शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

मुसळधार पावसामुळे रत्नागिरीत दरड कोसळली; पुढील ३ दिवस अतिवृष्टीचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 12:03 IST

Rain Ratnagiri-राज्यातील काही भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोपडले आहे. या मुसळधार पावसामुळे रत्नागिरीच्या निवळी घाटात दरड कोसळली. यामुळे मध्यरात्री २ वाजल्यापासून मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

ठळक मुद्देमुसळधार पावसामुळे रत्नागिरीत दरड कोसळलीपुढील ३ दिवस अतिवृष्टीचा इशारा

रत्नागिरी-राज्यातील काही भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोपडले आहे. या मुसळधार पावसामुळे रत्नागिरीच्या निवळी घाटात दरड कोसळली. यामुळे मध्यरात्री २ वाजल्यापासून मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.माहितीनुसार, आता मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली नाही आहे. दरम्यान पुढील ३ दिवस रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा कायम आहे. २० जूनपर्यंत मुसळधार ते अति-मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे.गेल्या चार दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर आला असून काही ठिकाणी पुराचे पाणी वस्तीत आणि शेतात घुसले आहे.आता कुलाबा वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार, जिल्ह्यात पुढील ३ दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. यामुळे प्रशासकीय यंत्रणा देखील सज्ज झाली आहे.काल, बुधवारी रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले. यामुळे जिल्ह्यातील जगबुडी, वाशिष्टी, काजळी, कोदवली, शास्त्री ,सोनवी, मुच्कुंडी, बावनदी इ. नद्या ओसंडून वाहत असून धोक्याच्या पातळीवर जाऊन पोहोचल्या होत्या. पण रात्री पावसाचा जोर कमी झाल्याने नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली नाही. तरी काही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

दरम्यान चिपळूणमध्ये रात्रभरापासून मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. वाशिष्ठी आणि शिव नदीचे पाणी पहाटे ३ वाजता शिरण्यास सुरुवात झाली होती. पण पावसाचा जोर ओसरल्याने पुराचा धोका टळला. आज सकाळपासून रत्नागिरी जिल्ह्यात विविध ठिकाणी पाऊस सुरू आहे. जोर कमी असल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आहे. पण तरीही हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे प्रशासनाने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. समुद्रलगतच्या रहिवाशांना इशारा देण्यात आला आहे.

टॅग्स :RainपाऊसRatnagiriरत्नागिरी