शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीमुळे ४० टक्के भातशेती धोक्यात, गरवी भातशेती सुस्थितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 16:49 IST

रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ४ हजार ४२२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. संततधार पावसामुळे भात खाचरे पाण्याने तुडुंब भरली आहेत. हळवे बियाणे प्रसवण्यावेळीच पावसाचा जोर सर्वाधिक असल्याने जिल्ह्यातील ४० टक्के भातपीक धोक्यात आले आहे.

ठळक मुद्देअतिवृष्टीमुळे ४० टक्के भातशेती धोक्यात, गरवी भातशेती सुस्थितीतहळवी, निमगरवी पिके हातून गेली, आधीच हवालदिल शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले

रत्नागिरी : जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ४ हजार ४२२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. संततधार पावसामुळे भात खाचरे पाण्याने तुडुंब भरली आहेत. हळवे बियाणे प्रसवण्यावेळीच पावसाचा जोर सर्वाधिक असल्याने जिल्ह्यातील ४० टक्के भातपीक धोक्यात आले आहे.यावर्षी सुरूवातीपासून पाऊस चांगला झाला. अनेक गावामध्ये आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या शेतीचे नुकसान झाले. पुराच्या पाण्यासह गाळ भातशेतीत साचला. शिवाय भातशेती तीन दिवसांपेक्षा अधिक दिवस पाण्याखाली राहिल्याने कुजली. त्यामुळे शासनाकडून याचे पंचनामे अद्याप सुरू आहेत.

गणेशोत्सवापूर्वी पडलेल्या उन्हामुळे ठिकठिकाणी करपा, निळे भुंगेरे, पान गुंडाळणारी अळीचा प्रादुर्भाव झाला होता. किडरोगाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच पुन्हा पावासाचे आगमन झाले. मात्र, संततधार पाऊस वाढल्याने पुन्हा भातशेती नुकसानात आली आहे.भात प्रसविण्याच्या स्थितीत जोरदार पावसामुळे फुलोरा पावसाच्या जोरामुळे लोंब्यामध्ये दाण्याऐवजी (पिस) चिंब होण्याची शक्यता आहे. पूरजन्य गावातील भातशेती धोक्यात आली. शिवाय मुसळधार पावसाने हळवे भातपीक धोक्यात आल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

पावसाचे पाणी खाचरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साचून राहिले आहे. हळव्या बियाण्याबरोबर निमगरव्या भाताला धोका निर्माण झाला आहे. बऱ्यापैकी पाऊस होऊनही भातपीक धोक्यात आले आहे. सुरूवातीला पिकांची परिस्थिती उत्तम होती.सर्वाधिक नुकसानकृषी विभागाने खरीप हंगामासाठी ८२ हजार ९०२ हेक्टरचे लक्ष्य देण्यात आले होते. पैकी ६५ हजार ८०० हेक्टरवर भात लागवड तर नागली, तृणधान्यासह भाजीपाल्यासह मिळून एकूण ७९ हजार ८०८ हेक्टरवर लागवड करण्यात आली. मात्र, सर्वाधिक पावसाने नुकसान झाले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीfloodपूरRatnagiriरत्नागिरी