शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

ग्रामपंचायतीची फिरू लागली घंटागाडी

By admin | Updated: January 9, 2016 00:47 IST

गुहागर तालुका : घरगुती कचरा गोळा करण्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता

शृंगारतळी : गुहागर तालुक्यातील शृृंगारतळी-पाटपन्हाळे ग्रामपंचायतीने कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी सुरू केली आहे. या उपक्रमामुळे गावातील महत्त्वाचे चौक आणि मुख्य बाजारपेठ स्वच्छ दिसत आहे. त्यामुळे काही प्रमाणात साथीच्या आजारावर नियंत्रण आल्याचे चित्र जाणवू लागले आहे. आगामी काळात घरगुती कचरा गोळा करण्याकडे प्रशासनाने विशेष लक्ष पुरवण्याची आवश्यकता आहे.गुहागर तालुक्यातील सर्वांत मोठी बाजारपेठ तळी ही आहे. याठिकाणी व्यापारीवर्ग व लोकवस्ती मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने कचऱ्याचीही कमी नाही. बाजारपेठेतून जाणाऱ्या हंगामी नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत होती. याच नदीपात्राच्या जवळ असणाऱ्या विहिरी व कुपनलीकांमधून परिसरात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात होता. कचऱ्याची समस्या वाढल्याने त्याच्या नियोजनासाठी स्थानिक प्रशासनाने घंटागाडी सुरू केली आहे. तसेच ठिकठिकाणी कचराकुंड्या ठेवल्या होत्या. मात्र, मोकाट जनावरे व श्वानांमुळे कुंड्यांमध्ये टाकलेला कचरा बाहेर पडू लागला होता. त्यामुळे बाजारपेठेतील कंचराकुंड्या उचलण्यात आल्या. त्यानंतर दररोज प्रत्येक दुकानासमोर गाडी जाऊन कचरा गोळा करू लागली. यासाठी ग्रामपंचायतीने व्यावसायिकांकडून कर आकारण्यास सुरुवात केली आहे. या उपक्रमाला स्वच्छताप्रिय व्यावसायिकांनी प्रतिसादही दिला आहे. मात्र, काहीजण रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन कचरा नदीच्या पात्रात टाकताना दिसतात. यापूर्वी बाजारपेठेतील दोन्ही हंगामी नद्यांच्या पात्रात मोठ्या प्रमाणात कचरा साठत असल्याने विहिरी व कुपनलिकांचे पाणी दूषित होत होते. त्यामुळे काविळ, ताप, सर्दी, खोकला, जुलाब यांसारखे आजार बळावत होते. मात्र, वर्षभरापासून घंटागाडी प्रत्येकाच्या दारात जाऊन नियमितपणे कचरा गोळा करत असल्याने लोक आजारी पडण्याची संख्या कमी झाली असल्याचे चित्र जाणवू लागले आहे. याठिकाणी घंटागाडीच्या माध्यमातून दररोज साधारण सहा ते सात टन कचरा शृंगारतळीतून बाहेर फेकला जात आहे. यासाठी चार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कचरा अभियान पूर्णपणे यशस्वी करण्यासाठी घरगुती कचरा करातून वगळण्याची गरज आहे. घरगुती कचरा करातून वगळल्यास लोक घंटागाडीत कचरा टाकतील. (वार्ताहर)