शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

महामार्ग चौपदरीकरण : रत्नागिरीतील दोन टप्प्यांचे काम खूपच पिछाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 16:27 IST

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काम आतापर्यंत ५० ते ६० टक्के एवढेच झाले आहे. खेड, चिपळूण विभाग तसेच राजापूर ते सावंतवाडीपर्यंतच्या विभागामध्ये चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. संगमेश्वर तालुक्यातील आरवली ते तळेकांटे व तळेकांटे ते वाकेड (लांजा) या दोन टप्प्यांमधील काम मात्र सर्वात पिछाडीवर आहे. या दोन टप्प्यांमध्ये केवळ ८ ते १० टक्केच काम झाले असून, हे काम लवकर पूर्ण न झाल्यास चौपदरीकरणाच्या उद्घाटनाचा २०२० मधील मुहुर्तही पुढे जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देमहामार्ग चौपदरीकरण, काम ६० टक्केच?, सिंधुदूर्ग आघाडीवररत्नागिरीतील दोन टप्प्यांचे काम खूपच पिछाडीवर

प्रकाश वराडकर 

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काम आतापर्यंत ५० ते ६० टक्के एवढेच झाले आहे. खेड, चिपळूण विभाग तसेच राजापूर ते सावंतवाडीपर्यंतच्या विभागामध्ये चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. संगमेश्वर तालुक्यातील आरवली ते तळेकांटे व तळेकांटे ते वाकेड (लांजा) या दोन टप्प्यांमधील काम मात्र सर्वात पिछाडीवर आहे. या दोन टप्प्यांमध्ये केवळ ८ ते १० टक्केच काम झाले असून, हे काम लवकर पूर्ण न झाल्यास चौपदरीकरणाच्या उद्घाटनाचा २०२० मधील मुहुर्तही पुढे जाण्याची भीती व्यक्त होत आहे.रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई-गोवा महामार्गाची लांबी कशेडी ते खारेपाटणपर्यंत १७२ किलोमीटर आहे तर खारेपाटणपासून झारापपर्यंत महामार्गाची लांबी ही १२० किलोमीटर आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यात मिळून २९२ किलोमीटर लांबीच्या महामार्गाचे काम रत्नागिरीचा अपवादवगळता वेगात सुरू आहे.

दोन्ही जिल्ह्यात सुमारे ५० ते ६० टक्के काम पूर्णत्त्वाच्या मार्गावर आहे. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तळेकांटे ते लांजा तालुक्यातील वाकेडपर्यंतचे सुमारे ७० किलोमीटरचे चौपदरीकरण रखडले असून, ते ८ ते १० टक्केच झाले आहे. त्यामुळे महामार्गाचे कॉँक्रीटीकरणातून चौपदरीकरण पूर्ण होणार कधी व त्याचे उद्घाटन होणार कधी, असा सवाल केला जात आहे.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गेल्या दोन दशकांपासून रखडलेल्या मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाला खऱ्या अर्थाने चालना दिली. २०१३ मध्ये कॉँगे्रस सरकारने या महामार्गाच्या पहिल्या टप्प्याला मंजुरी दिली होती. त्यानंतर केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील एनडीएचे सरकार आले.

केंद्रात परिवहन, रस्ते विभागाचे मंत्रीपद नितीन गडकरी यांच्याकडे देण्यात आले. गडकरी यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या केवळ चौपदरीकरणालाच नव्हे तर कॉँक्रीटीकरणातून चौपदरीकरण प्रकल्पाला चालना दिली. त्यानंतर ३६६ किलोमीटर चौपदरीकरणाचे कामही सुरू करण्यात आले.

हे काम लवकर होण्यासाठी गडकरी यांनी तीन जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांची एकत्रित बैठकही घेतली. कामांचे टप्पे निश्चित झाले. काम प्रत्यक्षात २०१८ मध्ये सुरू करण्यात आले. मात्र, अनंत अडचणींचा सामना करीत हे काम सुरु आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात खारेपाटण ते झारापपर्यंत चौपदरीकरणाचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कामाचा विचार करता सिंधुदुर्गमध्ये चौपदरीकरणाचे काम ६० ते ७० टक्केपर्र्यंत झाले आहे. सिंधुदुर्गमधील चौपदरीकरण पूर्ण झालेल्या रस्त्यावरून वाहतूकही केली जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यात हेच प्रमाण ३० टक्केपर्यंत आहे. आरवली ते वाकेड या दोन टप्प्यांमधील रखडलेले चौपदरीकरण हे टक्केवारी कमी होण्याचे कारण ठरले आहे.अनेक ठिकाणी उड्डाणपूलचिपळूण शहर, पाली, लांजा या ठिकाणी चौपदरीकरण प्रकल्पामध्ये उड्डाण पुलांचा समावेश आहे. राजापूरमध्ये प्रार्थनास्थळाचा विषय महत्त्वाचा ठरला होता. त्यामुळे प्रार्थनास्थळापासून दूरच्या अंतरावरून चौपदरीकरण केले जात आहे. उड्डाणपुलांच्या ठिकाणी ४५ मीटर रस्ता रुंदीकरणासाठी जागा घेण्यात आली आहे. चिपळूणमध्ये कापसाळपर्यंत उड्डाणपूल होणार आहे. मात्र, त्याची लांबी आणखी वाढविण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :highwayमहामार्गRatnagiriरत्नागिरी