शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे सर्वाधिक बळी ६० ते ७० वयोगटातील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 17:46 IST

Coronavirus Unlock, ratnagirinews कोरोनाच्या पहिल्या लाटेत जिल्ह्यातील ६० ते ७० या वयोगटातील व्यक्तींच्या मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याचा धोका व्यक्त करण्यात येत आहे. ही शक्यता लक्षात घेऊन ६० ते ७० या वयोगटातील ज्येष्ठांची अधिक काळजी घेण्याची गरज व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे सर्वाधिक बळी ६० ते ७० वयोगटातीलदुसऱ्या लाटेत खबरदारी घेण्याची अधिक गरज

शोभना कांबळेरत्नागिरी : कोरोनाच्या पहिल्या लाटेत जिल्ह्यातील ६० ते ७० या वयोगटातील व्यक्तींच्या मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याचा धोका व्यक्त करण्यात येत आहे. ही शक्यता लक्षात घेऊन ६० ते ७० या वयोगटातील ज्येष्ठांची अधिक काळजी घेण्याची गरज व्यक्त होत आहे.कोरोनाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणेकडून करण्यात आले होते. त्यानुसार ज्येष्ठ घरातच थांबले होते. मात्र, मे महिन्यात गावी आलेल्या मुंबईकरांमुळे जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण वाढले. त्यानंतर स्थानिक बाधित होण्याचे प्रमाणही वाढले.त्यातच गणपती उत्सवात लॉकडाऊन शिथील झाल्याने पुन्हा लोकांना कोरोनाच्या अनुषंगाने आवश्यक त्या नियमांचा विसर पडला. त्यामुळे घरातील ६० ते ७० वयोगटातील व्यक्ती, गंभीर आजारांचे रूग्ण यांना संसर्ग झाल्याने ते कोरोनाचे सर्वाधिक बळी ठरले.१२८ जणांचा सप्टेंबरमध्ये मृत्यूऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या दरम्यान मुंबई, पुणे आदी भागातून चाकरमानी आले. या उत्सवादरम्यान लॉकडाऊन अधिक शिथील करण्यात आल्याने लोकांकडून मास्क तसेच शारीरिक अंतराचे पालन केले गेले नाही. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात कोरोनाच्या रूग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. लोक आजार लपवू लागल्याने याकाळात मृत्यूचे प्रमाण लक्षणीय वाढले.बाहेरून आलेल्या व्यक्तींमुळे वाढसुरूवातीला बाहेरून आलेल्या व्यक्तींमुळे कोरोनाचे रूग्ण वाढले. मे महिन्यापर्यंत रूग्णसंख्या आटोक्यात होती. त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार करणे आरोग्य यंत्रणेला शक्य झाले.लक्षणे लपवून ठेवल्याने उपचाराला विलंबमे महिन्यानंतर मात्र गावी आलेल्या मुंबईकरांमुळे स्थानिक लोक बाधित होऊ लागले. मात्र, लक्षणे लपवली जावू लागल्याने त्यांचे उशिरा निदान व उपचार होऊ लागले. त्यामुळे ग्रामीण भागात मृत्यूंचे प्रमाण वाढले.

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकRatnagiriरत्नागिरी