शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

राजीनामा देतो, त्यांनीच पक्ष वाढवावा

By admin | Updated: June 13, 2016 00:11 IST

भास्कर जाधव : वाद मिटविण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही; सावर्डेतील राष्ट्रवादीच्या बैठकीत वक्तव्य

सावर्डे (जि. रत्नागिरी) : संघटनेत माझे ‘काहींशी’ असलेले वाद हे माझ्यामुळे झालेले नाहीत. त्यामुळे ते मिटविण्यासाठी माझ्याकडे वेळही नाही. अशा क्षुल्लक कामांसाठी मला वेळ नसतो. कुणाला यामुळे त्रास होत असेल, तर मी राजीनामा द्यायला तयार आहे. ‘त्यांना’च पक्ष वाढवू द्या आणि बघा राष्ट्रवादी किती मजबूत होतो ते, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे रत्नागिरी जिल्हा नवनियुक्त प्रभारी आमदार भास्कर जाधव यांनी कार्यकर्त्यांना खडसावले.सावर्डे येथील कॉलेज आॅफ फॉर्मसीच्या सभागृहात रविवारी आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी आढावा बैठकीत ते बोलत होते. राष्ट्रवादीचे नेते शौकत मुकादम यांनी भास्कर जाधव आणि रमेश कदम यांच्या वादाबाबत मनोगतातून भाष्य करताना ‘हे वाद मिटले पाहिजेत. अशा वादांमुळे कार्यकर्त्यांची गोची होते. या वादात कार्यकर्ता भरडला जातो’, असे सांगितले.त्यावर उत्तर देताना जाधव म्हणाले, मला राष्ट्रवादीत शरद पवार यांनी मोठे केले आहे, त्यामुळे त्यांचा शब्दच मी प्रमाण मानतो. त्यांच्या मार्गदर्शनाने मी माझे काम प्रामाणिकपणे करीत आहे. त्यांना दिलेला प्रत्येक शब्द मी खरा करून दाखविला आहे. त्यामुळेच त्यांनीही माझ्यावर विश्वास टाकून विविध पदे दिली. जाधव यांचा पक्षाचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या बैठकीला माजी राज्यमंत्री रवींद्र माने, खेड-दापोलीचे आमदार संजय कदम, प्रांतिक सदस्य नलिनी भुवड, प्रदेश चिटणीस बाबाजी जाधव, जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर आरेकर, विष्णुपंत सावर्डेकर, महिला जिल्हाध्यक्षा चित्रा चव्हाण, युवकचे जिल्हाध्यक्ष राजू आंब्रे, विक्रांत जाधव, कुमार शेट्ये, बशीर मूर्तुझा, अजित यशवंतराव, सभापती स्नेहा मेस्त्री, सुभाष मोहिते, सिकंदर जसनाईक, कृष्णा पाटील, मंडणगडच्या नगराध्यक्षा श्रृती साळवी उपस्थित होते. (वार्ताहर)तालुकानिहाय मेळावेयावेळी तालुकानिहाय मेळाव्यांचे नियोजन करण्यात आले. ते असे - २० जूनला सकाळी १० ते २ वा. मंडणगड, दुपारी ३ वा. दापोली, २१ जूनला सकाळी १० ते २ वा. खेड, २९ जूनला सकाळी १० ते २ वा. राजापूर, दुपारी ३ वाजता लांजा, ३० जूनला सकाळी १० ते २ वा. संगमेश्वर, २ जुलैला सकाळी १० वा. चिपळूण, ३ जुलैला गुहागर येथे सकाळी ११ वा. तालुका व जिल्हा शिबिर.तालुकानिहाय मेळावे घेणारसत्तेबाहेर राहून संघटना बांधणी मजबूत करा. तालुकाध्यक्षांनी तालुक्यात जाऊन तेथील पक्षवाढीसंदर्भात आढावा घ्यावा. येईल त्या व्यक्तीला पक्षात सामील करून आगामी निवडणुकीत पक्षाचा कार्यकर्ता पदावर बसवा आणि गावचा विकास करा, असे सांगतानाच तालुकानिहाय संघटनात्मक बांधणीसाठी मेळावे घेऊन जिल्ह्यात राष्ट्रवादीचे मजबुतीकरण करून जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवूया, असे आवाहन त्यांनी केले. पक्षवाढीसाठी कामाला लागाआमदार जाधव मार्गदर्शन करताना म्हणाले की, पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार, माझ्यावर जिल्ह्याची जबाबदारी सोपवली आहे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद पुन्हा एकदा वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीनिशी कामाला लागावे. विरोधी पक्षाच्या सरकारने सत्तेवर आल्यानंतर गेल्या दोन वर्षांत विविध विकासात्मक कामांना खीळ घालून अनेक क्षेत्रात राज्याला मागे नेले आहे. पायाभूत सुविधा, तसेच तत्सम संबंधित योजना बंद करून सामान्य जनतेच्या जिवाशी खेळ मांडला आहे, असा आरोपही जाधव यांनी केला.