शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

रत्नागिरीत पावसाची मुसळधार, अनेक ठिकाणी पडझड!

By शोभना कांबळे | Updated: October 1, 2023 15:07 IST

तीन दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी पडझड झाली आहे.

रत्नागिरी : पावसाने शनिवारपासून संततधार धरली आहे. जिल्ह्यातील अन्य तालुके वगळता रत्नागिरीत पावसाचा जोर वाढलेला आहे. अन्य तालुक्यांमध्ये पाऊस सरींवर असून, रत्नागिरीत मात्र, मुसळधार सुरू आहे. तीन दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी पडझड झाली आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकणात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. शनिवारपासून पावसाचा जोर अधिकच वाढला आहे. रत्नागिरी तालुक्यात रात्रीपासून संततधार सुरू असून, वादळी वारेही जोरदार वाहत होते. मध्येच विजेचा गडगडाटही होत होता. रत्नागिरी शहरातील भाट्ये येथे रस्त्यावर झाडे आली असून, रस्त्याच्या बाजूला असणारे फलकही काेसळून पडले आहेत. तसेच किल्ला परिसरातील हनुमानवाडी येथे रस्त्यावर दगड काेसळला आहे. थिबापॅलेस परिसरातील एका घराचे छप्परही काेसळले आहे. उर्वरित तालुक्यांमध्ये मात्र पाऊस सरींवर सुरू होता.

गेल्या दिवसभरात जिल्हाभरात १९७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात ३०६० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. २ ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली असून मच्छिमारांनीही मच्छीमारीसाठी समुद्रात जाऊ नये, असा इशाराही हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. 

टॅग्स :RainपाऊसRatnagiriरत्नागिरी