शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा मुक्काम

By मनोज मुळ्ये | Updated: July 14, 2024 12:46 IST

पावसात सातत्य राहिल्यास काही तासातच खेड शहरात पुराचे पाणी शिरेल अशी स्थिती आहे.

मनोज मुळ्ये, लोकमत न्यूज नेटवर्क, रत्नागिरी : शुक्रवारपासून सुरू झालेला मुसळधार पाऊस अजूनही आपला मुक्काम कायम ठेवून आहे, शनिवारी रात्रभर पाऊस पडल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे तर खेडमधील जगबुडी नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. त्यामुळे खेड नगर परिषदेने सतर्कतेचा इशारा देणारा भोंगाही वाजवला आहे. पावसात सातत्य राहिल्यास काही तासातच खेड शहरात पुराचे पाणी शिरेल अशी स्थिती आहे,

शनिवारी दिवसभर आणि रात्रीही मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा कायम असल्यामुळे जनजीवनावर चांगलाच परिणाम झाला आहे, जिल्ह्यातील बहुतांश नद्यांनी इशारा पातळी गाठली आहे. सुदैवाने चिपळूणमध्ये सकाळच्या सत्रात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे पाण्याचा निचरा झाला. अन्यथा चिपळूण शहरालाही सतर्कतेचा इशारा देण्याची वेळ आली असती.

खेडमध्ये जगबुडी नदीच्या पात्राने मात्र धोक्याची पातळी गाठली आहे. त्यामुळे पावसात सातत्य राहिल्यास काही तासातच खेड शहरात पुराचे पाणी शिरू शकते, अशी स्थिती आहे, त्याची दखल घेत नगर परिषदेने धोक्याचा इशारा देणारा भोंगा वाजवला आहे.

शनिवार सकाळपासून रविवार सकाळपर्यंत जिल्ह्यात सरासरी १२२ मिलिमीटर म्हणजेच सुमारे पाच इंच इतका पाऊस पडला आहे. रविवारी सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे. पावसासोबतच सोसाट्याचे वारे वाहत असल्याने अनेक ठिकाणी वीज प्रवाह खंडित झाला आहे. या पावसामुळे रस्त्यावरील वर्दळही मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.

टॅग्स :Rainपाऊसmonsoonमोसमी पाऊस