शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
2
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
3
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
4
पाकिस्तानसाठी हेरगिरी, हरयाणाची युट्यूबर ज्योती मल्होत्रासह सहा अटकेत 
5
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
6
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
7
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
8
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
9
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
10
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
11
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
12
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
13
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
14
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
15
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
16
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
17
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
18
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
19
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक

टेरव येथे मुसळधार पावसाने तीन घरांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:21 IST

चिपळूण : तालुक्यातील टेरव येथे मुसळधार पावसाने तीन घरांचे नुकसान झाले आहे. घरांचे छत कोसळल्याने ही घरे धोकादायक झाली ...

चिपळूण : तालुक्यातील टेरव येथे मुसळधार पावसाने तीन घरांचे नुकसान झाले आहे. घरांचे छत कोसळल्याने ही घरे धोकादायक झाली आहेत. प्रशासनाने या कुटुंबांना तातडीने घरकुलांची मदत करावी, अशी मागणी टेरवचे माजी उपसरपंच किशोर कदम यांनी केली आहे.

गेल्या काही दिवसापासून शहरासह ग्रामीण भागात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. काही ठिकाणी जुन्या व जीर्ण झालेल्या इमारती कोसळण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. रविवारी शहरात नगर परिषदेचे सार्वजनिक शौचालय कोसळले होते, तर सोमवारी टेरव येथे तीन घरांचे नुकसान झाले आहे. टेरवमधील सचिन म्हालीम, प्रकाश यादव, गौऱ्या साळवी यांच्या घरांचे नुकसान झाले आहे.

या घटनेची माहिती मिळताच टेरवच्या सरपंच स्वप्नाली कराडकर, उपसरपंच मानसी कदम, माजी उपसरपंच किशोर कदम, अशोक साळवी, उमेश मोहिते, काशीनाथ कदम, वर्षा वासकर, संजीवनी मेगे, वैशाली तांदळे, प्रतीक्षा शिगवण आदींनी पाहणी केली. तीनही घरांचे मुसळधार पावसात छताचे नुकसान झाल्याने घरात पाणी कोसळत आहे. तात्पुरते प्लास्टिकचे आच्छादन करून या कुटुंबांची गुजराण सुरू आहे. या कुटुंबांची मातीची घरे जीर्ण झाल्याने त्यांना घरकुलांची आवश्यकता आहे. प्रशासनाने त्यांना निवाऱ्यासाठी सहकार्य करावे, अशी मागणी किशोर कदम यांनी ग्रामपंचायतीतर्फे केली आहे.