रीटीकरणातून चौपदरीकरण पूर्ण होणार कधी व त्याचे उद्घाटन होणार कधी, असा सवाल केला जात आहे.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गेल्या दोन दशकांपासून रखडलेल्या मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाला खऱ्या अर्थाने चालना दिली. २०१३ मध्ये कॉँगे्रस सरकारने या महामार्गाच्या पहिल्या टप्प्याला मंजुरी दिली होती. त्यानंतर केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील एनडीएचे सरकार आले.

केंद्रात परिवहन, रस्ते विभागाचे मंत्रीपद नितीन गडकरी यांच्याकडे देण्यात आले. गडकरी यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या केवळ चौपदरीकरणालाच नव्हे तर कॉँक्रीटीकरणातून चौपदरीकरण प्रकल्पाला चालना दिली. त्यानंतर ३६६ किलोमीटर चौपदरीकरणाचे कामही सुरू करण्यात आले.

हे काम लवकर होण्यासाठी गडकरी यांनी तीन जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांची एकत्रित बैठकही घेतली. कामांचे टप्पे निश्चित झाले. काम प्रत्यक्षात २०१८ मध्ये सुरू करण्यात आले. मात्र, अनंत अडचणींचा सामना करीत हे काम सुरु आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात खारेपाटण ते झारापपर्यंत चौपदरीकरणाचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कामाचा विचार करता सिंधुदुर्गमध्ये चौपदरीकरणाचे काम ६० ते ७० टक्केपर्र्यंत झाले आहे. सिंधुदुर्गमधील चौपदरीकरण पूर्ण झालेल्या रस्त्यावरून वाहतूकही केली जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यात हेच प्रमाण ३० टक्केपर्यंत आहे. आरवली ते वाकेड या दोन टप्प्यांमधील रखडलेले चौपदरीकरण हे टक्केवारी कमी होण्याचे कारण ठरले आहे.अनेक ठिकाणी उड्डाणपूलचिपळूण शहर, पाली, लांजा या ठिकाणी चौपदरीकरण प्रकल्पामध्ये उड्डाण पुलांचा समावेश आहे. राजापूरमध्ये प्रार्थनास्थळाचा विषय महत्त्वाचा ठरला होता. त्यामुळे प्रार्थनास्थळापासून दूरच्या अंतरावरून चौपदरीकरण केले जात आहे. उड्डाणपुलांच्या ठिकाणी ४५ मीटर रस्ता रुंदीकरणासाठी जागा घेण्यात आली आहे. चिपळूणमध्ये कापसाळपर्यंत उड्डाणपूल होणार आहे. मात्र, त्याची लांबी आणखी वाढविण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :highwayमहामार्गRatnagiriरत्नागिरी