शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
4
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
5
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
6
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
7
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
8
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
9
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
10
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
11
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
12
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
13
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
14
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
15
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
16
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
17
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
18
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

अतिवृष्टीमुळे ४० टक्के भातशेती धोक्यात, गरवी भातशेती सुस्थितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 16:49 IST

रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ४ हजार ४२२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. संततधार पावसामुळे भात खाचरे पाण्याने तुडुंब भरली आहेत. हळवे बियाणे प्रसवण्यावेळीच पावसाचा जोर सर्वाधिक असल्याने जिल्ह्यातील ४० टक्के भातपीक धोक्यात आले आहे.

ठळक मुद्देअतिवृष्टीमुळे ४० टक्के भातशेती धोक्यात, गरवी भातशेती सुस्थितीतहळवी, निमगरवी पिके हातून गेली, आधीच हवालदिल शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले

रत्नागिरी : जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ४ हजार ४२२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. संततधार पावसामुळे भात खाचरे पाण्याने तुडुंब भरली आहेत. हळवे बियाणे प्रसवण्यावेळीच पावसाचा जोर सर्वाधिक असल्याने जिल्ह्यातील ४० टक्के भातपीक धोक्यात आले आहे.यावर्षी सुरूवातीपासून पाऊस चांगला झाला. अनेक गावामध्ये आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या शेतीचे नुकसान झाले. पुराच्या पाण्यासह गाळ भातशेतीत साचला. शिवाय भातशेती तीन दिवसांपेक्षा अधिक दिवस पाण्याखाली राहिल्याने कुजली. त्यामुळे शासनाकडून याचे पंचनामे अद्याप सुरू आहेत.

गणेशोत्सवापूर्वी पडलेल्या उन्हामुळे ठिकठिकाणी करपा, निळे भुंगेरे, पान गुंडाळणारी अळीचा प्रादुर्भाव झाला होता. किडरोगाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच पुन्हा पावासाचे आगमन झाले. मात्र, संततधार पाऊस वाढल्याने पुन्हा भातशेती नुकसानात आली आहे.भात प्रसविण्याच्या स्थितीत जोरदार पावसामुळे फुलोरा पावसाच्या जोरामुळे लोंब्यामध्ये दाण्याऐवजी (पिस) चिंब होण्याची शक्यता आहे. पूरजन्य गावातील भातशेती धोक्यात आली. शिवाय मुसळधार पावसाने हळवे भातपीक धोक्यात आल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

पावसाचे पाणी खाचरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साचून राहिले आहे. हळव्या बियाण्याबरोबर निमगरव्या भाताला धोका निर्माण झाला आहे. बऱ्यापैकी पाऊस होऊनही भातपीक धोक्यात आले आहे. सुरूवातीला पिकांची परिस्थिती उत्तम होती.सर्वाधिक नुकसानकृषी विभागाने खरीप हंगामासाठी ८२ हजार ९०२ हेक्टरचे लक्ष्य देण्यात आले होते. पैकी ६५ हजार ८०० हेक्टरवर भात लागवड तर नागली, तृणधान्यासह भाजीपाल्यासह मिळून एकूण ७९ हजार ८०८ हेक्टरवर लागवड करण्यात आली. मात्र, सर्वाधिक पावसाने नुकसान झाले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीfloodपूरRatnagiriरत्नागिरी