शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

बारावीचे पेपरवाटप चक्क दुचाकीवरून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 16:37 IST

दहावी, बारावीच्या परीक्षा काळात पेपर फुटू नयेत, यासाठी विशेष दक्षता घेतली जाते. परंतु, रत्नागिरी तालुक्यातील बारावी परीक्षेच्या पेपरची मात्र चक्क दुचाकीवरून ने - आण केली जात आहे. शिक्षकासमवेत एक पोलीस कर्मचारी देऊन दुचाकीवरून ही वाहतूक केली जात आहे.

ठळक मुद्देबारावीचे पेपरवाटप चक्क दुचाकीवरूनपरीक्षेच्या पेपरची चक्क दुचाकीवरून ने - आण

रत्नागिरी : दहावी, बारावीच्या परीक्षा काळात पेपर फुटू नयेत, यासाठी विशेष दक्षता घेतली जाते. परंतु, रत्नागिरी तालुक्यातील बारावी परीक्षेच्या पेपरची मात्र चक्क दुचाकीवरून ने - आण केली जात आहे. शिक्षकासमवेत एक पोलीस कर्मचारी देऊन दुचाकीवरून ही वाहतूक केली जात आहे.राज्यात बारावीच्या परीक्षेला सुरूवात झाली आहे. परीक्षा काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, परीक्षा शांततेत पार पडावी यासाठी विशेष दक्षता घेतली जात आहे. या परीक्षेसाठी देण्यात येणारे पेपर विद्यार्थ्यांच्या हाती लागू नयेत, कोणत्याही विषयाचा पेपर फुटू नये यासाठी विशेष गोपनीयता पाळली जाते. त्यादृष्टीने पोलिसांसह विशेष पथकांचीही नियुक्ती करण्यात येते.रत्नागिरी तालुक्यात परीक्षेसाठी असणाऱ्या केंद्रांवर मात्र हे पेपर शिक्षकांमार्फत दुचाकीवरून नेण्यात येत आहेत. शहरातील एका शाळेतून हे गठ्ठे शिक्षकांच्या ताब्यात देण्यात येतात. त्यानंतर हे गठ्ठे एका पोलिसाच्या मदतीने शिक्षकांच्या दुचाकीवरून परीक्षा केंद्रापर्यंत नेण्यात येत आहेत.

परीक्षा संपल्यानंतर मुलांच्या उत्तरपत्रिकांचे गठ्ठे पुन्हा दुचाकीवरून त्या शाळेपर्यंत आणण्यात येत आहेत. तालुक्यात गोगटे - जोगळेकर महाविद्यालय, पटवर्धन हायस्कूल, नवनिर्माण हायस्कूल, एम्. एस्. नाईक हायस्कूल, पाली, गावडेआंबेरे अशी परीक्षा केंद्र आहेत.

टॅग्स :examपरीक्षाRatnagiriरत्नागिरी