शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

मच्छीमारांची मदत निकषांच्या जाळ्यात ?, कुटुंबात एका व्यक्तीलाच मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 13:49 IST

Fisherman, funds, Government, Ratnagiri शासनाकडून मच्छिमारांसाठी ६५ कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले होते. मात्र, त्यातील निकषांमुळे अनेक मच्छीमार या पॅकेजच्या लाभापासून वंचित राहणार आहेत. एका कुटुंबातील तीन जण मच्छिमारीशी संबंधित वेगवेगळे व्यवसाय करीत असतील, तरीही त्यांच्यापैकी एकालाच त्याचा लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे मच्छिमारांसाठी आर्थिक मदत मिळण्यास हा निकष अडचणीचा ठरणार आहे.

ठळक मुद्देमच्छीमारांची मदत निकषांच्या जाळ्यात ?कुटुंबातील केवळ एका व्यक्तीलाच मिळणार मदत

रहिम दलालरत्नागिरी : शासनाकडून मच्छिमारांसाठी ६५ कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले होते. मात्र, त्यातील निकषांमुळे अनेक मच्छीमार या पॅकेजच्या लाभापासून वंचित राहणार आहेत. एका कुटुंबातील तीन जण मच्छिमारीशी संबंधित वेगवेगळे व्यवसाय करीत असतील, तरीही त्यांच्यापैकी एकालाच त्याचा लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे मच्छिमारांसाठी आर्थिक मदत मिळण्यास हा निकष अडचणीचा ठरणार आहे.चक्री वादळामुळे गतवर्षी मासेमारी पूर्णत: ठप्प झाली होती. त्यातून सावरण्यासाठी राज्य शासनाने ६५ कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. त्यासाठी पात्र लाभार्थ्यांकडून मत्स्य विभागाने प्रस्तावही मागविले होते. तशा सूचना मच्छीमार सोसायट्यांना दिल्या होत्या. मासेमारी नौका, मासे विक्रेत्या महिला यांना याचे लाभ दिले जाणार आहेत. या पॅकेजमधून रत्नागिरी जिल्ह्याला ४ कोटी ५० लाख रुपये प्राप्त झाले आहेत.या पॅकेजमधून आर्थिक मदत देताना शासनाकडून आलेल्या परिपत्रकातील निकष मच्छिमारांना त्रासदायक ठरणारे आहेत. त्याचबरोबर एकाच कुटुंबातील एकाच व्यक्तिला त्याचा लाभ दिला जाणार असल्याचा निकष अनेक मच्छिमारांना अडचणीचा ठरणार आहे. काही कुटुंबांमध्ये एक मासेमारी नौका आहे, तर घरातील अन्य सदस्य मासेविक्रीचा व्यवसाय करतात. यामध्ये त्या दोघांपैकी एकालाच लाभ दिला जाणार असल्याचे निकषात म्हटले आहे. त्यामुळे मच्छिमारांसाठी शासनाने जाहीर केलेले पॅकेज हे केवळ दिखावा ठरु शकते, असे अनेक मच्छिमारांचे म्हणणे आहे.रत्नागिरी जिल्ह्याला प्राप्त झालेल्या ४ कोटी ५० लाख रुपयांपैकी २८ लाख रुपये मच्छिमारांच्या बँक खात्यात वितरीत करण्यात आले आहेत. जसे प्रस्ताव येतील, तसे उर्वरित रकमेचे वितरण करण्यात येणार आहे.महिला वंचितशासनाच्या या पॅकेजमधून आर्थिक मदत देताना शासनाकडून आलेल्या परिपत्रकातील निकष मच्छिमारांना त्रासदायक ठरणारे आहेत. अनेक मच्छीमार महिलांकडे ग्रामपंचायतींचे प्रमाणपत्र नसल्यामुळे त्या लाभापासून वंचित राहणार आहेत. 

टॅग्स :fishermanमच्छीमारfundsनिधीGovernmentसरकारRatnagiriरत्नागिरी