शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

महामार्ग चौपदरीकरण : रत्नागिरीतील दोन टप्प्यांचे काम खूपच पिछाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 16:27 IST

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काम आतापर्यंत ५० ते ६० टक्के एवढेच झाले आहे. खेड, चिपळूण विभाग तसेच राजापूर ते सावंतवाडीपर्यंतच्या विभागामध्ये चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. संगमेश्वर तालुक्यातील आरवली ते तळेकांटे व तळेकांटे ते वाकेड (लांजा) या दोन टप्प्यांमधील काम मात्र सर्वात पिछाडीवर आहे. या दोन टप्प्यांमध्ये केवळ ८ ते १० टक्केच काम झाले असून, हे काम लवकर पूर्ण न झाल्यास चौपदरीकरणाच्या उद्घाटनाचा २०२० मधील मुहुर्तही पुढे जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देमहामार्ग चौपदरीकरण, काम ६० टक्केच?, सिंधुदूर्ग आघाडीवररत्नागिरीतील दोन टप्प्यांचे काम खूपच पिछाडीवर

प्रकाश वराडकर 

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काम आतापर्यंत ५० ते ६० टक्के एवढेच झाले आहे. खेड, चिपळूण विभाग तसेच राजापूर ते सावंतवाडीपर्यंतच्या विभागामध्ये चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. संगमेश्वर तालुक्यातील आरवली ते तळेकांटे व तळेकांटे ते वाकेड (लांजा) या दोन टप्प्यांमधील काम मात्र सर्वात पिछाडीवर आहे. या दोन टप्प्यांमध्ये केवळ ८ ते १० टक्केच काम झाले असून, हे काम लवकर पूर्ण न झाल्यास चौपदरीकरणाच्या उद्घाटनाचा २०२० मधील मुहुर्तही पुढे जाण्याची भीती व्यक्त होत आहे.रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई-गोवा महामार्गाची लांबी कशेडी ते खारेपाटणपर्यंत १७२ किलोमीटर आहे तर खारेपाटणपासून झारापपर्यंत महामार्गाची लांबी ही १२० किलोमीटर आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यात मिळून २९२ किलोमीटर लांबीच्या महामार्गाचे काम रत्नागिरीचा अपवादवगळता वेगात सुरू आहे.

दोन्ही जिल्ह्यात सुमारे ५० ते ६० टक्के काम पूर्णत्त्वाच्या मार्गावर आहे. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तळेकांटे ते लांजा तालुक्यातील वाकेडपर्यंतचे सुमारे ७० किलोमीटरचे चौपदरीकरण रखडले असून, ते ८ ते १० टक्केच झाले आहे. त्यामुळे महामार्गाचे कॉँक्रीटीकरणातून चौपदरीकरण पूर्ण होणार कधी व त्याचे उद्घाटन होणार कधी, असा सवाल केला जात आहे.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गेल्या दोन दशकांपासून रखडलेल्या मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाला खऱ्या अर्थाने चालना दिली. २०१३ मध्ये कॉँगे्रस सरकारने या महामार्गाच्या पहिल्या टप्प्याला मंजुरी दिली होती. त्यानंतर केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील एनडीएचे सरकार आले.

केंद्रात परिवहन, रस्ते विभागाचे मंत्रीपद नितीन गडकरी यांच्याकडे देण्यात आले. गडकरी यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या केवळ चौपदरीकरणालाच नव्हे तर कॉँक्रीटीकरणातून चौपदरीकरण प्रकल्पाला चालना दिली. त्यानंतर ३६६ किलोमीटर चौपदरीकरणाचे कामही सुरू करण्यात आले.

हे काम लवकर होण्यासाठी गडकरी यांनी तीन जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांची एकत्रित बैठकही घेतली. कामांचे टप्पे निश्चित झाले. काम प्रत्यक्षात २०१८ मध्ये सुरू करण्यात आले. मात्र, अनंत अडचणींचा सामना करीत हे काम सुरु आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात खारेपाटण ते झारापपर्यंत चौपदरीकरणाचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कामाचा विचार करता सिंधुदुर्गमध्ये चौपदरीकरणाचे काम ६० ते ७० टक्केपर्र्यंत झाले आहे. सिंधुदुर्गमधील चौपदरीकरण पूर्ण झालेल्या रस्त्यावरून वाहतूकही केली जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यात हेच प्रमाण ३० टक्केपर्यंत आहे. आरवली ते वाकेड या दोन टप्प्यांमधील रखडलेले चौपदरीकरण हे टक्केवारी कमी होण्याचे कारण ठरले आहे.अनेक ठिकाणी उड्डाणपूलचिपळूण शहर, पाली, लांजा या ठिकाणी चौपदरीकरण प्रकल्पामध्ये उड्डाण पुलांचा समावेश आहे. राजापूरमध्ये प्रार्थनास्थळाचा विषय महत्त्वाचा ठरला होता. त्यामुळे प्रार्थनास्थळापासून दूरच्या अंतरावरून चौपदरीकरण केले जात आहे. उड्डाणपुलांच्या ठिकाणी ४५ मीटर रस्ता रुंदीकरणासाठी जागा घेण्यात आली आहे. चिपळूणमध्ये कापसाळपर्यंत उड्डाणपूल होणार आहे. मात्र, त्याची लांबी आणखी वाढविण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :highwayमहामार्गRatnagiriरत्नागिरी