शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

मच्छीमारांची मदत निकषांच्या जाळ्यात ?, कुटुंबात एका व्यक्तीलाच मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 13:49 IST

Fisherman, funds, Government, Ratnagiri शासनाकडून मच्छिमारांसाठी ६५ कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले होते. मात्र, त्यातील निकषांमुळे अनेक मच्छीमार या पॅकेजच्या लाभापासून वंचित राहणार आहेत. एका कुटुंबातील तीन जण मच्छिमारीशी संबंधित वेगवेगळे व्यवसाय करीत असतील, तरीही त्यांच्यापैकी एकालाच त्याचा लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे मच्छिमारांसाठी आर्थिक मदत मिळण्यास हा निकष अडचणीचा ठरणार आहे.

ठळक मुद्देमच्छीमारांची मदत निकषांच्या जाळ्यात ?कुटुंबातील केवळ एका व्यक्तीलाच मिळणार मदत

रहिम दलालरत्नागिरी : शासनाकडून मच्छिमारांसाठी ६५ कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले होते. मात्र, त्यातील निकषांमुळे अनेक मच्छीमार या पॅकेजच्या लाभापासून वंचित राहणार आहेत. एका कुटुंबातील तीन जण मच्छिमारीशी संबंधित वेगवेगळे व्यवसाय करीत असतील, तरीही त्यांच्यापैकी एकालाच त्याचा लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे मच्छिमारांसाठी आर्थिक मदत मिळण्यास हा निकष अडचणीचा ठरणार आहे.चक्री वादळामुळे गतवर्षी मासेमारी पूर्णत: ठप्प झाली होती. त्यातून सावरण्यासाठी राज्य शासनाने ६५ कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. त्यासाठी पात्र लाभार्थ्यांकडून मत्स्य विभागाने प्रस्तावही मागविले होते. तशा सूचना मच्छीमार सोसायट्यांना दिल्या होत्या. मासेमारी नौका, मासे विक्रेत्या महिला यांना याचे लाभ दिले जाणार आहेत. या पॅकेजमधून रत्नागिरी जिल्ह्याला ४ कोटी ५० लाख रुपये प्राप्त झाले आहेत.या पॅकेजमधून आर्थिक मदत देताना शासनाकडून आलेल्या परिपत्रकातील निकष मच्छिमारांना त्रासदायक ठरणारे आहेत. त्याचबरोबर एकाच कुटुंबातील एकाच व्यक्तिला त्याचा लाभ दिला जाणार असल्याचा निकष अनेक मच्छिमारांना अडचणीचा ठरणार आहे. काही कुटुंबांमध्ये एक मासेमारी नौका आहे, तर घरातील अन्य सदस्य मासेविक्रीचा व्यवसाय करतात. यामध्ये त्या दोघांपैकी एकालाच लाभ दिला जाणार असल्याचे निकषात म्हटले आहे. त्यामुळे मच्छिमारांसाठी शासनाने जाहीर केलेले पॅकेज हे केवळ दिखावा ठरु शकते, असे अनेक मच्छिमारांचे म्हणणे आहे.रत्नागिरी जिल्ह्याला प्राप्त झालेल्या ४ कोटी ५० लाख रुपयांपैकी २८ लाख रुपये मच्छिमारांच्या बँक खात्यात वितरीत करण्यात आले आहेत. जसे प्रस्ताव येतील, तसे उर्वरित रकमेचे वितरण करण्यात येणार आहे.महिला वंचितशासनाच्या या पॅकेजमधून आर्थिक मदत देताना शासनाकडून आलेल्या परिपत्रकातील निकष मच्छिमारांना त्रासदायक ठरणारे आहेत. अनेक मच्छीमार महिलांकडे ग्रामपंचायतींचे प्रमाणपत्र नसल्यामुळे त्या लाभापासून वंचित राहणार आहेत. 

टॅग्स :fishermanमच्छीमारfundsनिधीGovernmentसरकारRatnagiriरत्नागिरी