शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

परशुराम घाटातील कामासंदर्भात उच्च न्यायालयाचे ताशेरे, गुरुवारपर्यंत अहवाल देण्याचे सरकारला आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 16:16 IST

न्यायालयाने रखडलेल्या कामाबाबत राज्य सरकार व प्रशासनावर ताशेरे ओढले

चिपळूण : मुंबई-गोवा माहामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम दहा वर्षांहून अधिक काळ रखडलेले असताना चिपळूण नजिकच्या परशुराम घाटाचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. चिपळूणचे सुपुत्र ॲड. ओवेस पेचकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात या संदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर काल, सोमवारी सुनावणी झाली. तेव्हा न्यायालयाने रखडलेल्या कामाबाबत राज्य सरकार व प्रशासनावर ताशेरे ओढले.अनेक वर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाबाबत ॲड. ओवेस पेचकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. येत्या गुरुवारपर्यंत परशुराम घाटाचे काम कसे व कधी पूर्ण करणार याबाबतचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.त्यातच ॲड. पेचकर यांनी शनिवारी रात्री अकरा वाजता परशुराम घाटात दरड कोसळून वाहतूक ठप्प झाल्याचा व्हिडिओच न्यायालयात सादर केला. त्यामुळे न्यायमूर्ती ए. के. मेनन व एम. एस. कर्णिक यांनी या कामाबाबत नाराजी व्यक्त केली. न्यायालयाने मुंबई-गोवा महामार्गावरील घाटांचे काम करताना या ठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन आधीपासून तज्ज्ञ व्यक्तींचा अहवाल घेऊन उपायोजना का केल्या नाहीत, असा सवाल विचारला.परशुराम घाटात यापूर्वीही दरडी कोसळण्याचा प्रकार घडला आहे, मग तज्ज्ञांची मदत का घेतली नाही. मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे, कोकण रेल्वेचे काम करताना दरडी कोसळू नयेत यासाठी ग्रॅन्यूईटी सिस्टिम वापरली गेली. मुंबई-गोवा महामार्गावरील घाटांमध्ये अशाप्रकारे दडरी थोपविण्यासाठी ग्रॅन्यूईटी सिस्टिम का वापरली गेली नाही, अशी विचारणाही न्यायालयाने केली.तातडीने परशुराम घाटातील दरडी कोसळण्याचे प्रकार थांबण्यासाठी नेमक्या काय उपाययोजना करणार, काम कशापध्दतीने व कधी पूर्ण करणार, याचा तातडीने गुरुवारपर्यंत प्रतिज्ञापत्राद्वारे अहवाल देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकार व प्रशासनाला दिले आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCourtन्यायालय