शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

अतिवृष्टीमुळे ४० टक्के भातशेती धोक्यात, गरवी भातशेती सुस्थितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 16:49 IST

रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ४ हजार ४२२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. संततधार पावसामुळे भात खाचरे पाण्याने तुडुंब भरली आहेत. हळवे बियाणे प्रसवण्यावेळीच पावसाचा जोर सर्वाधिक असल्याने जिल्ह्यातील ४० टक्के भातपीक धोक्यात आले आहे.

ठळक मुद्देअतिवृष्टीमुळे ४० टक्के भातशेती धोक्यात, गरवी भातशेती सुस्थितीतहळवी, निमगरवी पिके हातून गेली, आधीच हवालदिल शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले

रत्नागिरी : जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ४ हजार ४२२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. संततधार पावसामुळे भात खाचरे पाण्याने तुडुंब भरली आहेत. हळवे बियाणे प्रसवण्यावेळीच पावसाचा जोर सर्वाधिक असल्याने जिल्ह्यातील ४० टक्के भातपीक धोक्यात आले आहे.यावर्षी सुरूवातीपासून पाऊस चांगला झाला. अनेक गावामध्ये आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या शेतीचे नुकसान झाले. पुराच्या पाण्यासह गाळ भातशेतीत साचला. शिवाय भातशेती तीन दिवसांपेक्षा अधिक दिवस पाण्याखाली राहिल्याने कुजली. त्यामुळे शासनाकडून याचे पंचनामे अद्याप सुरू आहेत.

गणेशोत्सवापूर्वी पडलेल्या उन्हामुळे ठिकठिकाणी करपा, निळे भुंगेरे, पान गुंडाळणारी अळीचा प्रादुर्भाव झाला होता. किडरोगाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच पुन्हा पावासाचे आगमन झाले. मात्र, संततधार पाऊस वाढल्याने पुन्हा भातशेती नुकसानात आली आहे.भात प्रसविण्याच्या स्थितीत जोरदार पावसामुळे फुलोरा पावसाच्या जोरामुळे लोंब्यामध्ये दाण्याऐवजी (पिस) चिंब होण्याची शक्यता आहे. पूरजन्य गावातील भातशेती धोक्यात आली. शिवाय मुसळधार पावसाने हळवे भातपीक धोक्यात आल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

पावसाचे पाणी खाचरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साचून राहिले आहे. हळव्या बियाण्याबरोबर निमगरव्या भाताला धोका निर्माण झाला आहे. बऱ्यापैकी पाऊस होऊनही भातपीक धोक्यात आले आहे. सुरूवातीला पिकांची परिस्थिती उत्तम होती.सर्वाधिक नुकसानकृषी विभागाने खरीप हंगामासाठी ८२ हजार ९०२ हेक्टरचे लक्ष्य देण्यात आले होते. पैकी ६५ हजार ८०० हेक्टरवर भात लागवड तर नागली, तृणधान्यासह भाजीपाल्यासह मिळून एकूण ७९ हजार ८०८ हेक्टरवर लागवड करण्यात आली. मात्र, सर्वाधिक पावसाने नुकसान झाले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीfloodपूरRatnagiriरत्नागिरी