शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे सर्वाधिक बळी ६० ते ७० वयोगटातील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 17:46 IST

Coronavirus Unlock, ratnagirinews कोरोनाच्या पहिल्या लाटेत जिल्ह्यातील ६० ते ७० या वयोगटातील व्यक्तींच्या मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याचा धोका व्यक्त करण्यात येत आहे. ही शक्यता लक्षात घेऊन ६० ते ७० या वयोगटातील ज्येष्ठांची अधिक काळजी घेण्याची गरज व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे सर्वाधिक बळी ६० ते ७० वयोगटातीलदुसऱ्या लाटेत खबरदारी घेण्याची अधिक गरज

शोभना कांबळेरत्नागिरी : कोरोनाच्या पहिल्या लाटेत जिल्ह्यातील ६० ते ७० या वयोगटातील व्यक्तींच्या मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याचा धोका व्यक्त करण्यात येत आहे. ही शक्यता लक्षात घेऊन ६० ते ७० या वयोगटातील ज्येष्ठांची अधिक काळजी घेण्याची गरज व्यक्त होत आहे.कोरोनाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणेकडून करण्यात आले होते. त्यानुसार ज्येष्ठ घरातच थांबले होते. मात्र, मे महिन्यात गावी आलेल्या मुंबईकरांमुळे जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण वाढले. त्यानंतर स्थानिक बाधित होण्याचे प्रमाणही वाढले.त्यातच गणपती उत्सवात लॉकडाऊन शिथील झाल्याने पुन्हा लोकांना कोरोनाच्या अनुषंगाने आवश्यक त्या नियमांचा विसर पडला. त्यामुळे घरातील ६० ते ७० वयोगटातील व्यक्ती, गंभीर आजारांचे रूग्ण यांना संसर्ग झाल्याने ते कोरोनाचे सर्वाधिक बळी ठरले.१२८ जणांचा सप्टेंबरमध्ये मृत्यूऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या दरम्यान मुंबई, पुणे आदी भागातून चाकरमानी आले. या उत्सवादरम्यान लॉकडाऊन अधिक शिथील करण्यात आल्याने लोकांकडून मास्क तसेच शारीरिक अंतराचे पालन केले गेले नाही. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात कोरोनाच्या रूग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. लोक आजार लपवू लागल्याने याकाळात मृत्यूचे प्रमाण लक्षणीय वाढले.बाहेरून आलेल्या व्यक्तींमुळे वाढसुरूवातीला बाहेरून आलेल्या व्यक्तींमुळे कोरोनाचे रूग्ण वाढले. मे महिन्यापर्यंत रूग्णसंख्या आटोक्यात होती. त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार करणे आरोग्य यंत्रणेला शक्य झाले.लक्षणे लपवून ठेवल्याने उपचाराला विलंबमे महिन्यानंतर मात्र गावी आलेल्या मुंबईकरांमुळे स्थानिक लोक बाधित होऊ लागले. मात्र, लक्षणे लपवली जावू लागल्याने त्यांचे उशिरा निदान व उपचार होऊ लागले. त्यामुळे ग्रामीण भागात मृत्यूंचे प्रमाण वाढले.

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकRatnagiriरत्नागिरी