शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे सर्वाधिक बळी ६० ते ७० वयोगटातील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 17:46 IST

Coronavirus Unlock, ratnagirinews कोरोनाच्या पहिल्या लाटेत जिल्ह्यातील ६० ते ७० या वयोगटातील व्यक्तींच्या मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याचा धोका व्यक्त करण्यात येत आहे. ही शक्यता लक्षात घेऊन ६० ते ७० या वयोगटातील ज्येष्ठांची अधिक काळजी घेण्याची गरज व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे सर्वाधिक बळी ६० ते ७० वयोगटातीलदुसऱ्या लाटेत खबरदारी घेण्याची अधिक गरज

शोभना कांबळेरत्नागिरी : कोरोनाच्या पहिल्या लाटेत जिल्ह्यातील ६० ते ७० या वयोगटातील व्यक्तींच्या मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याचा धोका व्यक्त करण्यात येत आहे. ही शक्यता लक्षात घेऊन ६० ते ७० या वयोगटातील ज्येष्ठांची अधिक काळजी घेण्याची गरज व्यक्त होत आहे.कोरोनाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणेकडून करण्यात आले होते. त्यानुसार ज्येष्ठ घरातच थांबले होते. मात्र, मे महिन्यात गावी आलेल्या मुंबईकरांमुळे जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण वाढले. त्यानंतर स्थानिक बाधित होण्याचे प्रमाणही वाढले.त्यातच गणपती उत्सवात लॉकडाऊन शिथील झाल्याने पुन्हा लोकांना कोरोनाच्या अनुषंगाने आवश्यक त्या नियमांचा विसर पडला. त्यामुळे घरातील ६० ते ७० वयोगटातील व्यक्ती, गंभीर आजारांचे रूग्ण यांना संसर्ग झाल्याने ते कोरोनाचे सर्वाधिक बळी ठरले.१२८ जणांचा सप्टेंबरमध्ये मृत्यूऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या दरम्यान मुंबई, पुणे आदी भागातून चाकरमानी आले. या उत्सवादरम्यान लॉकडाऊन अधिक शिथील करण्यात आल्याने लोकांकडून मास्क तसेच शारीरिक अंतराचे पालन केले गेले नाही. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात कोरोनाच्या रूग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. लोक आजार लपवू लागल्याने याकाळात मृत्यूचे प्रमाण लक्षणीय वाढले.बाहेरून आलेल्या व्यक्तींमुळे वाढसुरूवातीला बाहेरून आलेल्या व्यक्तींमुळे कोरोनाचे रूग्ण वाढले. मे महिन्यापर्यंत रूग्णसंख्या आटोक्यात होती. त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार करणे आरोग्य यंत्रणेला शक्य झाले.लक्षणे लपवून ठेवल्याने उपचाराला विलंबमे महिन्यानंतर मात्र गावी आलेल्या मुंबईकरांमुळे स्थानिक लोक बाधित होऊ लागले. मात्र, लक्षणे लपवली जावू लागल्याने त्यांचे उशिरा निदान व उपचार होऊ लागले. त्यामुळे ग्रामीण भागात मृत्यूंचे प्रमाण वाढले.

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकRatnagiriरत्नागिरी