शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

किनारपट्टीवर हाय अलर्ट - बोटींची कसून तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 18:20 IST

दहशतवादी संघटनांकडून भारतात प्रवेश करुन हल्ल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे राज्यात ह्यहाय अलर्ट जारी करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देपोलिसांनी सर्व मच्छीमारांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत.

रत्नागिरी : दहशतवादी संघटनांकडून भारतात प्रवेश करुन हल्ल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे राज्यात ह्यहाय अलर्ट जारी करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर किनारपट्टीवर सुरक्षेच्यादृष्टीने कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. कस्टम विभागामार्फत बोटींची कसून चौकशी करण्यात येत आहे. बोटीवरील खलाशी पाकिस्तानी आहेत, नेपाळी आहेत की भारतीय याची करण्यात येत आहे.येत्या तीन महिन्यात मुंबईतील रेल्वे स्थानकावर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता भारतीय गुप्तचर विभागाने दिला आहे. या इशाऱ्यानंतर राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यातच रायगडच्या आपटा गावात एस्. टी. बसमध्ये बॉम्ब सापडल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. दहशतवादी समुद्रमार्गे मुंबईत घुसण्याची माहिती गुप्तचर यंत्रणेला मिळाली आहे. त्यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.पोलिसांनी सर्व मच्छीमारांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. हाय अलर्टच्या पार्श्वभूमीवर सागरी भागात समुद्रात संशयित जहाज, बोटी किंवा व्यक्ती आढळून आल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी केले आहे. मुंबईवर २६/११ ला झालेल्या हल्ल्यातील दहशतवादी समुद्रमार्गे आले होते. या हल्ल्यानंतर मुंबईसह राज्यातील सर्व सागरी किनाऱ्यांवर सुरक्षा तैनात करण्यात आली होती. तसेच १९९३मध्ये रायगड किनाऱ्यावर काही स्फोटके आढळून आली होती. त्याअनुषंगाने पोलिसांनी खबरदारी घेतली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीkonkanकोकण