शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

हर्णै बंदर जेटी अडकली लाल फितीत

By admin | Updated: December 4, 2014 23:38 IST

११ कोटी रुपये जेटीला मंजूर झाले होते. मात्र, काही वर्षात ११ कोटीचा आराखडा आता शंभर कोटी ३६ लाखांवर पोहोचला असून, याकडे सरकारचे दुर्लक्षच

दापोली : तालुक्यातील हर्णै बंदराचा जेटी प्रश्न शासनाच्या लाल फितीत अडकला असून, मच्छिमारांचे मात्र हाल होत आहेत. गेली वीस वर्षे हर्णै बंदर जेटीची मागणी मच्छिमार बांधव करीत आहेत. तत्कालीन आघाडी सरकारने हर्णै बंदराच्या जेटीला मंजुरी दिली होती. ११ कोटी रुपये जेटीला मंजूर झाले होते. मात्र, काही वर्षात ११ कोटीचा आराखडा आता शंभर कोटी ३६ लाखांवर पोहोचला असून, याकडे सरकारचे दुर्लक्षच होत असल्याने मच्छिमार निराशा झाले आहेत.हर्णै बंदरातील आर्थिक उलाढालीवर तालुक्याचे आर्थिक गणित अवलंबून असते. या बंदराला जेटी असणे गरजेचे झाले आहे. या बंदरात सुमारे २ हजार बोटी मासेमारी करतात. मासेमारीतून पाच ते सात हजार लोकांना रोजगार मिळत आहे. तालुक्यातील अनेक गावातून मच्छिमार बांधव हर्णै बंदरात मासेमारीसाठी येतात. तालुक्यातील कोळी बांधवांचे महत्त्वाचे बंदर म्हणून हर्णै बंदराकडे पाहिले जाते. बंदरात जेटी व्हावा म्हणून या पंचक्रोशीतील मच्छिमार गेली वीस वर्षे शासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. परंतु शासन मात्र त्याबाबत उदासीन असल्याचे वारंवार सिध्द झाले आहे. हर्णै बंदरावर बुरोंडी, पाजपंढरी, आडे, उटंबर, केळशी, बाणकोट, कोळथरे, पंचनदी, दाभोळ, ओणवसे येथील नौका येतात. अशा एकूण १४ गावांतील मच्छिमार अवलंबून आहेत. हर्णै बंदर हे मच्छिमार बांधवांच्या उदरनिर्वाहाचे मुख्य बंदर आहे. अलिकडे समुद्रातील नैसर्गिक बदलामुळे वारंवार मच्छिमार बांधवांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. हर्णै बंदरात जेटी नसल्याने मच्छिमारांना मासेमारी बोट हर्णै बंदरात थोड्या अंतरावर नांगर टाकून ठेवावी लागते. तेथून छोट्या होडीने मासे किनाऱ्यावर आणावे लागते. पुन्हा किनाऱ्यावर आल्यावर बैलगाडीतून मासे बंदरात आणावे लागतात. या कसरतीत वेळ, पैसा वाया जातोच, त्याचबरोबर हा सगळा प्रवास फारच अडचणीचा आहे. वेळेत मासे बंदरात न आल्यास अधिक दर मिळण्याची शक्यता नसते. काहीवेळा तर ही सगळी उठाठेव करण्यासाठी माणसे मिळत नाहीत. त्यामुळे बंदरातील लिलावसुध्दा संपून जातो. कारण लिलाव हा केवळ एक ते दीड तासाचा असतो. सुमारे चार वाजता कोणत्याही परिस्थितीत मासे बंदरात यायलाच हवेत. मासे वेळीच बंदरात न आल्यास एवढे करुन आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. त्यामुळे जेटीचा प्रश्न गंभीर बनला आहे. जेटीप्रमाणेच येथे कोल्डस्टोअरेज नाही. त्यामुळे मासे स्टोअर करुन ठेवता येत नाहीत. एखाद्यावेळी अधिक मासळी सापडली तर ती ठेवता येत नसल्याने कमी दराने विकण्याची वेळ येते.जेटीचा याआधीचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर बराच काळ लोटला असल्याने या जेटीचे बजेट वाढल्याने पुन्हा प्रस्ताव करुन त्या आराखड्यास मंजुरी घेणे गरजेचे आहे. परंतु लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा नसल्याने हा प्रश्न लाल फितीत अडकला आहे. (प्रतिनिधी)