शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा मुक्काम

By मनोज मुळ्ये | Updated: July 14, 2024 12:46 IST

पावसात सातत्य राहिल्यास काही तासातच खेड शहरात पुराचे पाणी शिरेल अशी स्थिती आहे.

मनोज मुळ्ये, लोकमत न्यूज नेटवर्क, रत्नागिरी : शुक्रवारपासून सुरू झालेला मुसळधार पाऊस अजूनही आपला मुक्काम कायम ठेवून आहे, शनिवारी रात्रभर पाऊस पडल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे तर खेडमधील जगबुडी नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. त्यामुळे खेड नगर परिषदेने सतर्कतेचा इशारा देणारा भोंगाही वाजवला आहे. पावसात सातत्य राहिल्यास काही तासातच खेड शहरात पुराचे पाणी शिरेल अशी स्थिती आहे,

शनिवारी दिवसभर आणि रात्रीही मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा कायम असल्यामुळे जनजीवनावर चांगलाच परिणाम झाला आहे, जिल्ह्यातील बहुतांश नद्यांनी इशारा पातळी गाठली आहे. सुदैवाने चिपळूणमध्ये सकाळच्या सत्रात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे पाण्याचा निचरा झाला. अन्यथा चिपळूण शहरालाही सतर्कतेचा इशारा देण्याची वेळ आली असती.

खेडमध्ये जगबुडी नदीच्या पात्राने मात्र धोक्याची पातळी गाठली आहे. त्यामुळे पावसात सातत्य राहिल्यास काही तासातच खेड शहरात पुराचे पाणी शिरू शकते, अशी स्थिती आहे, त्याची दखल घेत नगर परिषदेने धोक्याचा इशारा देणारा भोंगा वाजवला आहे.

शनिवार सकाळपासून रविवार सकाळपर्यंत जिल्ह्यात सरासरी १२२ मिलिमीटर म्हणजेच सुमारे पाच इंच इतका पाऊस पडला आहे. रविवारी सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे. पावसासोबतच सोसाट्याचे वारे वाहत असल्याने अनेक ठिकाणी वीज प्रवाह खंडित झाला आहे. या पावसामुळे रस्त्यावरील वर्दळही मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.

टॅग्स :Rainपाऊसmonsoonमोसमी पाऊस