शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

गुरूजनांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:28 IST

रक्तदान शिबिराचे आयोजन रत्नागिरी : शहरातील मारूती मंदिर येथील निरामय योग संस्थेतर्फे आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षक वीरू स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली ...

रक्तदान शिबिराचे आयोजन

रत्नागिरी : शहरातील मारूती मंदिर येथील निरामय योग संस्थेतर्फे आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षक वीरू स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली गुरूवार, दि. २९ जुलै रोजी सकाळी १० ते दुपारी २ यावेळेत संस्था कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात संस्थेतील योग साधक सहभागी होणार आहेत.

मुदतवाढीची मागणी

रत्नागिरी : कोकणातील पाचही जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे पूरजन्य स्थिती निर्माण झाली. त्यामुळे पाचही जिल्ह्यांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पाणी, चिखल साचून पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांसाठी पीक विम्याची मुदत १५ ऑगस्टपर्यंत वाढविण्याची मागणी रत्नागिरी तालुका खरेदी-विक्री संघातर्फे करण्यात आली आहे.

खिचडी वाटप

रत्नागिरी : राष्ट्रसेविका समितीतर्फे १५ जणांच्या टीमने खिचडी तयार करत त्याची पाकिटे बनवून चिपळूण येथील पूरग्रस्तांना वितरीत केली. रत्नागिरी, गोळवली येथील सेविका मदतकार्यात सहभागी झाल्या होत्या. शिवाय देवरूखातील शर्मिष्ठा शाखेतर्फे पोळ्या, चटणी, लोणचं, दूध पावडर, दूध पिशव्या, पाणी बाटल्यांचे वितरण करण्यात आले.

दरडी हटविण्याचे काम सुरू

देवरूख : रत्नागिरी - कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटात दोन ठिकाणी डोंगर खचून दरडी रस्त्यावर आल्या आहेत. गेले दोन दिवस पाऊस थांबला असून, दरडी हटविण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. दरडी हटवल्यानंतरच हा मार्ग वाहतुकीसाठी मोकळा होणार आहे.

विल्ये येथे कोरोना तपासणी

रत्नागिरी : तालुक्यातील विल्ये गावात घेण्यात आलेल्या कोरोना तपासणी चाचणीला ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळाला. गावातील १२८ ग्रामस्थांनी आरटीपीसीआर तपासणी करून घेतली. हे तपासणी शिबिर यशस्वी करण्यासाठी सरपंच माधवी कांबळे, उपसरपंच नरेश कांबळे, पोलीस पाटील रमेश कांबळे, ग्रामसेवक सोनकांबळे, तलाठी सुखदा शिरकर यांचे सहकार्य लाभले.

माजी शिक्षकांचा स्नेहमेळावा

दापोली : शहरातील ए. जी. हायस्कूलच्या माजी शिक्षकांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव डाॅ. प्रसाद करमरकर, शालेय समितीच्या अध्यक्ष निलीमा देशमुख, संस्था सदस्य समीर गांधी, प्रसाद फाटक आदी उपस्थित होते.

बसफेऱ्या सुरू करण्याची मागणी

लांजा : कोरोना काळात तालुक्यातील ग्रामीण मार्गांवरील बंद करण्यात आलेल्या बसफेऱ्या सुरू करण्याची मागणी जिल्हा परिषदेचे माजी सभापती दत्ता कदम यांनी केली आहे. यासाठी लांजा आगार व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले आहे.

जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

राजापूर : तालुक्यातील विलवडे येथील पूरजन्य स्थितीमुळे नुकसान झालेल्या ग्रामस्थांना भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली. सरपंच दिनेश दळवी यांच्याकडे वस्तूंचे वितरण करण्यात आले.

वस्तूरूपी मदत

रत्नागिरी : येथील शहर राष्ट्रवादी विद्यार्थी काॅंग्रेसतर्फे चिपळूण येथील पूरग्रस्तांना वस्तूरूपी मदत वितरीत करण्यात आली. पाण्याच्या बाटल्या, बिस्कीटचे पुडे, जीवनावश्यक वस्तू, आदी साहित्य पाठविण्यात आले. राष्ट्रवादी आपल्यासोबत या अभियानाच्या माध्यमातून सर्व पदाधिकाऱ्यांनी पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत केली.