शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
2
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
3
"...तर इस्रायल संपला असता!" ट्रम्प यांनी केलं नेतन्याहूंचं कौतुक, ५ मिनिटांत ३ मोठे प्रश्न लावले मार्गी!
4
केंद्र सरकारने साखरेचा विक्री दर वाढवावा; शरद पवार घेणार केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट 
5
आजचे राशीभविष्य ३० डिसेंबर २०२५ : मेष आणि मिथुन राशीला भाग्याची साथ, तर कन्या अन् धनु राशीने...
6
शिक्षक भरती : प्रमाणपत्र अटीमुळे मराठा उमेदवार होणार बेरोजगार? खुल्या प्रवर्गातून अर्ज भरलेल्यांमध्ये तीव्र नाराजी
7
चारित्र्याच्या संशयातून पत्नी व चार वर्षीय मुलाचा निर्घृण खून
8
नवी मुंबई, मिरा-भाईंदर, उल्हासनगरात युती तुटली; मुंबई, ठाण्यात युतीचे जमले; केडीएमसी, पनवेल, वसई-विरारमध्ये युतीचे संकेत 
9
मोठी दुर्घटना टळली! डायलिसिस उपचार केंद्रात आग, काच फोडून आठ जणांना वाचविले; उमरखेड येथील रुग्णालयातील घटना
10
अरवलीच्या व्याख्येचा वाद तज्ज्ञ समितीकडे; आपल्याच निर्देशांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; आता २१ जानेवारीला सुनावणी 
11
भांडुपमध्ये बेस्ट इलेक्ट्रिक बसने घेतला चौघांचा बळी; दहा जखमी
12
चांदीची किंमत का वाढतेय? कुठे-कुठे होतोय वापर? बनली जागतिक तंत्रज्ञान क्रांतीचा कणा
13
अपेक्षित गॅस गेला कुठे? सरकारने मागितली २.७९ लाख कोटींची भरपाई
14
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
15
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
16
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
17
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
18
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
19
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
20
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून उच्च न्यायालयाची पुन्हा नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:32 IST

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून उच्च न्यायालयाने गुरुवारी पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली. तसेच या महामार्गाचे काम करणाऱ्या ...

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून उच्च न्यायालयाने गुरुवारी पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली. तसेच या महामार्गाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांनाच प्रतिवादी करण्याचे आदेश देत काम अद्याप का पूर्ण झाले नाही, काम करण्यास तुम्ही उत्सुक आहात का आणि असाल तर काम किती काळात पूर्ण करणार? हे प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने त्यांना दिले.

महामार्गाचे काम जून २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचा दावा करणाऱ्या राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणालाही महामार्ग चौपदरीकरणाच्या प्रगतीचा अहवाल सादर करण्यास न्यायालयाने सांगितले. तसेच याचिकेत उपस्थित मुद्दे हे सकारात्मक दृष्टीने घेतले जात असल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले. या महामार्गाच्या कामाकडे तुम्ही खूपच उशिरा लक्ष दिल्याचा टोला न्यायालयाने हाणला. न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली. त्या वेळी महामार्गाच्या कामाबाबत सरकारने प्रगती अहवाल सादर केला. तो वाचल्यावर महामार्गाच्या दहा टप्प्यांचे काम करणाऱ्या ११ पैकी मोजके कंत्राटदार वगळता अन्य कंत्राटदारांनी ६० टक्क्यांपर्यंतही कामकाज केले नसल्याचे ताशेरे न्यायालयाने ओढले.

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचा प्रकल्प गेली कित्येक वर्षे सुरू आहे. शिवाय महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य असल्याने मुंबई-गोवा प्रवास खडतर बनल्याची बाब अ‍ॅड. ओवेस पेचकर यांनी उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली आहे. शिवाय महामार्गाचे काम रखडलेले असताना रत्नागिरीतील शिवफाटा येथे प्रशस्त टोल नाका बांधण्यात येत असून, त्याच्या बांधकामाला स्थगिती देण्याची मागणीही याचिकेद्वारे करण्यात आली आहे. त्यावर हा महामार्ग महत्त्वाचा असून, याचिकेत उपस्थित मुद्द्यांवर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने सरकारला दिले होते.