शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

रत्नागिरीत पावसाची मुसळधार, अनेक ठिकाणी पडझड!

By शोभना कांबळे | Updated: October 1, 2023 15:07 IST

तीन दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी पडझड झाली आहे.

रत्नागिरी : पावसाने शनिवारपासून संततधार धरली आहे. जिल्ह्यातील अन्य तालुके वगळता रत्नागिरीत पावसाचा जोर वाढलेला आहे. अन्य तालुक्यांमध्ये पाऊस सरींवर असून, रत्नागिरीत मात्र, मुसळधार सुरू आहे. तीन दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी पडझड झाली आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकणात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. शनिवारपासून पावसाचा जोर अधिकच वाढला आहे. रत्नागिरी तालुक्यात रात्रीपासून संततधार सुरू असून, वादळी वारेही जोरदार वाहत होते. मध्येच विजेचा गडगडाटही होत होता. रत्नागिरी शहरातील भाट्ये येथे रस्त्यावर झाडे आली असून, रस्त्याच्या बाजूला असणारे फलकही काेसळून पडले आहेत. तसेच किल्ला परिसरातील हनुमानवाडी येथे रस्त्यावर दगड काेसळला आहे. थिबापॅलेस परिसरातील एका घराचे छप्परही काेसळले आहे. उर्वरित तालुक्यांमध्ये मात्र पाऊस सरींवर सुरू होता.

गेल्या दिवसभरात जिल्हाभरात १९७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात ३०६० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. २ ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली असून मच्छिमारांनीही मच्छीमारीसाठी समुद्रात जाऊ नये, असा इशाराही हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. 

टॅग्स :RainपाऊसRatnagiriरत्नागिरी